Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

गुरु शिष्य एक आगळे नाते



 Blog No. 2023/85      

Date: 6th,April 2023


 

मित्रांनो,

            मी नुकतीच श्री ज्ञानेश्वरी वाचायला घेतली.सध्या तरी चाळलीच आहे,म्हणावे लागेल.श्री ज्ञानेश्वरी ही भगवत गीतेवरील टीका आहे.अर्थात सोप्या शब्दांत म्हणायचे झाल्यास,श्री ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित ग्रंथ आहे.भगवत गीता हा गुरु आणि शिष्यामधील संवाद आहे.भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली असे आपण नेहमी म्हणतो.पण श्री ज्ञानेश्वरी चाळतांना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.ती म्हणजे इथे गुरु म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत.पण त्यांचा शिष्य अर्जुनाने,जे प्रश्न श्रीकृष्णाला विचारले आहेत.त्याच्या उत्तरात अखिल ब्रम्हाण्डचे सार भगवान श्रीकृष्णाने कथन केले आहे.म्हणजेच ते प्रश्न विचारणारा शिष्योत्तम अर्जुन हा सुद्धा विद्वान होता. हे जाणवते. 

 गुरु शिष्य नाते

            गुरु हा कितीही अष्टावधानी असला तरी शिष्य देखिल तेवढाच ताकदीचा असणे गरजेचे असते.असे गुरु शिष्य एकमेकांस भेटले की किंवा तरच भगवत गीते सारख्या ग्रंथाची निर्मिती होते.हेच खरे.सुधीर मोघे यांनी एका गीतात म्हटले आहे की “घनतमात जणू दीप चेतवी, तनमनात चैतन्य जागवी,कणकणात जणू प्राण डोलवी,जे अरुप  त्या देई रूप, करी मूर्त तो अमूर्ता.” समजावयास अतिशय सोपे असले तरी आशयघन असे हे गीत आहे.आपले मूल ज्यावेळेस शाळेत जाते,त्यावेळेस त्याला काही ज्ञान नसते.म्हणजे ते शाडू मातीसारखे अरूप असते.त्या अरुपाला नुसते रूप नाही तर स्वरूप देण्याचे काम गुरु करीत असतो.ज्ञानाने अमूर्त अशा त्या मुलास ज्ञानाने मूर्त करण्याचे काम गुरु करीत असतो. अखिल विश्वात गुरु शिष्य हे नाते हे अनोखे असते. लहानपणी मुलाला बाजारात घेऊन गेलो असतांना,अचानक टीचरचे भेटणे,त्या वेळी त्या चिमूकल्याचा आनंद जेव्हा पाहण्यासारखा असतो. तेवढेच निर्मळ हे मोठेपणी गुरु भेटल्यावर होणारे सुख असते.अगदी खूप मोठ्या पदावर पोहोचल्यावर देखिल गुरु दिसताच आपण नतमस्तक होतो.       

 शिष्य कसा असावा

            समर्थ रामदास स्वामी म्हणतात केवळ गुरु अष्टावधानी असून होत नाही,तर शिष्य हा हुशार असला,तल्लख बुद्धीचा असला गुरूला एक वेगळा आनंद मिळतो. गुरुकडे असणारा ज्ञानाचा साठा त्याला शिष्यास द्यावयाचा असतो. कारण गुरूचा जीवनाचा उद्देशच तो असतो. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे “जे जे  आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे,शहाणे करून सोडावे सकल जन” गुरु आपले कार्य करीत असतो.शिष्य देखिल प्रज्ञावंत असावा,तो ज्ञान अर्जन करण्यास उत्सुक असावा,तो चौकस असावा. त्याने प्रश्न विचारण्यास संकोच करु नये किंवा संकोची नसावा.खरं तरं समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधात गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण यांचे वर्णन केले आहे.अर्थात ते सर्व आदर्श या प्रकारात मोडणारे आहेत.तसे गुरु आणि शिष्य मिळणे आज कठीणच असले. तरी आजच्या गुरूंना मी कमी लेखणार नाही. आजकालच्या मुलांमध्ये लहानपणीच असलेली अफाट बुद्धिमत्ता पहाता, त्या मुलांना सामोरे जाणे हे देखिल मोठे काम आहे. गुरुला देखिल असे आव्हानात्मक शिष्य आवडतात.कारण गुरूंच्या बुद्धिमत्तेचा यात कस तर लागतोच पण अशा विद्यार्थ्याला शिकविण्याची मजा किंवा आनंद काही वेगळा असतो. 


            त्याच सोबत शिश्याच्या मनात गुरुविषयी आदरभाव असणे गरजेचे आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ हे नेहमी शिश्याच्या मनात असले पाहिजे.गुरुची भक्ति कां करावी कारण चातुर्य हे अंगात असते.पण चातुर्याला शहाणपण लाभते ते गुरुमुळे.त्याच प्रमाणे संत एकनाथ आपल्या एका अभंगात म्हणतात की “गुरु परमात्मा परेशु. ऐसा ज्याचा दृढ विश्वासू !!” ज्या वेळेस शिष्याचा गुरु हा परमात्मा आहे आणि तोच ईश्वर आहे. आणि तो आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाईलच असा दृढ विश्वास असतो. तेव्हाच तो आपल्या गुरुरुपी ज्ञानसाठयातून ज्ञानार्जन करु शकतो, हेच खरे.


प्रसाद नातु,पुणे 



Comments

  1. अप्रतिम, आज गुरुपौर्णिमा असल्यासारखेच वाटले

    ReplyDelete
  2. ,great! You too are a serious Shishya!

    ReplyDelete
  3. Very well write up. Bhavana Natoo.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...