Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

माझा विदर्भाचा फेरफटका

Blog No.2023/002

Date:- 6th, January 2023 



मित्रांनो,

            नुकताच मी माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत जाऊन सफर करून आलो.नोकरीतून निवृत्ती होईपर्यन्त कुणाकडे,अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहिलो,असा निवांत मिळाला नव्हता.मार्च,2020 ला जेंव्हा सेवानिवृत्त होणार होतो, तेव्हा खरं तर मनोमन हे ठरविलेले की 15 एप्रिल 2020 पासून छान दौरा काढायचा. अगदी अहमदनगर पासून ते गोंदिया पर्यन्तच्या सगळ्या नातेवाईकांकडे आणि जिवलग मित्रांकडे जाऊन रहायचे, पण कोविड 19 ने माझा सगळा प्लान चौपट केला.त्या नंतर वेळ मिळाला तो आता डिसेंबर 2022 मधे.

            समृद्धी महामार्ग नुकताच सुरु झाला होता.त्याने नागपूरला सफर करायची इच्छा होती.ती या निमित्ताने सफल झाली.जवळपास 16 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो.राजुरा खरं तरं नातेवाईक कुणी नाही असे म्हणताच येणार नाही एवढा प्रचंड जिव्हाळा,प्रेम आणि आपुलकी अनुभवावयास मिळाली. वर्ध्यात ट्रेड फेअरचे आयोजन भावाच्या घरासमोरील मैदानात आयोजित केले होते. तिथे सहज पाहायला गेलो, पुण्यात रहात असल्याने विकत काही घ्यायचे नव्हते.एक मजा म्हणून गेलो.एका दुकानात,नारळ पाऊडर छोट्याश्या पाउचमधे विकत मिळत होते.मी सहज डोकावलो अन आश्चर्य त्या स्टॉलच्या मालकाने मला विचारले, “आप बँकमे थे क्या?” मी हो म्हटलं त्यांनी ‘अनिल गुप्ता’ नावं सांगितल्यावर ओळख पटली.आम्ही एकमेकांना 25-30 वर्षाने भेटत असू. मी बँक ऑफ इंडिया,वर्धा शाखेत असतांना स्टेट बँक मधे clearing साठी जात असे. तेव्हाची आमची भेट.खूप गप्पा झाल्या. मग मी अनिलला म्हटले, “एक सेल्फी हो जाये. ये याद हम कॅमेरेमे बंद करना चाहते है.” त्याला खूप आनंद झाला आणि मलाही.

            त्या नंतर बँक ऑफ इंडिया पेंशनर आणि सेवानिवृत्तांच्या संघटनेकडून,नागपूर येथे परवाना भवन येथे, माझा बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर केलेल्या साहित्य सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.आपल्या माणसांकडून झालेले कौतुक खरच खूप सुखावह असं असतं.बँक ऑफ इंडिया परिवारातले खूप सारे सोबती बऱ्याच वर्षानंतर भेटले.बँक ऑफ इंडिया परिवार ही खरोखरीच एक अनोखी कल्पना.त्या परिवारातले पुनः एकदा भेटले.प्रत्येकाच्या तोंडी ‘गेले ते दिवस’ ही भावना होती.मदतीला भले ही कम्प्युटर नव्हते,यांत्रिकीकरण नव्हते,पण मित्र होते,एक कुटुंब होते, एक परिवार होता.एकमेकांच्या सुखदु:खामधे एकमेकांच्या सोबत होते,आपुलकी होती,जिव्हाळा होता. तो आधुनिक बँकिंगने गमावल्याची खंत प्रत्येकाच्या मनांत जाणवली आणि ओठावरही आली.

            विदर्भाचा फेरफटका सोळा दिवसांचा होता.एका ब्लॉगमधे कसं सामावणार,तेव्हा भेटूया,पुढील भागात. जास्त नाही फक्त एक दिवसाचा विराम.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे                                                                                                       

Comments

  1. खूप छान सुरुवात. पुढचे सर्व भाग वाचायला खूप आवडेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...