Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

मुलताई,सूर्यपुत्री ताप्तीचे उगमस्थान

Blog No.2023/004

Date:- 9th, January 2023.  


मित्रांनो,

            विदर्भात फेरफटका करीत असतांना,अचानक मध्य प्रदेशात जाण्याचा योग आला.निमित्त होतं माझ्या व्याह्यांचे मुळगावं मूलताई पाहायला चला,असा व्याह्यांचा आग्रह. मुलताई नागपूरपासून 128 किमी अंतरावर आहे. नागपुरातून नागपूर सावनेर मार्गाने पुढे निघायचे. मी आधीच्या माझ्या ब्लॉगमधे लिहिल्याप्रमाणे रस्ता सुरेख होता. साधारणतः गूगल मॅप प्रमाणे 2-2.30 तास लागणार होते. आम्ही 11.15 ला नागपूरहून निघालो.नागपूरला विधानमंडळाचे अधिवेशनाचा शेवटचा दिवस,त्यामुळे मोर्चे वगैरे नव्हते.पण मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त दिसून आला. लोकशाहीची व्याख्या “Government of the people, by the people, for the people असे म्हटले जाते.त्या निवडून आलेल्या लोकांना,ज्यांनी निवडून दिलं,त्यांच्या पासून संरक्षण,काही वेळा हे सारे विडंबन वाटते. पण हे वास्तव आहे आणि हे ज्याचे त्यांनीच ओढवून घेतले आहे. त्याला इलाज काय.

 पाटणसावंगीचे प्राचीन हनुमान मंदिर


            तर मुलताईच्या दिशेने निघालो. रस्त्यात पाटणसावंगी जवळ प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे असे सांगितले, म्हणून तिथे थांबलो.मंदिराचा जीर्णोद्धार प्रगती पथावर होता.हनुमानाची जरा वेगळीच मूर्ती बघावयास मिळाली. प्रशस्त मंदिर आणि त्या मंदिरासमोर भलेमोठे पटांगण.तिथे कुणी बाबा असतात असे कळले.पण ते तिथे नव्हते.पटांगणात वड,पिंपळ आणि लिंबोणीची मोठमोठाली झाडे परिसराची शोभा वाढवतात.तिथे बाबांची कुटी दिसली.हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रस्तान केले. 


मुलताईच्या दिशेने प्रवास

            सावनेर बायपास करून पुढे निघालो.महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात प्रवेश केला.आतापर्यंत मराठीत दिसणारे दुकानांवरचे नामपट्ट, कि.मी.चे दगड मराठी ऐवजी हिंदी दिसू लागले. पांढुरणा बायपास करून पुढे जातांना महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेची आठवण येऊन गेली. फेडरेशनच्या भावापेक्षा कधी कधी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात (अर्थातच तेव्हाच्या) जास्त भाव असे. अशा वेळी कापसाच्या गाड्या (बैलगाड्या) ,ट्रॅक्टर आणि ट्रक भरून रात्री मध्य प्रदेशातील पांढुरणा आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबागकडे निघत त्याची आठवण येऊन गेली.पांढुरणा गेल्यानंतर मुलताईचे कि.मी.चे बोर्ड दिसू लागले.मुलताई समुद्र सपाटी पासून 750 मिटर उंचावर असल्याने थोडा गारवा जाणवत होता.पण त्या वेळेस थोडी थंडी कमी होती. त्यामुळे थंडी प्लेजंट वाटतं होती.

            मुलताई प्रवेश होतो,तो बाजार ओळीतूनच.दोन्ही बाजूला दुकाने मागे सोडत,आम्ही ताप्ती मंदिराच्या जवळ पोहोचलो. तिथे एक मोठा तलाव आहे, “ताप्ती तालाब”  आणि तलावाच्या पश्चिम बाजूस सूर्यपुत्री ताप्तीदेवीचे मंदिर आहे. तेथील उगमातून मग पुढे सात लहानश्या कुंडातून,तापी आपल्या प्रवासाला निघते असे समजले.आपण सगळे तापी नदी म्हणून ओळखत असलेल्या तापीचे खरे नावं ताप्ती असे आहे.ती सूर्यपुत्री आहे.तापी हा ताप्तीचा अपभ्रंश आहे.तापीला आदिगंगा देखिल म्हटले जाते.कारण गंगा किंवा भागीरथी भूलोकावर अवतरण्यापूर्वी तापी अस्तित्वात होती.गंगेच्या भुतलावर अवतरण्यासंबंधीची कहाणी किंवा आख्यायिका आणि तिचा तापीशी संबंध  पुढील भागात.

            माझा हा ब्लॉग आपणांस कसा वाटला. कृपया कमेन्ट बॉक्स मधे लिहा.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे.                                     

Comments

  1. छान लिहिलंय सर

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन केले आहे.मस्त.

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे

    ReplyDelete
  4. खुप सुरेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...