Blog No.2023/002
Date:- 6th, January 2023
मित्रांनो,
नुकताच
मी माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत जाऊन सफर करून आलो.नोकरीतून निवृत्ती
होईपर्यन्त कुणाकडे,अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहिलो,असा निवांत
मिळाला नव्हता.मार्च,2020 ला जेंव्हा सेवानिवृत्त होणार होतो, तेव्हा खरं तर मनोमन
हे ठरविलेले की 15 एप्रिल 2020 पासून छान दौरा काढायचा. अगदी अहमदनगर पासून ते गोंदिया
पर्यन्तच्या सगळ्या नातेवाईकांकडे आणि जिवलग मित्रांकडे जाऊन रहायचे, पण कोविड 19
ने माझा सगळा प्लान चौपट केला.त्या नंतर वेळ मिळाला तो आता डिसेंबर 2022 मधे.
समृद्धी
महामार्ग नुकताच सुरु झाला होता.त्याने नागपूरला सफर करायची इच्छा होती.ती या
निमित्ताने सफल झाली.जवळपास 16 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो.राजुरा खरं तरं
नातेवाईक कुणी नाही असे म्हणताच येणार नाही एवढा प्रचंड जिव्हाळा,प्रेम आणि आपुलकी
अनुभवावयास मिळाली. वर्ध्यात ट्रेड फेअरचे आयोजन भावाच्या घरासमोरील मैदानात आयोजित
केले होते. तिथे सहज पाहायला गेलो, पुण्यात रहात असल्याने विकत काही घ्यायचे
नव्हते.एक मजा म्हणून गेलो.एका दुकानात,नारळ पाऊडर छोट्याश्या पाउचमधे विकत मिळत
होते.मी सहज डोकावलो अन आश्चर्य त्या स्टॉलच्या मालकाने मला विचारले, “आप बँकमे थे
क्या?” मी हो म्हटलं त्यांनी ‘अनिल गुप्ता’ नावं सांगितल्यावर ओळख पटली.आम्ही
एकमेकांना 25-30 वर्षाने भेटत असू. मी बँक ऑफ इंडिया,वर्धा शाखेत असतांना स्टेट
बँक मधे clearing साठी जात असे. तेव्हाची आमची भेट.खूप
गप्पा झाल्या. मग मी अनिलला म्हटले, “एक सेल्फी हो जाये. ये याद हम कॅमेरेमे बंद
करना चाहते है.” त्याला खूप आनंद झाला आणि मलाही.
त्या
नंतर बँक ऑफ इंडिया पेंशनर आणि सेवानिवृत्तांच्या संघटनेकडून,नागपूर येथे परवाना
भवन येथे, माझा बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर केलेल्या साहित्य सेवेबद्दल सत्कार
करण्यात आला.आपल्या माणसांकडून झालेले कौतुक खरच खूप सुखावह असं असतं.बँक ऑफ
इंडिया परिवारातले खूप सारे सोबती बऱ्याच वर्षानंतर भेटले.बँक ऑफ इंडिया परिवार ही
खरोखरीच एक अनोखी कल्पना.त्या परिवारातले पुनः एकदा भेटले.प्रत्येकाच्या तोंडी
‘गेले ते दिवस’ ही भावना होती.मदतीला भले ही कम्प्युटर नव्हते,यांत्रिकीकरण नव्हते,पण
मित्र होते,एक कुटुंब होते, एक परिवार होता.एकमेकांच्या सुखदु:खामधे एकमेकांच्या
सोबत होते,आपुलकी होती,जिव्हाळा होता. तो आधुनिक बँकिंगने गमावल्याची खंत
प्रत्येकाच्या मनांत जाणवली आणि ओठावरही आली.
विदर्भाचा
फेरफटका सोळा दिवसांचा होता.एका ब्लॉगमधे कसं सामावणार,तेव्हा भेटूया,पुढील भागात.
जास्त नाही फक्त एक दिवसाचा विराम.
प्रसाद
नातु, पुणे
Chan memoirs
ReplyDeleteChan memoirs
ReplyDeleteChan memoirs
ReplyDeleteखूप छान सुरुवात. पुढचे सर्व भाग वाचायला खूप आवडेल.
ReplyDelete