Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

मुलताई,सूर्यपुत्री ताप्तीचे उगमस्थान

Blog No.2023/004

Date:- 9th, January 2023.  


मित्रांनो,

            विदर्भात फेरफटका करीत असतांना,अचानक मध्य प्रदेशात जाण्याचा योग आला.निमित्त होतं माझ्या व्याह्यांचे मुळगावं मूलताई पाहायला चला,असा व्याह्यांचा आग्रह. मुलताई नागपूरपासून 128 किमी अंतरावर आहे. नागपुरातून नागपूर सावनेर मार्गाने पुढे निघायचे. मी आधीच्या माझ्या ब्लॉगमधे लिहिल्याप्रमाणे रस्ता सुरेख होता. साधारणतः गूगल मॅप प्रमाणे 2-2.30 तास लागणार होते. आम्ही 11.15 ला नागपूरहून निघालो.नागपूरला विधानमंडळाचे अधिवेशनाचा शेवटचा दिवस,त्यामुळे मोर्चे वगैरे नव्हते.पण मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त दिसून आला. लोकशाहीची व्याख्या “Government of the people, by the people, for the people असे म्हटले जाते.त्या निवडून आलेल्या लोकांना,ज्यांनी निवडून दिलं,त्यांच्या पासून संरक्षण,काही वेळा हे सारे विडंबन वाटते. पण हे वास्तव आहे आणि हे ज्याचे त्यांनीच ओढवून घेतले आहे. त्याला इलाज काय.

 पाटणसावंगीचे प्राचीन हनुमान मंदिर


            तर मुलताईच्या दिशेने निघालो. रस्त्यात पाटणसावंगी जवळ प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे असे सांगितले, म्हणून तिथे थांबलो.मंदिराचा जीर्णोद्धार प्रगती पथावर होता.हनुमानाची जरा वेगळीच मूर्ती बघावयास मिळाली. प्रशस्त मंदिर आणि त्या मंदिरासमोर भलेमोठे पटांगण.तिथे कुणी बाबा असतात असे कळले.पण ते तिथे नव्हते.पटांगणात वड,पिंपळ आणि लिंबोणीची मोठमोठाली झाडे परिसराची शोभा वाढवतात.तिथे बाबांची कुटी दिसली.हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रस्तान केले. 


मुलताईच्या दिशेने प्रवास

            सावनेर बायपास करून पुढे निघालो.महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात प्रवेश केला.आतापर्यंत मराठीत दिसणारे दुकानांवरचे नामपट्ट, कि.मी.चे दगड मराठी ऐवजी हिंदी दिसू लागले. पांढुरणा बायपास करून पुढे जातांना महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेची आठवण येऊन गेली. फेडरेशनच्या भावापेक्षा कधी कधी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात (अर्थातच तेव्हाच्या) जास्त भाव असे. अशा वेळी कापसाच्या गाड्या (बैलगाड्या) ,ट्रॅक्टर आणि ट्रक भरून रात्री मध्य प्रदेशातील पांढुरणा आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबागकडे निघत त्याची आठवण येऊन गेली.पांढुरणा गेल्यानंतर मुलताईचे कि.मी.चे बोर्ड दिसू लागले.मुलताई समुद्र सपाटी पासून 750 मिटर उंचावर असल्याने थोडा गारवा जाणवत होता.पण त्या वेळेस थोडी थंडी कमी होती. त्यामुळे थंडी प्लेजंट वाटतं होती.

            मुलताई प्रवेश होतो,तो बाजार ओळीतूनच.दोन्ही बाजूला दुकाने मागे सोडत,आम्ही ताप्ती मंदिराच्या जवळ पोहोचलो. तिथे एक मोठा तलाव आहे, “ताप्ती तालाब”  आणि तलावाच्या पश्चिम बाजूस सूर्यपुत्री ताप्तीदेवीचे मंदिर आहे. तेथील उगमातून मग पुढे सात लहानश्या कुंडातून,तापी आपल्या प्रवासाला निघते असे समजले.आपण सगळे तापी नदी म्हणून ओळखत असलेल्या तापीचे खरे नावं ताप्ती असे आहे.ती सूर्यपुत्री आहे.तापी हा ताप्तीचा अपभ्रंश आहे.तापीला आदिगंगा देखिल म्हटले जाते.कारण गंगा किंवा भागीरथी भूलोकावर अवतरण्यापूर्वी तापी अस्तित्वात होती.गंगेच्या भुतलावर अवतरण्यासंबंधीची कहाणी किंवा आख्यायिका आणि तिचा तापीशी संबंध  पुढील भागात.

            माझा हा ब्लॉग आपणांस कसा वाटला. कृपया कमेन्ट बॉक्स मधे लिहा.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे.                                     

Comments

  1. छान लिहिलंय सर

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन केले आहे.मस्त.

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे

    ReplyDelete
  4. खुप सुरेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...