Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप

 Blog No. 2024/ 057.   

Date:31st, March 2024.

मित्रांनो,

            भारताच्या अंतर्गत कारभाराबाबत टिपणी करणे,हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे? अशा थाटात अनेक गोष्टी नेहमीच अमेरिका असो, संयुक्त राष्ट्र संघ यांच्या कडून होत असतात. या मागे खोडसाळपणा तर असतोच,पण त्यामागे राजकीय हेतु  देखिल असतोच, हे लक्षात घ्यायला हवे.या विषयाला समर्पित आहे आजचा ब्लॉग. 

 सविस्तर

            दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर 'भारतातील राजकीय अशांतता' या बाबीवर लक्ष वेधताना प्रवक्त्याने ही टिप्पणी केली.स्टीफन दुजारिक, महासचिवांचे प्रवक्ते, यांनी व्यक्तींच्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्यासह त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला.  

ते पुढे म्हणाले की जागतिक संस्था भारत आणि इतर राष्ट्रांमधील निवडणुकांदरम्यान लोकांच्या 'राजकीय आणि नागरी हक्कांचे' संरक्षण करण्याची आशा करते."आम्ही आशावादी आहोत की भारतात, कोणत्याही देशाप्रमाणेच ज्या देशात निवडणुका होत आहेत,त्यात राजकीय आणि नागरी हक्कांसह प्रत्येकाच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल आणि प्रत्येकजण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करण्यास सक्षम असेल," दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक आणि विरोधी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्याबाबत अमेरिकेने देखिल अशीच टिपण्णी केली होती,हे येथे नमूद करावेसे वाटते.

            मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की मध्यंतरी आपला शेजारी देश पाकिस्तान असो,वा रशिया असो. तिथे निवडणूक काय संयुक्त राष्ट्र संघाच्या विचारानुरूप झाली होती कां? किंवा अमेरिकेतील मागील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ती देखिल काय आदर्श निवडणूक होती कां? नाही.इतर देशात कुणा पक्षाची खाती गोठवली किंवा कुणा नेत्याला अटक झाल्यावर संयुक्त राष्ट्र संघ किंवा अमेरिका काही टिपण्णी करते कां? नाही.मग भारताच्या बाबतीत हे असे कां?

            माझ्या मतानुसार अन्य राष्ट्रातील विरोधी पक्ष हे देशांतर्गत गोष्टी या देशाबाहेर चव्हाट्यावर नेऊन मांडत नाही.भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते हे नेहमीच भारतातील प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवत असतात,आणि त्यात त्यांना फार मोठेपणा वाटतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक आणि विरोधी काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्या ही सर्वस्वी भारताची अंतर्गत बाब आहे. त्यात ना संयुक्त राष्ट्र संघ किंवा अमेरिका यांना दखल द्यायचा काही अधिकार नाही. भारतात गेल्या 75 वर्षापासून लोकशाही नांदत आहे.इथे निवडणुका या खुल्या आणि मुक्त वातावरणात संपन्न होतात. निवडणूक आहे म्हणून कायदा आपले काम थांबवतो असे होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेस भारतात काही ही शांततापूर्ण रित्या होत आहे हे आवडत नसावे.आणि हे आजचे अमेरिकेचे धोरण नाही. 

समारोप

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने,उत्तरादाखल असे म्हटले आहे की स्वतंत्र आणि मजबूत लोकशाही संस्थांबाबत देशाची बांधिलकी आहे आणि निवडणूक आणि कायदेशीर व्यवस्थेमध्ये कोणताही बाह्य हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने भारतातील काही कायदेशीर कार्यवाहींबाबत केलेल्या टिप्पण्यांवर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे आणि आपल्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि अखंडतेचे प्रतिपादन केले.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. खरे आहे
    दादागिरी खपवुन घ्यायची गरज नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...