ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत. सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...
Blog No. 2023/15
Dated 19th, January 2023
मित्रांनो,
साधारणतः मध्यम वर्गीय पगारदार लोकांचे जीवन अर्थात त्यातील कमावत्या व्यक्तीचे जीवन हे आपली जी कुठली नोकरी असेल, ती जेवढी जमेल तेवढी ईमानदारीने करण्यांत जातं.देवदर्शन वगैरे जेवढे कमी उत्पन्न गट किंवा पगारदार व्यक्तींशिवाय इतर म्हणजे शेतकरी, व्यवसायिक यांना जमतं तेवढं जमत नाही. तुम्ही स्वतःच विचार करा किती वेळा आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला गेलात किंवा प्रगट दिनाला गजानन महाराजांचे दर्शन घेतले, किंवा नवरात्रात महालक्ष्मीचे दर्शन. नाही जमतं.मग साठी नंतर आपण हे काहीच केले नाही याची जाणीव होते.ज्याचा पाप पुण्यावर विश्वास असतो, तो आपल्या हातून काहीच पूण्यकर्म झालं नाही म्हणत दु:खी होतो. पण आपण आपला प्रपंच नीटनेटका केलेला असतो.आपलं कर्म व्यवस्थित केलेले असतं. अशांसाठी एक सुंदर गीत राम उगावकर आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी लिहीलं असावं असं वाटून जातं. या गीताबद्ल आज मी तुम्हाला काही सांगणार आहे.
एक वेगळं भक्तिगीत
हे भक्तीगीत नवीन नाही. साधारणतः 1983-84 च्या आसपासचं असावं. पं.रामदास कामत यांनी खुप आर्त स्वरुपात गायले आहे. जणू आपल्या सगळ्यांची ती भावना त्यांनी देवापर्यत पोहोचवलेली आहे. या भक्तीगीतात म्हटलयं "कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." पुढे कवि लिहीतात "कधी नाही आलो तुझिया कथाकिर्तनाला".नोकरीच्या व्यापात कधी वेळच मिळत नाही न. तुटपुंजा, संसार पुढे रेटण्या इतका पगार,त्यामुळे "कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला " अशीच अवस्था असते. ".गंधफूल नाही जवळी तुझ्या पूजनाला" पण भक्तीभाव असतो. म्हणून कवि परमेश्वराला म्हणतो "भक्तीभाव जाणून घे तू वसे जो उरांत".
कर्म हिच पूजा आहे.
पुढच्या कडव्यात कवि म्हणतो की, "कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी." गीता वाचलेली असो किंवा नसो, कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. "नित्य सर्व कर्मांमधे तुला पाहतो मी." स्वतःचे कार्य निट करणे हिच ईशपूजा आहे, असे आपण म्हणतोच ना. पुढे कवि म्हणतो "कर्मरुप सेवा तुझिया पदी वाहतो मी." आपलं कार्य आपण एक पूजा मानून करतो. अगदी इंग्रजीत देखिल म्हटलयं "Work is worship". त्यामुळेच कवि पुढे म्हणतो की, "तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसांत. मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." आपण नोकरीत अगदी रमलेलो असतो. किती अर्थपूर्ण आणि सुंदर गाणं आहे. ह्या गाण्याचा मला अधिक परिचय साठीनंतर व्हावा. हा योगायोग निश्चितच नव्हता. ह्या गीतात सांगितलेले मी काहीच करु शकलो नाही हे मनावरचं मळभ, हे गाणं गायलं की दूर होतं असं मला जाणवलं. तुम्ही अनुभव घेऊन बघा.
"कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात". ऐकण्यासाठी टाईप करा. https://youtu.be/fVCp1xIxWmk
प्रसाद नातु,पुणे.
This comment has been removed by the author.
ReplyDelete
ReplyDeleteAdhunik jagatli vastavvadi post. Sadhyachya dhakadhakichya jeevnat ashi Shannara denari gani khup Anand detat
Exactly true!
ReplyDeleteसाधारण पणे मध्यम वर्गीय नोकरदार व्यक्तीच्या अध्यात्मिक जीवनाचे यथार्थ वर्णन केले आहे. मी देखील नोकरी मध्ये Work is worship ला प्राधान्य दिले व त्याचाचांगला अनुभव आला.
ReplyDelete