Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

राजेश रोशन -कर्णमधुर गीतांचा संगीत दिग्दर्शक

 Blog No. 2023/129  

Date: 23rd, May 2023.


मित्रांनो,

             “छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ स्व. किशोरकुमार यांनी गायिलेले हे सुंदर गीत तुम्हाला आठवत असेल.या सुंदर गीताला तेवढीच सुंदर चाल संगीतकार देणारे राजेश रोशन यांचा जन्म दिवस त्यांचे अभिष्टचिंतन करणारा हा आजचा ब्लॉग.

 

प्रास्ताविक

               राजेश रोशन लाल नगरठ यांचा जन्म 24 मे 1955 चा.हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोशन आणि गायिका इरा रोशन यांचे पुत्र. राजेश यांचे वडील पंजाबी आणि आई बंगाली. राजेश यांना दोन मुले आहेत. ईशान रोशन हा मुलगा आणि पश्मिना रोशन. राजेश रोशन हे प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचे बंधु आणि अभिनेता हृतिक रोशनचे काका.                           

 कारकीर्द

            राजेश रोशन यांना सर्वात पहिल्यांदा संधी दिली ती अभिनेता महमूद याने.मेहमूदचा कुंवारा बाप हा राजेश रोशनचा संगीत असलेला पहिला चित्रपट 1974 ला आला होता. यातलं “सज रही गली मेरी मा सूनहरे गोटेमे” हे महंमद रफी यांनी गायिलेले गीत खूप लोकप्रिय झाले होते. याच चित्रपटातलं किशोरकुमारने गायिलेले “मै हूं घोडा ये है गाडी मेरी रिक्शा सबसे निराली” हे गाणे देखील खूप गाजले. त्यानंतर आला तो ‘जुली’ हा चित्रपट. विक्रम आणि लक्ष्मी ही नवी जोडी असलेला चित्रपट खूप गाजला आणि यातील गाणी देखील.”भूल गया सब कुछ याद नाही अब कुछ” हे किशोर-लता चे युगल गीत, किशोरकुमारचे “दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाये” ही गाणी खूप गाजली.‘जुली’ साठी राजेश रोशन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.

            यानंतर देव आनंद यांचे सलग तीन चित्रपट आले. देस परदेस, मन पसंद आणि लूटमार. देस परदेस मधील “नजराना भेजा किसी ने प्यार का” किशोरकुमारनी गायिलेले गाणे खूप गाजले.तसेच “जैसा देस वैसा भेस फिर का डरना” हे किशोर-लता युगल गीत खूप गाजले. लूटमार मधील आशा भोसले यांचे “जब चाहे मेरा जादू कोई बच ना पाय” या गीताने तर अक्षरशः धूम केली. मामा भांजा, दूसरा आदमी, मुकद्दर, स्वामी, प्रियतमा, यही है जिंदगी, एक ही रास्ता, स्वर्ग नरक, इंकार, खट्टा मीठा, बातों बातों में, दो और दो पांच,याराना यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले. कामचोर, हमारी बहू अलका, जाग उठा इंसान, भगवान दादा, घर संसार यानंतर राजेश खन्ना यांच्यासोबत जनता हवालदार, निशान, बाबू आणि आखिर क्यों हे चित्रपट केले.


त्यांची लोकप्रिय गाणी

            त्यांच्या लोकप्रिय गीतांची खरं तरं एक मोठी यादी होईल. मलाच इतकी गाणी माहिती आहेत की अगदी गूगलची मदत न घेता सुद्धा करता येईल.

 


1.      “स्वामी”  यादो मे वो सपनो मे है जाये कहा- किशोरकुमार  

2.     “स्वामी”  का करू सजनी आये ना बालम-येसुदास

3.      “स्वामी” पल भर मे ये क्या हो गया- लता मंगेशकर

4.     “प्रियतमा” कोई रोको ना दिवाने को मन मचल रहा-किशोरकुमार

5.      “इंकार” मुंगडा मुंगडा मै मुडके चली-उषा मंगेशकर

6.     “खट्टा मीठा” थोडा है थोडे की जरूरत है-किशोरकुमार लता मंगेशकर  

7.     “खट्टा मीठा” ये जीना है अंगूर का दाना- किशोरकुमार-उषा मंगेशकर

8.      “याराना” तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना-किशोरकुमार

9.      “याराना”  “छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ किशोरकुमार

10.    “याराना” भोले ओ भोले तू रुठा दिल टुटा-किशोरकुमार

11.    “काम चोर” तुझ संग प्रीत लगायी सजना-किशोरकुमार-लता मंगेशकर

12.   “मि.नटवरलाल” परदेसिया ये सच है पिया-लता मंगेशकर-किशोरकुमार

13.   “बातो बातोमे” सुनिये कहिये कहिये सुनिये-आशा भोसले-किशोरकुमार

14.   “कहो ना प्यार है” दिल ने दिल को पुकारा-बाबूल सुप्रियो आणि कोरास

 

समारोप

 अशा या सुमधुर आणि कर्णप्रिय संगीतकार राजेश रोशन यांना त्यांच्या 59 व्या वाढदिवसाबद्दल मनापासून शुभेच्छा आणि त्यांच्या कडून अशीच संगीत सेवा घडत राहो शुभेच्छा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु,पुणे.    

Comments

  1. मीनल ओगले.May 24, 2023 at 1:37 PM

    राजेश रोशन यांनी संगीत दिलेली गाणी मला पण आवडतात.त्यांचे वडील रोशन यांनी संगीत दिलेली गाणी पण मला आवडतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...