Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

Highway Hypnosis- हायवे संमोहन

Blog No. 2023/136  

Date: 31st, May 2023.

 

मित्रांनो,

            सोशल मीडिया हे नेहमीच वाईट नसते. काही वेळा त्यात बऱ्याचदा आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी माहित होतात.आपला सहजासहजी काही गोष्टीवर विश्वास बसत नाही.मग त्या बद्दल अधिक जाणून घ्यावे लागते.अशी एक गोष्ट मला आज माहित झाली. मी कधी याबद्दल ऐकलेले नव्हते.कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी हे ऐकले असेल.ती गोष्ट म्हणजे हायवे हिपनोसिस,अर्थात महामार्ग संमोहन.आज या बद्दल जाणून घेऊया. कारण ही त्या लोकांसाठी खूप कामाची आणि महत्वाची गोष्ट आहे,जे आपली स्वतःची कार म्हणा बाइक म्हणा घेऊन लॉन्ग ड्राइवला जातात.                    

प्रास्ताविक

            हायवे संमोहन, ज्याला व्हाईट लाइन फिव्हर देखील म्हणतात.ही एक मानसिक अवस्था आहे जी तुम्ही जेव्हा लांब पल्ल्याच्या ड्रायविंगवर निघता त्यावेळेस जाणवू शकते.परिचित किंवा नीरस रस्त्यांवर वाहन चालवताना जागरूकता आणि लक्ष कमी झाल्यामुळे हे घडू शकते. या अवस्थेत, ड्रायव्हरचे जागरूक मन वरवर पाहता पूर्णपणे इतरत्र केंद्रित असलेले,तरीही सुरक्षितपणे वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी ते करत असल्याचे भासते.कधी कधी नीरस रस्त्यांवर वाहन चालवताना जागरूकता आणि लक्ष कमी झाल्यामुळे असे होऊ शकते.जेव्हा एखादी व्यक्ती हायवे संमोहन अनुभवत असते, तेव्हा ते ट्रान्स सारख्या अवस्थेत प्रवेश करू शकतात,जिथे त्यांचे मन तात्काळ वातावरणापासून डिस्कनेक्ट होते.यामुळे एकाग्रतेचा अभाव, सभोवतालची जागरूकता कमी होणे आणि रस्त्यावरील अनपेक्षित घटनांवर प्रतिक्रिया देण्याची क्षमता कमी होऊ शकते.ड्रायव्हर शारीरिकदृष्ट्या उपस्थित असल्याचे दिसते, परंतु त्यांचे लक्ष आणि मानसिक लक्ष कमी होत आहे.

हायवे हिपनोसिस केव्हा आणि कसे होऊ शकते  

            हायवे संमोहन बहुतेक वेळा सुप्रसिद्ध मार्गांवर होते,जसे की दैनंदिन प्रवास किंवा सरळ महामार्गांचे लांब पल्ले. या रस्त्यांचे नीरस स्वरूप अशी मानसिक स्थिती निर्माण करू शकते.ज्यामध्ये चालक "ऑटोपायलट" मोड मध्ये जातो.हे असे की मन अर्ध-जाणीव अवस्थेत प्रवेश करते,तर शरीर सवयी प्रमाणे ड्रायव्हिंगचे  कार्ये करत असते.या अवस्थे दरम्यान ड्रायव्हर्सना ठराविक खुणा पार केल्याचे आठवत नाही किंवा रस्त्यावर असलेले कोणतेही संभाव्य धोके आठवत नाहीत.

हायवे संमोहन कल्पना 1950 च्या दशकात लोकप्रिय झाली. "हायवे संमोहन" हा शब्द 1963 मध्ये जी. डब्ल्यू.विल्यम्स यांनी पहिल्यांदा उपयोगात आणला.अर्नेस्ट हिलगार्ड (1986, 1992) यांच्या सिद्धांतावर आधारित संमोहन ही जागरूकतेची बदललेली अवस्था आहे,यात चेतनेचा एक प्रवाह कार चालवित असतो तर दुसरा इतर बाबी हाताळत असतो. हायवे संमोहनात  ड्रायव्हर कधी कधी आंशिक किंवा पूर्ण स्मृतिभ्रंश अवस्थेत जाऊ शकतो.

हायवे संमोहनामुळे उदभवणारे धोके

          ड्रायव्हर हायवे संमोहनाच्या स्वाधीन गेला,तर रहदारीतील बदलांना किंवा अनपेक्षित परिस्थिती आली तर त्याचा सामना करण्याची ड्रायव्हरची क्षमता कमी होते.लक्ष न दिल्याने किंवा जागरूकता कमी झाल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषत: नको तिथे ब्रेक मारणे किंवा जिथे ब्रेक मारणे आवश्यक आहे तिथे  टाळाटाळ करणे असे प्रकार घडू शकतात.म्हणजेच अपघात होण्याची शक्यता वाढू शकते.   

हायवे संमोहनाची कारणे

          हायवे संमोहनाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील.

1.      नीरस रस्त्यावर ड्राइव करणे.कधी कधी रोज त्याच त्या रस्त्यावर दूर जावे लागत असेल तर एक प्रकारची निरसता येते.

2.     कमी गर्दीच्या रस्त्यावर ड्राइव करणे.

3.     फोन वर बोलत असतांना ड्राइव करणे.

4.    सतत ड्राइव करणे.लांब पल्ल्याच्या ड्रायविंगवर निघतांना मध्ये ब्रेक न घेणे.

5.     थकवा किंवा तणावग्रस्त असणे.

 हायवे संमोहन टाळण्यासाठीचे उपाय

          हायवे संमोहन या बद्दल बरेच काही लिहिल्यानंतर म्हणजे अपघाताची शक्यता असते वगैरे.त्यानंतर हे सर्व टाळण्यासाठी काय उपाय करावेत हे सांगणे गरजेचे आहे.

1.      दर दोन तासांनी ब्रेक घ्यायला हवा.अगदी पाच मिनिटांचा ब्रेक असला तरी चालेल.पण हायवे संमोहन ही अवस्था टाळण्यासाठी आणि त्या अवस्थेत प्रवेश झाला असेल तरी ब्रेक घेतल्याने मन आणि डोकं  पूर्व पदावर येण्यास मदत होईल.

2.     गाडी चालवतांना संगीत ऐका आणि फोनवर बोलणे शक्यतो टाळा किंवा बोलणे आवश्यकच असेल तर शक्यतो कमी बोला.

3.     सतर्क रहा आणि रस्त्यावर आपले लक्ष असू द्या.

4.    सहप्रवासी असेल तर त्याच्याशी गप्पा मारा म्हणजे हायवे संमोहन ही अवस्था टाळता येईल.

5.     तसेच हायवे संमोहन म्हणजे काय हे माहित झाल्यावर कधी हायवे संमोहनाचा अनुभव येत असेल तर गाडी रस्त्याच्या बाजूला घ्या,stretching चे व्यायाम काही मिनिटे करा किंवा थोडे फिरा म्हणजे डोकं शांत होण्यास मदत होईल.

 

सारांश

आपली कार काढून लांब पल्ल्याच्या सफरसाठी निघणाऱ्या साऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती असल्याने,कृपया आपले नातेवाईक किंवा मित्र परिवार यांच्यापर्यन्त ही माहिती पोहोचेल हे अवश्य करा. कदाचित ह्यामुळे कुणाचा फायदा होईल.तेव्हा ह्या ब्लॉगची लिंक अवश्य इतरांना उपलब्ध करुन द्या.आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

  1. होय, शक्यतो ही अवस्था एकदम सरळ, सुपर फाइन रस्त्यावर जास्त प्रमाणात होत असते कारण या रस्त्यावर वारंवार ब्रेक करने, स्टेरिंग फिरविने, गतिमधे चढ़ाव ऊतार नसल्यामुळे वाहनाची गती स्थिर होऊन चालक एका विशिष्ट अवस्थेमधे स्थिर होतो. म्हणजेच शरीराच्या हालचाली बंद होऊन मेंदू सुद्धा क्रियाहीन होतो.आणि अशा अवस्थेमधे चालकाचा वाहना वरील नियंत्रण सुटतो आणि अशावेळी अपघात होण्याची फार जास्त शक्यता असते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...