Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

काही पदार्थ रेफ्रिजरेटमधे ठेवू नयेत.

Blog No. 2024/ 112.  

Date: 31st,May 2024

मित्रांनो,

            रेफ्रिजरेटर हे कमी तापमानात अन्न आणि पेये साठवण्यासाठी वापरले जाणारे,सामान्य घरगुती उपकरण आहे.त्याचे प्राथमिक कार्य म्हणजे जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ कमी करणे,ज्यामुळे नाशवंत वस्तूंचे शेल्फ लाइफ वाढते.साधारणतः, रेफ्रिजरेटर म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय,याचे थोडक्यात उत्तर हे आहे. रेफ्रिजरेटर मध्ये काय काय ठेवू नये,याची यादी खरं म्हणजे खूप मोठी आहे.आपण आजकाल रेफ्रिजरेटरचा उपयोग कपाटासारखा करतो.पण रेफ्रिजरेटर आजारांना कारणीभूत ठरू शकतात? होय, तुम्ही बरोबर वाचलंत.

कसे ते सविस्तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

         काही खाद्य पदार्थ किंवा वस्तु जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या,तर त्या विषारी आणि मानवी वापरासाठी अयोग्य बनू शकतात.खाद्यपदार्थ रेफ्रिजरेट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नाची उष्णता कमी करणे,त्याचे तापमान कमी करणे आणि ते जास्त काळ टिकवून ठेवणे.पण डॉ.डिंपल जांगडा, एक आयुर्वेद आंत आरोग्य प्रशिक्षक, यांनी चार नैसर्गिक पदार्थांची यादी केली आहे जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास विषारी होऊ शकतात. ते कोणकोणते ते आपण आता बघू.  

लसूण:

बाजारात बऱ्याचदा सोललेली लसूण मिळते.आजकाल ही सोललेली लसूण विकत घेतली जाते,जेणेकरून ती लगेच उपयोगात आणता येते.पण ती लगेच उपयोगात आणली तर ठीक आहे,पण ती विकत घेतलेली लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.कारण ती खूप लवकर बुरशी पकडू लागते.आणि बुरशी आलेल्या  लसणाचा कर्करोगाशी संबंध जोडला गेला आहे.म्हणून नेहमी न सोललेला लसूण विकत घ्या,शिजवण्यापूर्वीच सोलून घ्या आणि रेफ्रिजरेटरच्या बाहेर ठेवा.

कांदा:

कांदा कमी तापमानाला प्रतिरोधक असतो.जेव्हा कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो,तेव्हा स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि बुरशी पकडण्यास सुरवात होते.अर्धा कांदा कापून,उरलेला अर्धा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची सवय लोकांना असते.असे कधीही करू नका,कारण हा अर्धा कांदा सभोवतालचे सर्व अस्वास्थ्यकर जीवाणू पकडतो आणि बुरशी धरू लागतो.जेव्हा घरी कोणी आजारी असेल,तेव्हा आपण कांद्याचा तुकडा घेतो आणि खोलीच्या कोपऱ्यात ठेवतो जेणेकरून वातावरणातील सर्व हानिकारक जीवाणू गोळा होतात.म्हणून कांदा कधी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.  

आले किंवा अद्रक:

जेव्हा तुम्ही आले किंवा अद्रक रेफ्रिजरेटरमध्ये गोठवता,तेव्हा ते खूप लवकर बुरशी पकडण्यास सुरवात करते आणि याचा संबंध मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याशी जोडला गेला आहे.म्हणून ते रेफ्रिजरेट करू नका.

तांदूळ:

लोकांना फ्रिजमध्ये शिजवलेला भात ठेवण्याची सवय असते. कारण त्यामुळे त्यातील स्टार्च कमी होईल असे त्यांना वाटते आणि स्टार्च कमी झाले म्हणजे भात,कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करेल असे त्यांना वाटते.परंतु प्रत्यक्षात, तांदूळ बुरशी सर्वात जलद धरतो आणि जर तुम्ही भात फ्रीजमध्ये ठेवणार असाल,तर 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका.दोनदा गरम केलेला आणि रेफ्रिजरेटेड भात 24 तासांपेक्षा अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवला तर अन्न विषबाधा होऊ शकते.भात एकापेक्षा जास्त वेळा गरम करू नये.

            याशिवाय काही फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.कारण बऱ्याच वेळा हे खाद्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळे,ते आपली चव आणि आरोग्यविषयक गुणधर्म गमावून बसतात.ती फळे आणि भाज्या     म्हणजे टोमॅटो, केळी, बटाटे, एवोकॅडो, ब्रेड, तेल, खोबरेल तेल, मध, कॉफी, औषधी वनस्पती, खरबूज, अननस, आंबा आणि पपई यासारखी फळे.

समारोप:

            आजकाल वाढलेला उन्हाळा आणि तापमान पहाता रेफ्रिजरेटरची अतिशय गरज पडते आहे.म्हणून त्याचा उपयोग अवश्य घ्यायला हवा. पण त्याच वेळेला ज्यापासून काही अपाय होऊ शकतो,अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात.आजच्या ब्लॉगमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी किंवा खाद्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला हवेत हे विस्तार भयाअभावी लिहिता आले नाही,त्यावर ब्लॉग कधी तरी लिहिन.         

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे. 

Comments

  1. धन्यवाद, प्रसाद. अत्यंत उपयुक्त माहिती दिलीस
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...