Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

मानसिकदृष्ट्या सुदृढ कसे बनाल

Blog No.2023/240

Date:-17th, September,2023.


मित्रांनो,

आपण शारिरीक दृष्ट्या मजबूत बनण्यासाठी बरंच काही करत असतो.जसे की व्यायाम, चालणे, समतोल आहार किंवा डाएट ईत्यादी.पण मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी काही करतो का? मला प्रश्न यासाठी पडला आहे,कारण कुणी मी मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी अमुक अमुक करतो बरं, हे अजून तरी कुणी म्हटलेलं मी ऐकलेलं नाही.आज आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी काय करता येईल हे पहाणार आहोत.

  

प्रास्ताविक

मी अशा 10 सवयी तुम्हाला सांगणार आहे,ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यास मदत करू शकतील. त्या खालील प्रमाणे:-

 

1.       आत्म-जागरूकतेचा सराव करा: तुमचे विचार,भावना आणि त्यांचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करा.

2.       सकारात्मक स्व-संवाद: नकारात्मक विचारांना रचनात्मक आणि सकारात्मक विचारांनी बदला. वास्तववादी ध्येये निश्चित करा. या संबंधात स्वतःशीच संवाद साधा.

3.       आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे ठरवा.जिवनात काही तरी उद्दिष्टे असायला हवी किंवा छंद असायला हवेत. छंदामुळे माणूस ताण. तणाव यापासून दूर राहू शकतो.

4.       बदल स्वीकारा: बदलासाठी मनाची अनुकूलता ही महत्त्वाची आहे.बदलाकडे वाढीची संधी म्हणून पहा.जिवनात होणाऱ्या बदलांकडे सकारात्मकतेने पहा.The measure of intelligence is the ability to change' - असे  अल्बर्ट  आईन्स्टाईनने म्हटले आहे. 

5.       लवचिकता निर्माण करा: अडथळे आणि अपयशांपासून शिका, त्यांचा पायरीचा दगड म्हणून वापर करा.कुठल्याही गोष्टी बाबत दुराग्रह नको. निर्णयात लवचिकता हवी.

6.       स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या: माणूस इतरांकरिता खूप काही करत असतो,पण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही.स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. व्यायाम,पोषण आणि झोपेद्वारे निरोगी जीवनशैली टिकवून ठेवा. 

7.    इतरांची मदत मागा आणि घ्या: आपल्याला काही समस्या असेल तर तिचे समाधान शोधण्यासाठी कुणा पुढे झुकावे लागले तरी संकोच करू नका. जेव्हा गरज असेल तेव्हा मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक यांना मदत मागा.त्याने तणाव दूर करण्यास मदत होईल आणि समस्यांचे निवारण शक्य होईल. कधी कधी इतरांकडे आपल्या समस्यांवर अधिक चांगला तोडगा असू शकतो.   

8.   समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करा: समस्यांना घाबरून न जाता किंवा दु:ख करत बसण्यापेक्षा त्यावर मत करण्यासाठी तार्किक आणि समाधान-केंद्रित मानसिकतेसह आव्हानांना सामोरे जा. 

9.     जागरुकतेचा सराव करा: तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सजगता आणि ध्यान जोपासा.

10.  सतत शिका: जिवनात सतत काही तरी शिकत राहिले पाहिजे. त्यामुळे मेंदू तल्लख राखण्यास मदत होते. नवीन ज्ञान मिळवून तुमचे मन सक्रिय ठेवा आणि नवनविन कौशल्ये विकसित करा.

 

सारांश  

या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्याने तुम्हाला कालांतराने मानसिक शक्ती विकसित होण्यास मदत होऊ शकते. माणूस जर मानसिक दृष्ट्या सुदृढ असला तर तो शारीरिक दृष्ट्या देखिल सुदृढ राहू शकतो. शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्याची प्रोसेस ही सतत राबवायची असते. त्याच प्रमाणे मानसिक दृष्ट्या सुदृढ होण्याची प्रोसेस ही दीर्घ कालीन आहे. हा एक प्रवास आहे आणि प्रगती हळूहळू होऊ शकते.म्हणून यासाठी संयम बाळगणे गरजेचे आहे. तर मग चला आजपासून सुरू करू या, हा प्रवास.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...