Blog No. 2024/ 112.
Date: 31st,May 2024
मित्रांनो,
रेफ्रिजरेटर हे कमी तापमानात अन्न आणि पेये साठवण्यासाठी वापरले जाणारे,सामान्य घरगुती उपकरण आहे.त्याचे प्राथमिक कार्य म्हणजे जीवाणू आणि इतर
सूक्ष्मजीवांची वाढ कमी करणे,ज्यामुळे नाशवंत वस्तूंचे शेल्फ लाइफ वाढते.साधारणतः, रेफ्रिजरेटर म्हणजे काय आणि त्याचे
कार्य काय,याचे थोडक्यात उत्तर हे आहे. रेफ्रिजरेटर मध्ये काय काय ठेवू नये,याची यादी
खरं म्हणजे खूप मोठी आहे.आपण आजकाल रेफ्रिजरेटरचा उपयोग कपाटासारखा करतो.पण रेफ्रिजरेटर आजारांना कारणीभूत ठरू शकतात? होय, तुम्ही बरोबर वाचलंत.
कसे ते सविस्तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
काही
खाद्य पदार्थ किंवा वस्तु जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या,तर
त्या विषारी आणि मानवी वापरासाठी अयोग्य बनू शकतात.खाद्यपदार्थ
रेफ्रिजरेट करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नाची उष्णता कमी करणे,त्याचे
तापमान कमी करणे आणि ते जास्त काळ टिकवून ठेवणे.पण डॉ.डिंपल जांगडा, एक आयुर्वेद आंत आरोग्य प्रशिक्षक, यांनी चार नैसर्गिक
पदार्थांची यादी केली आहे जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास विषारी होऊ शकतात. ते कोणकोणते
ते आपण आता बघू.
लसूण:
बाजारात बऱ्याचदा सोललेली लसूण मिळते.आजकाल
ही सोललेली लसूण विकत घेतली जाते,जेणेकरून ती लगेच उपयोगात आणता येते.पण ती लगेच उपयोगात
आणली तर ठीक आहे,पण ती विकत घेतलेली लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.कारण ती खूप
लवकर बुरशी पकडू लागते.आणि बुरशी आलेल्या लसणाचा
कर्करोगाशी संबंध जोडला गेला आहे.म्हणून नेहमी न सोललेला लसूण विकत घ्या,शिजवण्यापूर्वीच
सोलून घ्या आणि रेफ्रिजरेटरच्या बाहेर ठेवा.
कांदा:
कांदा कमी तापमानाला प्रतिरोधक असतो.जेव्हा
कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो,तेव्हा स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि
बुरशी पकडण्यास सुरवात होते.अर्धा कांदा कापून,उरलेला अर्धा रेफ्रिजरेटरमध्ये
ठेवण्याची सवय लोकांना असते.असे कधीही करू नका,कारण हा अर्धा कांदा सभोवतालचे
सर्व अस्वास्थ्यकर जीवाणू पकडतो आणि बुरशी धरू लागतो.जेव्हा घरी कोणी आजारी असेल,तेव्हा
आपण कांद्याचा तुकडा घेतो आणि खोलीच्या कोपऱ्यात ठेवतो जेणेकरून वातावरणातील सर्व
हानिकारक जीवाणू गोळा होतात.म्हणून कांदा कधी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.
आले किंवा अद्रक:
जेव्हा तुम्ही आले किंवा अद्रक रेफ्रिजरेटरमध्ये
गोठवता,तेव्हा ते खूप लवकर बुरशी पकडण्यास सुरवात करते आणि याचा संबंध मूत्रपिंड
आणि यकृत निकामी होण्याशी जोडला गेला आहे.म्हणून ते रेफ्रिजरेट करू नका.
तांदूळ:
लोकांना फ्रिजमध्ये शिजवलेला भात
ठेवण्याची सवय असते. कारण त्यामुळे त्यातील स्टार्च कमी होईल असे त्यांना वाटते आणि
स्टार्च कमी झाले म्हणजे भात,कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास
मदत करेल असे त्यांना वाटते.परंतु प्रत्यक्षात, तांदूळ बुरशी सर्वात जलद धरतो
आणि जर तुम्ही भात फ्रीजमध्ये ठेवणार असाल,तर 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू
नका.दोनदा गरम केलेला आणि रेफ्रिजरेटेड भात 24 तासांपेक्षा अधिक वेळ फ्रिजमध्ये ठेवला
तर अन्न विषबाधा होऊ शकते.भात एकापेक्षा जास्त वेळा गरम करू नये.
याशिवाय काही
फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.कारण बऱ्याच वेळा हे खाद्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये
ठेवल्यामुळे,ते आपली चव आणि आरोग्यविषयक गुणधर्म गमावून बसतात.ती फळे आणि भाज्या म्हणजे टोमॅटो, केळी,
बटाटे, एवोकॅडो, ब्रेड, तेल, खोबरेल तेल,
मध,
कॉफी, औषधी वनस्पती, खरबूज,
अननस, आंबा आणि पपई यासारखी फळे.
समारोप:
आजकाल वाढलेला
उन्हाळा आणि तापमान पहाता रेफ्रिजरेटरची अतिशय गरज पडते आहे.म्हणून त्याचा उपयोग अवश्य
घ्यायला हवा. पण त्याच वेळेला ज्यापासून काही अपाय होऊ शकतो,अशा गोष्टी आपण टाळायला
हव्यात.आजच्या ब्लॉगमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी किंवा खाद्य पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये
ठेवायला हवेत हे विस्तार भयाअभावी लिहिता आले नाही,त्यावर ब्लॉग कधी तरी लिहिन.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
धन्यवाद, प्रसाद. अत्यंत उपयुक्त माहिती दिलीस
ReplyDeleteमिलिंद निमदेव