Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

मोठ्या थकित कर्जदारांना कर्ज माफी मिथ्या काय तथ्य काय?

Blog No. 2023/73        

Date: 24th, March 2023. 



मित्रांनो,

            काल मी अमेरिकेतील बँकांच्या कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांच्या स्थितिबद्दल लिहिले होते. कालच एक लेख प्रसिद्ध झाला.त्यात अर्थतज्ञांनी भारतीय बँका सुरक्षित आहेत आणि भारत सरकार व रिजर्व बँक ऑफ इंडिया त्याकडे लक्ष ठेवून असते असे म्हटले आहे.आज मी बँकिंग संबंधित एका वेगळ्या विषयाला हात घालतोय. ज्या संबंधात लोकांमध्ये खूप गैरसमज अधिक आहेत.मधूनमधून त्या संबंधीत कंडया पिकवायची कामं प्रसार माध्यमे,राजकीय पक्ष करीत असतात.

 

एनपीए अकाऊंट म्हणजे काय?

              मित्र हो, मला आता 3 वर्षे होतील बँकेतून सेवानिवृत्त होऊन.त्यामुळे बँकांबद्दल काही तांत्रिक गोष्टी लिहायच्या झाल्या तर मला देखिल इंटरनेटचा आधार घ्यावा लागतो.अन मग असं लक्षांत येतं की नेटवर एवढे सारे उललब्ध असतांना गैरसमज असायचे कारण असायला नको. एनपीए अकाऊंट म्हणजे काय? ह्याच्या सखोल व्याखेत मी जाणार नाही.एखाद्या कर्ज खात्यापासून बँकेला कर्ज दिलेल्या रकमेबर व्याजाची वसूली नियमित होतं नसेल व ती 90 दिवसांपेक्षा जास्त थकीत असेल तसेच मुदती कर्ज खाते जसे होम लोन, मध्ये हफ्ते नियमित परत येत नसतील  आणि  90 दिवसांपेक्षा जास्त थकीत असेल तर असे कर्ज खाते म्हणजे एनपीए खाते होय.साहजिकच कर्ज खाते एनपीए झाले की त्याच्या वसूलीसाठी प्रयत्न सुरु होतात. ज्यातही दोन प्रकार आहेत. एक तरं ते नियमित करुन घ्यायचे आणि कर्जदार नियमित करायला तयार नसेल किंवा त्याची परिस्थिति नसेल तर वसुलीसाठी जप्ती,कोर्ट केस ह्या सारखे उपाय करायचे.यात देखिल मला खोलात जायचे नाही. कारण माझा उद्देश हा आहे की एनपीए अकाऊंट विशेषतः मोठ्या उद्योगांचे एनपीए अकाऊंट आणि त्यांची कर्जमाफी या वरुन ज्या बातम्या प्रसूत केल्या जातात. त्यात मिथ्या काय आणि तथ्य काय ही तुमच्यासमोर आणणे.

 

एनपीए कर्ज खाते आणि प्रावधान (Provisioning)

            एखादे कर्ज खाते एनपीए झाले आणि ते समजा बुडीत खाते झाले तर बँकेवर त्याचा एकदम परिणाम व्हायला नको म्हणून Provisioning केले जाते.आपल्या देशातील बँका ह्या शेअर बाजारात देखिल आहेत आणि बऱ्याचशा बँकांच्या परदेशात देखिल शाखा आहेत.त्यामुळे या बँकांना आपले प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलेन्सशीट प्रसिद्ध करावी लागते.आपल्या देशातच काय जगात सर्वत्र बँकांचा सकल एनपीए किती असावा आणि शुद्ध एनपीए किती असावा याचे नियम आहे.नीरव मोदी,विजय मल्या आणि इतरांची रु.36,000 कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली अशी बातमी काही महिन्यांपूर्वी प्रसून करण्यात आली. लोकसभेत केलेल्या निवेदानाचा विपर्यास करुन ही बातमी प्रसारित करण्यात आली.ह्यात तथ्य किती मिथ्या किती ते पाहू या.         

 

मिथ्या काय तथ्य काय?

            मी वर लिहिले आहे की बँकांची प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट आणि बॅलेन्सशीट प्रसिद्ध करावी लागते.त्यामुळे त्यात सकल एनपीए (Gross NPA) किती असावा आणि शुद्ध एनपीए (Net NPA) किती असावा याचे नियम असल्याने बँका एनपीए खात्यासंबंधातील वसूलीची सर्व प्रक्रिया जसे मालमत्ता जप्त करणे, कोर्ट केस केस करणे हे सर्व वसुलीचे प्रयत्न सुरु ठेवते मात्र हे मोठमोठाले एनपीए खाते आपल्या पुस्तकातून राइट ऑफ करते. त्याला टेक्निकल राइट ऑफ किंवा prudential राइट ऑफ म्हणतात.ह्याचा अर्थ ही कर्जे माफ केली जात नाही. त्यातून वसूल झालेली सर्व रक्कम ही बँकेच्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये जमा होते.ही कर्ज माफी नाही, ही एक बूक एंट्री असते. शेतकऱ्यांची कर्जे जेव्हा माफ केली जातात,तेव्हा त्यांच्याविरुद्ध वसुलीच्या साठी कोर्ट केसेस् दाखल केल्या जात नाहीत. ती कर्जे खरोखर माफ केली जातात. इतकेच नव्हे तर ते पुनः नविन कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे विजय मल्या किंवा नीरव मोदी इत्यादींची कर्ज माफ झाली असे कुणी सांगितले तर विश्वास ठेवू नका.अशा लोकांकडून बँक कर्ज वसूल करतेच.आणि असे आहे म्हणूनच भारतीय बँका टिकून आहेत.भारतातील बँकांना रिजर्व बँकेने आता हे निर्बंध लागू केले आहेत की त्यांचा provision coverage ratio हा 70% पेक्षा अधिक असायला हवा.ह्याचा अर्थ जेवढी रक्कम एनपीए खात्यामध्ये आहे त्याच्या 70% राशी ही बँकांनी आपल्या प्रॉफिट अँड लॉस मधून बाजूला काढून ठेवावी.म्हणजे एखादे खाते बुडीत खाते झाले तर त्याचा बँकेवर आणि परिणामी ठेवीदाराच्या ठेवीवर आणि त्यांच्या विश्वासावर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको.

             मला असे वाटते की भारतीय बँकांचा provision coverage ratio हा 80% पेक्षा जास्त आहे.ही देखिल तुमची बँक भक्कम असल्याची आणि तुमची बँक सुरक्षित पावती आहे. मला एका गोष्टीने खूप छान वाटले की आज बँकेत काम करणाऱ्यांना नेटवर किती माहिती उपलब्ध आहे.अन्यथा मला सेवानिवृत्तीच्या 3 वर्षानंतर इतकी माहिती लक्षात रहाणे शक्य नव्हते.त्यासाठी संकल्पना समजून घेणे आणि त्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. Up-dation तर नेटमुळे करणे सहज शक्य आहे.

 

 

प्रसाद नातु,पुणे.  

माहिती सौजन्य @अर्थात इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे             

Comments

  1. खूप छान माहितीपूर्ण लेख.
    सौ.भावना नातू.

    ReplyDelete
  2. छान माहिती

    ReplyDelete
  3. उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  4. Very useful information. Thanks.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...