Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

"अभिमान" ची पन्नास वर्ष

 Blog No.2023/196       

Date:- 28th,July, 2023. 

मित्रांनो,

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक सर्वांगसुंदर चित्रपट अभिमान.” आज हा चित्रपट रिलीज होऊन 50 वर्षे झाली. 27 जुलै,1973 या तारखेला हा चित्रपट रिलीज झाला.त्याला व्यावसायिक यश सर्वसाधारण मिळालं, जे अपेक्षित होतं.कारण गल्लाभरु क्राऊड किंवा तेव्हाच्या थर्ड क्लास मध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नव्हताच. एक साधी,सोपी,सरळ कहाणी होती. ना मारामारी, ना हिंसक दृश्ये, ना उत्तान नृत्ये हे काहीच नव्हतं.माझ्या काही टॉप चित्रपटाच्या यादीतील वरच्या नंबरचा हा चित्रपट.त्यामुळे आजचा ब्लॉग या चित्रपटाला समर्पित.  

प्रास्ताविक             

मी या चित्रपटास सर्वांगसुंदर चित्रपट यासाठी म्हटलं की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुरेख अभिनय,त्यांना असरानी,बिंदु,डेव्हिड, दुर्गा खोटे, ए के हंगल आणि ललिता कुमारी यांनी दिलेली सुंदर साथ. हृषिकेश मुखर्जी यांची सुरेख कथा त्यातील राजेंद्रसिंह बेदी यांचे लाजवाब संवाद,हृषीकेश मुखर्जी यांचे अप्रतिम दिग्दर्शन,नेत्रदिपक छायाचित्रण जयवंत पाठारे यांच, मजरूह सुलतानपुरी यांची सुरेल गाणी, सचिन देव बर्मन यांच सुश्राव्य संगीत दिग्दर्शन आणि ती तितक्याच प्रभावीपणे सादर केली ती गायकांची मांदियाळी अर्थात किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मनहर उधास, सचिन देव बर्मन, अनुराधा पौडवाल.आता सांगा बरं चित्रपट निर्मितीतील कुठलं अंग सुटलं. हा चित्रपट सितार वादक रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यातील अडचणीत आलेल्या विवाहावर आधारित आहे असं म्हटल जातं.पण लेखक राजू भारतन यांच्या मते, हृषीदांनी सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि त्यांची पहिली पत्नी रुमा घोष यांच्या जीवनावर चित्रपटाची कथा लिहिली आहे. कुठतरी या चिटपटास हिंदी भाषेतील संगीत नाटक चित्रपट आहे असं म्हटले असल्याचं वाचलं.चित्रपटाची कथा थोडक्यात पाहू.

चित्रपटाची कथा      

सुबीर कुमार (अमिताभ बच्चन) हा एक व्यावसायिक गायक आहे जो प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.उमा (जया भादुरी) ला भेटेपर्यंत त्याला तिच्याशी लग्न होईल याची कल्पना नसते. उमा गावात दुर्गा मौसी (दुर्गा खोटे) सोबत राहत असते. तिच्याशी लग्न करून सुबीर कुमार तिला मुंबईला घेऊन येतो. तिची गायनाची कारकीर्द सुरू करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करतो. दरम्यान सुबीर कुमारला मिळणारी प्रसिद्धी कमी होते आणि उमाला खूप प्रसिद्धी मिळू लागते आणि तिच्या पतीपेक्षाही ती अधिक प्रसिद्ध गायिका बनते. यामुळे सुबीर उमाचा तिरस्कार करू लागतो आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो.पुढे भावनिक वळणात, उमा गर्भवती असते आणि नवीन जीवांच्या आगमनाची चाहूल त्यांना जवळ आणते कां? “तेरे मेरे मिलन की ये रैना ह्या गाण्यामुळे   शेवटी दोघांचे भावनिक पुनर्मिलन होते कां? हे खरोखर पहाण्यासारखे होते.

 चित्रपटातील गाणी

1. "अब तो है तुमसे हर खुशी अपनी" (लता मंगेशकर)

2. "तेरी बिंदिया रे" लता मंगेशकर, मोहम्मद रफी

3. "तेरे मेरे मिलन की ये रैना" किशोर कुमार, लता मंगेशकर

4. "नदियाँ किनारा" लता मंगेशकर

5. लता मंगेशकर यांचे "पिया बिना पिया बिना"

6. किशोर कुमारचे "रे मित ना मिला रे मनका".

7. "लुटे कोई मन का नगर" लता मंगेशकर, मनोहर उधास

नामांकन आणि पुरस्कार

1974 सचिन देव बर्मन फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत संयोजक पुरस्कार जिंकला.

जया बच्चन यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

असरानी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता.

सारांश

            हा चित्रपट मी पहिल्यांदा पाह्यला तेव्हा मी केवळ नववीत होतो.अमिताभ सोबत त्यावेळेस सचिन देव बर्मन यांची गाणी, त्यातील माझा फेवरीट गायक किशोर कुमारची गाणी यासाठी चित्रपट पाहिला होता.त्यानंतर टीव्हीवर हा चित्रपट जेव्हा जेव्हा दाखवला गेला.तेव्हा तेव्हा मी पाहिला.आज या ब्लॉगमधे कुठल्या गाण्याचा अंतर्भाव करावा हे माझं निश्चित होत नव्हतं. मग “पिया बिना बसेरा” ही लता मंगेशकर यांच गाणं आणि "मित ना मिला रे मनका " हे किशोर कुमार यांनी गायलेले गाणं निवडलं ते ऐका.  


आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. Top class picture wigh yop class songs. Apla blog pan top class

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...