Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

उत्पल दत्त प्रतिभाशाली अभिनेता

 Blog No. 2023/76     

Date: 29, March 2023

 

मित्रांनो,

            आठवतोय तो “गोलमाल” चित्रपटातील ‘भवानी शंकर’ अमोल पालेकर चा बॉस किंवा “रंगबिरंगी” मधील इंस्पेक्टर धुरंधर भाटवडेकर.नक्कीच आठवत असणार. वैशिष्ठपूर्ण शब्दफेक, आवाजातील चढउतार या जोरावर विनोदी आणि तितक्याच जबरदस्त केलेल्या खलनायकाच्या भूमिका.उत्पल दत्त ह्या बंगाली रंगभूमीच्या कलावंताने हिन्दी पडद्यावर सहजतेने भूमिका केल्या.

प्रास्ताविक

            आज उत्पल दत्त यांची जयंती.29 मार्च, 1929 मध्ये बारीसाल येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गिरिजरंजन दत्ता. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, कलकत्ता येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्य ऑनर्ससह पदवी प्राप्त केली. ते एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक-नाटककार होते.सुरुवातीला त्यांनी बंगाली थिएटरमधे काम केले. आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून  अधिक बंगाली आणि हिन्दी चित्रपटातून काम केले. अनेकांना या गोष्टीची कल्पना देखिल की अमिताभ बच्चन यांच्या सोबत “सात हिंदुस्तानी” मध्ये त्यांनी मुख्य नायकाची भूमिका केली होती. उत्पल दत्त हे आजीवन मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सक्रिय समर्थक देखील होते.

1960 मध्ये, दत्त यांनी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी विवाह केला. त्यांची एकुलती एक मुलगी, बिष्णुप्रिया दत्त, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीजची प्राध्यापक होती. 

त्यांचे गाजलेले चित्रपट

1.       भुवन शोम          1969

2.       गुड्डी                1971   

3.       मेरे जीवन साथी   1972

4.       सबसे बडा रुपैय्या 1972

5.       अमानुष             1975

6.       जुली                 1975

7.       दो अंजाने           1976

8.       संतान                1976

9.       ईमान धरम          1977

10.  आनंद आश्रम     1977

11.  अनुरोध              1977

12.  दुल्हन वही जो पिया मन भाये 1977

13.  प्रियतमा             1977

14.  स्वामी                1977

15.  कर्तव्य               1979

16.  गोलमाल            1979

17.  द ग्रेट गैम्बलर     1980

18.  राम बलराम        1980

19.  नरम गरम           1981

20.  बरसात की एक रात 1981

21.  शौकीन              1981

22.  रास्ते प्यार के       1982

23.  हमारी बहू अलका 1982

24.  अंगूर                 1982

25.  रंग बिरंगी           1983

26.  ईन्कलाब            1984

27.  साहेब                1985

पुरस्कार आणि सन्मान

1970 भुवन शोम सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1980  गोलमाल फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1982 नरम गरम फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1984 रंग बिरंगी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1990 संगीत नाटक अकादमी फेलोशिप रंगभूमीवरील आजीवन योगदानासाठी

मृत्यु

            19 ऑगस्ट 1993 रोजी, उत्पल दत्त यांचे  एसएसकेएम हॉस्पिटल, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथून घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

या प्रतिभाशाली अभिनेत्याला त्याच्या 94 व्या जयंतीदिनी आदरांजली.

फोटो सौजन्य @ विकिपीडिया  

प्रसाद नातु,पुणे  

Comments

  1. गोलमाल मधील अभिनय अविस्मरणीय

    ReplyDelete
  2. उत्पल दत्त--एक उत्कृष्ट अभिनेता ,अभिनयाची उत्तम जाण होती.त्यांच्या अनेक भूमिका अविस्मरणीय आहेत.छान ब्लाॅग. -----भावना नातु.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...