Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

निरोगी आणि रोगमुक्त राहण्यासाठी काही तास उभे राहावे

Blog No. 2024/ 108.  

Date: 28th,May 2024

मित्रांनो,

            मला आठवतंय, काही वर्षापूर्वी मी वाचलं होतं की शिक्षक,प्राध्यापक,पोलिस या जॉबमध्ये हे जॉब करणाऱ्यांना सतत उभे राहावे लागते.त्यामुळे त्यांना व्हेरीकोस व्हेन्ससारखे आजार होऊ शकतात.कोविड 19 नंतर बैठे जॉब करणाऱ्या लोकांना बैठ्या जॉबमुळे,ज्या आरोग्य विषयक समस्या उद्भवतात.त्याबद्दल बरेच काही लिहून यायला लागले.इतक्यात मी एक आर्टिकल वाचले,ज्यात आपण दिवसभरात बसणे आणि उभे रहाणे याचा ताळमेळ ठेवायला पाहिजे असे वाचायला मिळाले.बऱ्याच कंपन्यामध्ये आता बैठे काम करणाऱ्यांसाठी,तेच कार्य उभे राहून देखिल करता येईल,अशी व्यवस्था केल्याचे माझ्या वाचनात आले.त्यावर आहे माझा आजचा ब्लॉग.

सविस्तर:

            तुमच्या डेस्कबाऊंड जॉब आहे का? आणि तुम्हाला बराच वेळ लॅपटॉपसमोर बसून राहावे लागते का? तसं असेल तर कदाचित तुमच्या आरोग्याला मोठा धोका पत्करत आहात.कारण दीर्घकाळ बसून राहिल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात,ज्यात लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाइप 2 मधुमेह आणि काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांचाही समावेश आहे.

            दुसरीकडे उभे राहण्याचे अनेक फायदे आहेत,ज्यात सुधारित मुद्रा (improved posture),तुमच्या   कॅलरी जास्त खर्च होतात आणि काही आजारांचा धोका कमी होतो.एकूणच आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी बसणे आणि उभे राहणे,यामध्ये निरोगी संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

निरोगी आणि रोगमुक्त राहण्यासाठी दररोज किती तास उभे राहावे?

            एखाद्याने दररोज किती तास उभे राहावे,हे सरसकट सर्वांसाठी सांगता येणार नाही,कारण ते तुमचे वय,तंदुरुस्ती पातळी (Fitness Level), व्यवसाय आणि एकूण आरोग्य यासारख्या वैयक्तिक घटकांवर अवलंबून असते,त्यानुसार कालावधी बदलत असतो.बऱ्याच लोकांसाठी, दर काही तासांनी किमान 30 मिनिटे ते एक तास उभे राहणे ही एक चांगली सुरुवात असू शकते.तुमच्या दैनंदिन दिनचर्येत उभे राहून आणि विश्रांतीचा समावेश करून हे साध्य केले जाऊ शकते, मग ते कामावर असो किंवा घरी. स्टँडिंग डेस्क किंवा समायोज्य डेस्क कन्व्हर्टर वापरल्याने दिवसभर बसणे आणि उभे राहणे यामध्ये बदल करणे सोपे होऊ शकते.

            तसेच विश्रांतीशिवाय दीर्घकाळ उभे राहिल्याने थकवा,स्नायूंचा ताण आणि सांधेदुखी यासह इतर  आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.म्हणून,आपल्या शरीराचे ऐकणे आणि बसण्यासाठी किंवा फिरण्यासाठी योग्य वेळ ठरविणे महत्वाचे आहे.उभे राहण्याव्यतिरिक्त, नियमित शारीरिक हालचालींमध्ये व्यस्त राहणे आणि आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये विविध हालचालींचा समावेश करणे आवश्यक आहे.यामध्ये चालणे, स्ट्रेचिंग, व्यायामाचे इतर प्रकार समाविष्ट असू शकतात,जे तुमचे शरीर मजबूत,लवचिक आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

असे करणे महत्वाचे कां आहे?

            अभ्यासात असे आढळून आले आहे की,शारीरिक हालचाली जसे की दर तासाला 3-5 मिनिटे उभे राहणे किंवा दिवसभरात काही तासांत काही मिनिटे चालणे,विशेषत: Type 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये या गोष्टींचा,ग्लुकोज नियंत्रणावर जोरदार परिणाम होतो.आरोग्य तज्ञ असेही म्हणतात की,ज्यांना तासंतास शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी,अधूनमधून शारीरिक हालचाली करणे हा डेस्क जॉबमधील एकसंधपणा तोडण्याचा एक चांगला मार्ग आहे.शिवाय, निरोगी आणि रोगमुक्त राहण्यासाठी संतुलित आहार करणे,हायड्रेटेड राहणे आणि पुरेशी झोप घेणे हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. हे जीवनशैली घटक सर्वांगीण आरोग्य आणि तंदुरुस्तीला चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य करतात.

समारोप:-

            या निमित्ताने मला आठवलं,माझे एक चीफ मॅनेजर घरून बाटलीत कधी पिण्यासाठी पाणी घेऊन येत नसतं अन ब्रांचमध्ये जर पाण्याचा वॉटर कूलर त्यांच्या कॅबिनपासून दूर असेल तर त्यांना आनंद होत असे,कारण दिवसभरात पाणी पिण्यासाठी तेवढे चालत जावे लागत असे.बँकेच्या दिवसभराच्या कामात तेवढे चालणे होतं असे.अन्यथा बँकेतील काम हे बैठे काम आहे.अर्थात काही कार्यालयातील लोक चहाच्या निमित्ताने समोर उभे असलेले ग्राहक सोडून देऊन तास-न-तास गप्पा मारत उभे रहातात.याचे त्यांना या बहाण्याखाली समर्थन करता येणार नाही.हे नक्की.       

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. Replies
    1. खूप उपयुक्त माहिती मिळाली सर. असेच आरोग्य विषयी लेख अपेक्षित धेत

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...