Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त- आर्थिक स्थैर्याचे दोन पैलू

 Blog No.2023/295

Date: -25th, November 2023. 

 मित्रांनो,

        मला एक गोष्ट सांगा, अगदी काळ कितीही बदलला.रोखीच्या व्यवहाराचे रूपांतर ऑनलाइन,डिजिटल ट्रान्सफरमध्ये झालं, कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या जोरात आहेत. पण पैश्याचे मोल कमी झाल्याचे बघायला मिळतंय कां? पैश्याचे मूल्य कमी झालं आहे,याबाबत वाद नाही पण मोल कमी झालेलं नाही. “द होल थिंग इज दॅट कि भैय्या सबसे बडा रूपय्या.” हे अजूनही सत्य आहे आणि वास्तव आहे.अनिश्चिततेने भरलेल्या या जगात पैश्या इतका जवळचा दूसरा मित्र नाही. त्यामुळेच “पर्सनल फायनॅन्स” खूप महत्वाचे आहे. तुम्हाला प्राप्त होणाऱ्या प्रत्येक पैश्याचे नियोजन तुम्ही कसे करता हे महत्वाचे आहे. पैश्याच्या व्यवस्थापनावर काही लिहावं, विशेषतः एक सेवानिवृत्त बँक अधिकारी म्हणून असे माझ्या मनात आले. त्यावर हा आजचा ब्लॉग.                   

 1. सुस्पष्ट आर्थिक उद्दिष्टे ठरवा:

     स्पष्ट आणि वास्तववादी उद्दिष्टे ठरवून तुमचा आर्थिक प्रवास सुरू करा. घरासाठी डाउन पेमेंटसाठी बचत असो, आपत्कालीन निधी तयार करणे असो किंवा सेवानिवृत्तीचे नियोजन असो, विशिष्ट उद्दिष्टे तुमच्या वर्तमानातील आणि भविष्यातील आर्थिक निर्णयांसाठी दिशानिर्देशक ठरत असतात. 

2. वास्तववादी बजेट तयार करा:

     जसं सरकार अर्थसंकल्प तयार करत असते तसचं तुम्ही देखिल आपलं एक मासिक बजेट तयार करा. तुमचे खर्च कोणते आहेत याची त्यामुळे तुम्हाला जाणीव होईल.नाही तर आला पैसा आणि गेला पैसा,यामुळे काही अवाजवी खर्च होतो आहे कां हे लक्षात येणार नाही. तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा अनावश्यक खर्च टाळणे शक्य होणार नाही.तुमच्या उत्पन्नाचा विशिष्ट भाग गृहकर्जाचे हप्ते,उपयोगाच्या गोष्टी, किराणामाल आणि वाहतूक यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी आधी बाजूला काढा.मग बचतीसाठी काही पैसा बाजूला ठेवा आणि त्यानंतर मनोरंजनासाठी पैसा काढून ठेवा.मनोरंजन हे देखिल महत्वाचे आहे. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही विरंगुळा गरजेचा आहे. 

3. आपत्कालीन निधी तयार करा:

     जिवनात अनिश्चितता असते. त्यामुळे आर्थिक कव्हर असणे गरजेचे आहे. त्यामुळे तीन ते सहा महिन्यांच्या राहणीमानाचा खर्च भागवू शकेल असा आपत्कालीन निधी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवा. हा निधी अनपेक्षित खर्च किंवा उत्पन्न अचानक कमी झाल्यास आर्थिक कुशन प्रदान करतो. 

4. कर्ज परतफेडीला प्राधान्य द्या:

       तुम्ही कुठलेही कर्ज घेतले असेल तर परतफेडीला प्रथम प्राधान्य द्या. प्रथम उच्च-व्याज दराचे कर्ज लवकर  फेडून प्रारंभ करा,जसे की क्रेडिट कार्ड ड्यूज.नियमित कर्ज परतफेडीचा सिबिलवर चांगला परिणाम होत असतो. कर्ज हे केव्हाही काढावे लागू शकते. म्हणून हे लक्षात ठेवावे.      

5.बचत करा आणि हुशारीने गुंतवणूक करा:

       बचत करतांना तीन मूल तत्वे आहेत, 1. तुमची बचत ही सुरक्षित असली पाहिजे. 2. तुमची बचत तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारी असली पाहिजे आणि 3. बचत ही तरल असावी. याचा अर्थ तुम्हाला गरज असेल तेव्हा त्याचे त्वरेने रोखित रूपांतर होणे गरजेचे आहे. त्यासोबत टर्म इन्शुरन्स करायला हवा. सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनाचा विचार देखिल फार आधी पासून केला तर त्याचा प्रीमियमचा दर तुमच्या पगारात परवडेल असा असेल. म्हणून जितक्या लवकर सेवानिवृत्तीपश्चात जीवनाचा विचार कराल तेवढा कमी गुंतवणूक करून मोठा फायदा मिळविता येईल. 

6.नियमितपणे तुमच्या बजेटचा रिव्यूव घ्या आणि परिस्थितीप्रमाणे त्यांत बदल करा:

       आर्थिक परिस्थिती बदलते आणि तुमचे बजेट त्यानुसार बदलले पाहिजे.नियमितपणे तुमच्या बजेटचा  रिव्यूव  घ्या आणि परिस्थितीप्रमाणे त्यांत बदल करा. महागाई,ट्रान्सफर/बदली,आजारपण यासारखे जीवनातील बदल, तसेच पगार वाढ, नवीन खर्च किंवा आर्थिक उद्दिष्टांमधील बदल याचा विचार करून पुन्हा बजेट बनवा.बजेट हे लवचिक असावे.   

7. तुमच्या साधनांच्या खाली जगा:

        उत्पन्नातील प्रत्येक वाढीसह तुमची जीवनशैली बदलण्याचा मोह तुम्हाला होईल.पण तो मोह टाळण्यासाठी आर्थिक शिस्त लावून घ्या.आपल्या संसाधनापेक्षा कमी पातळीवर राहिल्याने आपल्याला अधिक बचत करण्यास आणि कालांतराने संपत्ती निर्माण करण्याची मुभा मिळते.गरजा आणि इच्छा यामध्ये फरक करा आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन तुमच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. 

8.आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा:-

     वैयक्तिक वित्ताबद्दल सतत स्वतःला शिक्षित करा. गुंतवणुकीचे पर्याय, कर परिणाम आणि आर्थिक नियोजन धोरणांबद्दल माहिती मिळवा.पुस्तके, पॉडकास्ट आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांसह अनेक संसाधने आहेत जी तुम्हाला तुमची आर्थिक साक्षरता वाढविण्यात मदत करू शकते. 

9. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य योजनेत गुंतवणूक

       मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर केंव्हा पैसा लागणार आहे, याचा विचार करून योग्य ती गुंतवणूक योजना निवडा. आणि त्यात गुंतवणूक करा.     

10. जेव्हा गरज असेल तेव्हा व्यावसायिक सल्ला घ्या:

        तुम्हाला काही आर्थिक पैलू त्रासाचे किंवा गुंतागुंतीचे वाटत असतील तर आर्थिक व्यावसायिकांकडून सल्ला घेण्याचा विचार करा. प्रमाणित आर्थिक नियोजक किंवा सल्लागार तुमच्या वास्तविक परिस्थिती आणि उद्दिष्टांवर आधारित वैयक्तिकृत मार्गदर्शन देऊ शकतात. 

सारांश

        आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त जिवनात खूप महत्वाची आहे.नेहमी अनिश्चितता आणि विपदा याचा विचार करूनच आर्थिक व्यवस्थापन केले पाहिजे असे नाही,तर आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन केले पाहिजे.हे सारे लिहीत असतांना मी शेअर मार्केटबद्दल काहीही लिहिलेले नाही. याला कारण असे की असा पैसा ज्याला तुम्ही विसरू देखिल शकता असा पैसा शेअरमध्ये गुंतवा.तुमच्या मासिक बजेटवर शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम होणार नसेल तर आणि तरच पैसा शेअरमध्ये गुंतवा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

  1. मीनल ओगलेNovember 25, 2023 at 7:17 AM

    अर्थसाक्षरता आणि आर्थिक नियोजन याबद्दल चांगले लिहीले आहे.👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...