Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

Open Marriage खुला विवाह

 Blog No. 2023/52        

Date: 1st March, 2023.


 

मित्रांनो,

            तीन चार दिवसांपूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपवर मी लिहिलेल्या ब्लॉगला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. लिव्ह-इन रिलेशनशिप ही संकल्पना भारतात येऊन आता जवळपास 10-15 वर्षे जुनी झालेली आहे.विवाह न करता जोडप्याने एकत्र रहायचे अश्या प्रकारची ही संकल्पना होती.भारतीय मनास न पटणारी अशीच ही एक संकल्पना आहे.पण ह्या पेक्षा धक्कादायक अशी संकल्पना म्हणजे Open Marriage. ज्यामध्ये जोडीदारीमधील भागीदार सहमत असतात की त्यातील प्रत्येक जण हा किंवा ही विवाहबाह्य संबंध ठेवू शकतो. याला एकमेकांशी प्रतारणा वगैरे समजले जात नाही. म्हणजे एखाद्याची बायको दुसऱ्या पुरुषाशी किंवा एखादीचा नवरा दुसऱ्या स्त्रीशी  विवाहबाह्य संबंध तसेच लैंगिक संबंध ठेवू शकतो.

 

खुल्या विवाहाच्या संबंधात जाणून घेऊ या  

खुला विवाह किंवा open marriage ह्याला मुक्त विवाह देखिल म्हटले जाते. खुला विवाह ह्या शब्दाचा उगम हा समाजशास्त्र  (Sociology) आणि मानववंशशास्त्र (anthropology) यातून झाला आहे. 1960 च्या सुमारास संशोधकांनी समाज आणि संस्कृतीच्या माध्यमाने होणाऱ्या प्रचलित विवाहास “बंद विवाह” (Close Marriage) ही संज्ञा दिली. नेना ओ’निल आणि जॉर्ज ओ'निल यांनी 1972 ला खुला विवाह (Open Marriage) ह्या नावाचे पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी खुल्या विवाहाचे वर्णन करतांना म्हटले आहे की ह्या विवाहात जोडीदाराला दोघांच्या नात्याबाहेर संबंध ठेवण्याची मुभा असते,ज्यात लैंगिक संबंधाचा अंतर्भाव असतो.

 पण यात घटस्फोटाचा धोका अधिक संभवतो असे एका निरीक्षणात आढळले तर दूसरे निरीक्षण ह्याचा एकमेकांशी संबंध नसल्याचे म्हणते.काही टीकाकार खुल्या विवाहावर आक्षेप घतांना म्हणतात की खुले विवाह धार्मिक तत्वांचे उल्लंघन आहे.   


  


खुला विवाह आणि भारतीय

खुल्या विवाहाची संकल्पना अजूनही अनेक भारतीयांसाठी तुलनेने नवीन आणि अपरिचित आहे आणि तिच्या स्वीकाराह्यतेबद्दलची मते लोकसंख्येच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतात.एकीकडे,भारतातील काही लोक खुल्या विवाहाला पारंपारिक मूल्ये आणि नैतिकतेचे उल्लंघन मानतात,विशेषतः  पुराणमतवादी किंवा धार्मिक समुदायांमध्ये अशी भावना आहेच.तसेच नैतिकतेची बाजू घेणाऱ्या लोकांचा अजूनही वैवाहिक जीवनात निष्ठा,वचनबद्धता आणि एकपत्नीत्वाच्या संकल्पनेवर अधिक विश्वास आहे.तर दुसरीकडे,समाजातील काही वर्गात जे मुक्त विचारसरणीचे आणि फॉरवर्ड आहेत असे ते मानतात ते खुल्या विवाहाकडे एक वैध जीवनशैलीचा पर्याय म्हणून पाहतात.हयात विशेषतः तरुणवर्ग,अधिक शिक्षित आणि पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकलेले भारतीय आहेत.खुल्या विवाहाची कल्पना भारतात नक्कीच नवीन आहे.भारतात एक  टक्‍क्‍यांहून कमी जोडप्यांनी खुला विवाह स्वीकारला आहे,त्यांनी हा पर्याय कां स्वीकारला ह्याला सबब म्हणून ते सांगतात की ते दोघांमधील लैंगिक जीवनाला कंटाळले आहेत आणि त्यांच्या नात्यातील नीरसपणा कमी करण्याचा एक उपाय म्हणून ते खुल्या विवाहाकडे बघतात.  तरी देखिल भारतात,क्वचितच,एखादे जोडपे खुल्या विवाहात असल्याबद्दल उघडपणे बोलते. कारण त्यांच्या कुटुंबातील लोकांना,घरातील स्त्रीने तिच्या पतीशिवाय इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची कल्पना करणेच शक्य नाही.भारतीय कुटुंबांसाठी स्त्री ही घर की इज्जत मानली जाते. तिच्यावर अधिकार हा केवळ तिच्या पतीचाच असतो असे मानले जाते.

 

सर्वे काय सांगतो

इंडिया टुडेच्या सेक्स सर्व्हेने केलेल्या एका सर्वेनुसार, कॅज्युअल सेक्स भारतात पूर्वीपेक्षा जास्त लोकप्रिय झाले आहे.41% पुरुष आणि 29% स्त्रिया वन-नाइट स्टँडसाठी उपलब्ध असतात.एकूण 26% लोकांनी त्यांच्या जोडीदार नसलेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवले आहेत.पण ते खुला विवाह संकल्पनेअंतर्गत नाहीत. अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की खुल्या नातेसंबंधातील लोक हे क्लोज मॅरेज मधील लोकांइतकेच आनंदी असतात.भारतात खुल्या विवाहांबद्दल कोणतीही आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे सामान्यपणे शहरातील संबंध समुपदेशकांशी (Relationship Counsellor) मुक्त विवाह संकल्पनेबद्दल विचारल्यावर त्यांनी भारतात देखिल अलीकडे ह्या संकल्पनेबद्दल लोक अनुकूलता व्यक्त करतात असे सांगितले. विशेषतः तरुण वर्ग ह्या बाबतीत अधिक अनुकूल आहे असे सांगितले.

 

रिलेशनशिप तज्ञ म्हणणे काय 

रिलेशनशिप एक्स्पर्ट किंजल पंड्या म्हणते की, खुले लग्न is not a everybodys cup of tea.ती म्हणते,“खुले विवाह फक्त अशा लोकांसाठी असतात.जे विद्रोही भूमिका घेऊ शकतात,बंद करू शकतात.जे लोक त्यांना जीवनात काय हवे आहे याबद्दल अत्यंत स्पष्ट असतात आणि जे त्यांच्या जोडीदारांना पूर्ण जागा (space) देण्याइतपत खुले असतात.मुक्त विवाह फक्त अशा लोकांसाठी आहेत,जे त्यांच्या जोडीदाराच्या बहुपत्नीक वागण्याचा स्वीकार करू शकतात.”

त्याच वेळी, हे महत्वाचे आहे की जे जोडपे खुले विवाह निवडतात,ते त्यांच्या  लैंगिक भागीदारांशी भावनिकरित्या संलग्न होणार नाही याची खात्री घेणे आवश्यक आहे.नातेसंबंध तज्ञ श्याम मिठिया म्हणतात,“तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगले ओळखत नाही याची खात्री करा.तो किंवा ती अनोळखी असल्यास ते चांगले आहे. खुल्या विवाहातील लोकांशी बोलण्याच्या,माझ्या अनुभवावरून हा सामान्य निकष आहे.जर ते अनोळखी असतील तर,सेक्ससाठी एकत्र येणे,व्यतिरिक्त त्या दोघांमध्ये फारसा संबंध नसेल.तुम्ही एका जोडीदारासोबत दोन-तीनदा पेक्षा जास्त वेळा सेक्स करु नये.तुम्ही हा नियम मोडला तर तुमचे एखाद्या व्यक्तीशी भावनिक संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता वाढते.यासाठी तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीशी तुमचे परस्परसंवाद कमीत कमी राहतील हे सुनिश्चित करा.”

शेवटी,श्याम मिठिया खुल्या विवाहाबद्दल सावधगिरीचा संदेश देतात ते म्हणतात की “खुले विवाह देखील समस्यांनी भरलेले असतात.सुरुवातीला खुले विवाह नेहमीच आनंददायी वाटतात.परंतु नंतर त्यापैकी बहुतेक लोकांसाठी समस्या निर्माण करतात.निदान खुल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांकडून मी हेच शिकलो आहे. त्यामुळेच हे लोक शेवटी आमच्यासारख्या लोकांकडे थेरपीसाठी येतात.मी खुल्या विवाहांमध्ये दीर्घकालीन चांगले संबंध असलेले पाहिलेले नाही.”     

 

सारांश         

एकूणच, खुल्या विवाहाची संकल्पना संपूर्ण भारतीयांना मान्य आहे की नाही याबद्दल निश्चित विधान करणे कठीण आहे,कारण वय, धर्म, शिक्षण आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी यासारख्या घटकांवर मते आणि दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. पण एकंदरीत भारतीय समाजव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केला तर,विवाहबाह्य लैंगिक संबंध हे अनैतिक मानले जाते आणि हा एक प्रकारचा व्यभिचार आहे असेच समजले जाते.त्यातही ह्या विवाहबाह्य लैंगिक संबंधातून जे बालक जन्मास येईल त्याचे भविष्य काय ह्या प्रश्नाचे उत्तर गूगल सर्च किंवा ChatGPT वर देखिल नाही.  

मित्रांनो, हा ब्लॉग लिहिण्याच्या मागचा उद्देश हाच होता की जग किती अध:पाताकडे जातंय ह्याची तुम्हाला थोडीशी कल्पना करून द्यावी.तसेच फेसबूकवर मी काही दिवसांपूर्वी हे लिहिले होते की,मी खुला विवाह किंवा Open Marriage या विषयावर ब्लॉग घेऊन येत आहे.ते  जाणून घेण्यासाठी की किती लोकांच्या कानावर ही संकल्पना आली आहे.तुमच्या प्रतिक्रियांवरुन मी हा तर्क बांधला की ह्या विषयावर ब्लॉग लिहिणे गरजेचे आहे. म्हणूनच आजचा हा ब्लॉग.तुमच्या संपर्कातील मित्रांना हा ब्लॉग फॉरवर्ड करा. तुमच्या प्रतिक्रिया ह्या ब्लॉगच्या खाली कमेन्ट बॉक्स मध्ये द्या.

 



प्रसाद नातु,पुणे.            

Comments

  1. गलिच्छ

    ReplyDelete
  2. Whether to back to the STONE AGE in a freestyle manner or to adhere to the rules of Civilised Society in moral and ethical manner is the choice before present generation.
    I don't think the concept of OPEN MARRIAGE will be acceptable to Indians or that matter to the major chunk of mankind at least in the near future.
    One must agree however that nobody can predict human mind.it always feel that the grass on other side is green.
    Thank you very much for the daring
    choice of the subject.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...