Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

परिमळाची धांव भ्रमर ओढी

 Blog No. 2023/70      

Date: 20th, March 2023.


मित्रांनो,

            आज संत ज्ञानेश्वर यांचा जन्मदिवस किंवा त्यांनी संजीवन समाधी घेतली तो दिवस देखिल नाही. पण मला गाणी ऐकत बसलो असता एक संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग ऐकायला मिळाला. तसे हे भजन पंडित अजित कडकडे यांनी बऱ्याच वर्षापूर्वी गायलेले.पंडितजींनी नेहमी प्रमाणेच अतिशय सुरेख गायले आहे.भजनातील अर्थाशी तन्मयता पावत अगदी समरस होऊन हे भक्तीगीत गायले आहे.

 

परिमळाची धांव भ्रमर ओढी

            हा तो संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे पंडित अजित कडकडे यांनी खूपच सुरेख गायला. पण मला त्यापेक्षा अधिक भावला तो या अभंगाचा अर्थ तो पुढीलप्रमाणे,

 

परिमळाची धांव भ्रमर ओढी

            तैसी मज लागो तुझी गोडी, भ्रमर ओढी ! १ !

 

भुंग्याला जशी सुगंधाची आवड असते,त्यामुळे तो सुगंधाकडे आकर्षित होतो,ओढला जातो.तद्वताच बा पांडुरंगा मला देखिल तुझी गोडी लागो आणि मी देखिल तुझ्याकडे आकर्षित व्हायला हवा.

 

            अवीट गे माये विटेना

            जवळी आहे परी भेटे ना  ! २ !

हे भगवंता तुझे स्वरूप अवीट आहे.म्हणजे जे कधी निस्तेज होत नाही, ज्याचा कधी वीट येत नाही, अर्थात वारंवार तुझे दर्शन घेतले तरी कधी कंटाळा येत नाही, असेच आहे. पण तू इतका जवळ  असून देखिल तुझी भेट होत नाही.

 

            तृषा लागलिया जीवनाते ओढी

            तैसी तुझी गोडी लागो या जीवा ! ३ !

तहान लागल्यावर जसा जीव पाण्याकडे ओढला जातो.अगदी तहानेने व्याकुळ होऊन पाण्याकडे धांव घेतो. अगदी तसाच मी तुझ्या दर्शनासाठी कासावीस होवो, तुझ्या दर्शनासाठी आतुर होवो.




            बापरखुमादेवीवरा  विठ्ठली आवडी

            गोडियेसि गोडी मिळोन गेली  ! ४ !

रखुमाईचा पती आणि माझा पिता असा जो तो विठ्ठल त्याची मला गोडी लागली आहे.त्याच्या दर्शनात जी गोडी आहे आणि मला जी त्याची गोडी लागली आहेत.त्या गोडीत गोडी मिसळून गेली आहे.अर्थात त्याच्या स्वरूपाशी मी एकरूप होऊन गेलो आहे,त्याच्याशी समरस झालो आहे, तादात्म्य पावलो आहे.  

 

किती सुंदर अर्थ आहे या भजनाचा. यशवंत देव यांच्या “शब्दप्रधान गायकी” या पुस्तकात त्यांनी  लिहिले आहे की गायक हा जर गीताचा अर्थ समजून गायला तर त्या गाण्यात जीव येतो. परमेशाची भक्ती ही देखिल अशीच समजून,उमजून करण्यासारखी गोष्ट आहे.आपल्याला परमेश्वर कधी दर्शन कां देत नाही. कारण आपण वरवरची भक्ती करतो मित्रांनो.हेच ह्या अभंगाच्या निमित्ताने लिहावयाचे होते. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू या, उद्याच्या ब्लॉग मधे.


 

 

प्रसाद नातु, पुणे.

 

 

                    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...