Blog No. 2023/39
Date: 16th, February 2023.
मित्रांनो,
सिनेमा, साहित्य इत्यादि विषयापासून आज जरा तुम्हाला दूर घेऊन जातो आहे.नुकतीच एक बातमी झळकली.तुम्हा सर्वांच्या नजरेतून ही बातमी नक्की सुटली नसणार आणि ती म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधे लिथियमचे साठे सापडले. कदाचित तुम्हीच काय मी देखिल कर्नाटकात 1600 टन लिथियमचे साठे मिळाल्याचे वाचले नसेल.कारण लिथियमचे आज जितके महत्व वाटते किंवा वाढले आहे,ते तेव्हा नव्हते. काय आहे एवढे लिथियमचे महत्व वाचूया आजच्या ब्लॉग मधे.
लिथियमचा उपयोग
आपण जेव्हा पारंपरिक इंधनाचा वापर करतो तेव्हा,कार्बन-डाय-ऑक्साइड आणि मिथेन सारखे
हानिकारक वायु वातावरणात सोडत असतो.ज्याला उत्सर्जन असेही म्हटले जाते.जर हे वायूचे
उत्सर्जन टाळायचे असेल तर आपल्याला या इंधनांचा जसे पेट्रोल, डिझेल इत्यादि इंधनाचा
त्याग करावा लागेल.सध्या पूर्ण त्याग करणे शक्य नसले तरी वापर कमी करण्यासाठी आपण निश्चितच
प्रयत्न करु शकतो.त्यासाठी आपल्याला अन्य पर्यायांकडे
वळणे आवश्यक आहे.जसे इ
लेक्ट्रिक कारचा वापर वाढविणे.सौर आणि पवन उर्जेचा वापर वाढविणे
आणि इथेच संबंध येतो लिथियमचा. सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायची
असेल तर ,त्यासाठी लागेल लिथियम आयन बॅटरी ज्यासाठी लागते लिथियम..
लिथियम आयन बॅटरी विषयी माहिती
लिथियम हा
जगातील सर्वात हलका (वजनाने) धातू आहे. सामान्य लीड आयन बॅटरी पेक्षा ह्या लिथियम आयन
बॅटरीचे वजन कमी असल्याने कारचे वजन वाढत नाही.बॅटरीचे वजन कमी असले की कारच्या वजनात
फरक पडतं नाही.साधारणतः वजनाचा कारच्या वेगावर परिणाम होतोच पण mileage
वर देखिल होतो. त्यामुळे वाहनांचे वजन कमी ठेवण्याकडे निर्मात्याचा कल
असतो.सामान्य लीड आयन बॅटरी पेक्षा लिथियम आयन बॅटरीची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता
अधिक असते.सामान्य लीड आयन बॅटरी प्रति किलो फक्त 25 वॅटतास इतकी ऊर्जा साठवते तर लिथियम
आयन बॅटरीची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता 1500 वॅटतास इतकी आहे. शून्य उत्सर्जन हे
लक्ष सध्या करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात लिथियम लागणार.जम्मू आणि काश्मीरमधे 5.9 दशलक्ष टन
एवढे लिथियमचे साठे सापडले आहेत.ज्यामुळे आपण पर्यायी इंधन निर्माणामधे क्रांती करू
शकतो.आता सध्या लिथियम आयात करतो,त्या पायी मोजावे लागणारे परकीय चलन वाचवू शकतो.
If and But’s
पण प्रत्येक
गोष्टीला जसे किंतु परंतु असतात तसे यांस देखिल आहेत. ते एक एक करून बघूया.
1. 5.9 दशलक्ष टन एवढे लिथियमचे साठे सापडले आहेत,पण हा प्राथमिक अंदाज आहे.जरी शास्त्रज्ञ
ठेवी किती पप्रमाणात आहेत या बद्दल ठाम आहेत. पण त्याचा दर्जा काय ह्याची अजून कल्पना
नाही.त्यावर प्रक्रिया करायचा खरच किती लागेल हे त्या लिथियमच्या दर्जावर अवलंबून आहे.
2. लिथियम प्राप्त करण्याची प्रक्रिया ही किचकट आहे.ते धुण्यासाठी पाणी खूप लागते.1
टन लिथियम तयार करण्यासाठी 2000 टन पणी लागते. ह्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो.
3. जम्मू आणि काश्मीरची भौगोलिक परिस्थिति लक्षात घेता खनिज कार्य करणे जरा जिकिरीचे
आहे.
4. अर्थात प्रदूषण मुक्त हिरव्या जगात जाण्यासाठी भारत लिथियमच्या साठयामुळे निश्चितच
फार मोठी झेप घेऊ शकेल असा विश्वास ठेऊ या आणि तसे झाले तर भारत लिथियमच्या बाबतीत
स्वयंपूर्ण होईलच पण लिथियमची निर्यात देखिल करु शकेल.
ssसारांश
लिथियमच्या ह्या साठयामुळे भारत एक महासत्ता बनू शकेल असे देखिल
लोक बोलू लागले आहेत.आणि कां नाही होणार भारतात महासत्ता बनण्याची क्षमता निश्चित आहे.
क्रूड ऑइलच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलन आपण जर अन्य उत्पादक कार्यासाठी वापरता
आले. तर गरीबी दूर करण्यास सहाय्यकारक होईल.भारत महासत्ता झाल्याचा फायदा 140 कोटी
जनतेस झाला तर खऱ्या अर्थाने भारत महासत्ता झाला असे म्हणता येईल.
प्रसाद नातु,पुणे
खूप छान माहिती..लिथियमचा वापर इव्हेईकलच्या बॅटरीत करावा लागतो व नुकताच काश्मीरमध्ये साठ्यांचा शोध लागला आहे त्यामुळे ही माहिती खूप उपयुक्त आहे 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान माहिती🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteनवीन विषयावरची अभ्यासपूर्ण माहिती. सहजसोप्या लेखनशैलीत.
ReplyDeleteधन्यवाद, तुमच्या सारख्यांचे प्रोत्साहन हे सर्व करण्याची प्रेरणा देते.
Deleteमीनल ओगले.नातू सर,तुम्ही फारच वेगवेगळ्या पण महत्वपूर्ण माहिती लोकांसमोर आणत आहात.अभिनंदन.
ReplyDeleteChan mahiti
ReplyDelete