Blog No. 2023/85
Date: 6th,April 2023
मित्रांनो,
मी
नुकतीच श्री ज्ञानेश्वरी वाचायला घेतली.सध्या तरी चाळलीच आहे,म्हणावे लागेल.श्री
ज्ञानेश्वरी ही भगवत गीतेवरील टीका आहे.अर्थात सोप्या शब्दांत म्हणायचे झाल्यास,श्री
ज्ञानेश्वरी गीतेवर आधारित ग्रंथ आहे.भगवत गीता हा गुरु आणि शिष्यामधील
संवाद आहे.भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली असे आपण नेहमी म्हणतो.पण श्री
ज्ञानेश्वरी चाळतांना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.ती म्हणजे इथे गुरु म्हणजे
साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत.पण त्यांचा शिष्य अर्जुनाने,जे प्रश्न श्रीकृष्णाला
विचारले आहेत.त्याच्या उत्तरात अखिल ब्रम्हाण्डचे सार भगवान श्रीकृष्णाने कथन केले
आहे.म्हणजेच ते प्रश्न विचारणारा शिष्योत्तम अर्जुन हा सुद्धा विद्वान होता. हे
जाणवते.
गुरु शिष्य नाते
गुरु हा कितीही अष्टावधानी असला तरी शिष्य देखिल तेवढाच ताकदीचा असणे गरजेचे असते.असे गुरु शिष्य एकमेकांस भेटले की किंवा तरच भगवत गीते सारख्या ग्रंथाची निर्मिती होते.हेच खरे.सुधीर मोघे यांनी एका गीतात म्हटले आहे की “घनतमात जणू दीप चेतवी, तनमनात चैतन्य जागवी,कणकणात जणू प्राण डोलवी,जे अरुप त्या देई रूप, करी मूर्त तो अमूर्ता.” समजावयास अतिशय सोपे असले तरी आशयघन असे हे गीत आहे.आपले मूल ज्यावेळेस शाळेत जाते,त्यावेळेस त्याला काही ज्ञान नसते.म्हणजे ते शाडू मातीसारखे अरूप असते.त्या अरुपाला नुसते रूप नाही तर स्वरूप देण्याचे काम गुरु करीत असतो.ज्ञानाने अमूर्त अशा त्या मुलास ज्ञानाने मूर्त करण्याचे काम गुरु करीत असतो. अखिल विश्वात गुरु शिष्य हे नाते हे अनोखे असते. लहानपणी मुलाला बाजारात घेऊन गेलो असतांना,अचानक टीचरचे भेटणे,त्या वेळी त्या चिमूकल्याचा आनंद जेव्हा पाहण्यासारखा असतो. तेवढेच निर्मळ हे मोठेपणी गुरु भेटल्यावर होणारे सुख असते.अगदी खूप मोठ्या पदावर पोहोचल्यावर देखिल गुरु दिसताच आपण नतमस्तक होतो.
शिष्य कसा असावा
समर्थ रामदास स्वामी म्हणतात केवळ गुरु अष्टावधानी असून होत नाही,तर शिष्य हा हुशार असला,तल्लख बुद्धीचा असला गुरूला एक वेगळा आनंद मिळतो. गुरुकडे असणारा ज्ञानाचा साठा त्याला शिष्यास द्यावयाचा असतो. कारण गुरूचा जीवनाचा उद्देशच तो असतो. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे “जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे,शहाणे करून सोडावे सकल जन” गुरु आपले कार्य करीत असतो.शिष्य देखिल प्रज्ञावंत असावा,तो ज्ञान अर्जन करण्यास उत्सुक असावा,तो चौकस असावा. त्याने प्रश्न विचारण्यास संकोच करु नये किंवा संकोची नसावा.खरं तरं समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधात गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण यांचे वर्णन केले आहे.अर्थात ते सर्व आदर्श या प्रकारात मोडणारे आहेत.तसे गुरु आणि शिष्य मिळणे आज कठीणच असले. तरी आजच्या गुरूंना मी कमी लेखणार नाही. आजकालच्या मुलांमध्ये लहानपणीच असलेली अफाट बुद्धिमत्ता पहाता, त्या मुलांना सामोरे जाणे हे देखिल मोठे काम आहे. गुरुला देखिल असे आव्हानात्मक शिष्य आवडतात.कारण गुरूंच्या बुद्धिमत्तेचा यात कस तर लागतोच पण अशा विद्यार्थ्याला शिकविण्याची मजा किंवा आनंद काही वेगळा असतो.
प्रसाद नातु,पुणे
अप्रतिम, आज गुरुपौर्णिमा असल्यासारखेच वाटले
ReplyDelete,great! You too are a serious Shishya!
ReplyDeleteVery well write up. Bhavana Natoo.
ReplyDelete🙏
ReplyDelete