Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

कर्म हिच पूजा

Blog No. 2023/15

Dated 19th, January 2023 


 मित्रांनो, 
         साधारणतः मध्यम वर्गीय पगारदार लोकांचे जीवन अर्थात त्यातील कमावत्या व्यक्तीचे जीवन हे आपली जी कुठली नोकरी असेल, ती जेवढी जमेल तेवढी ईमानदारीने करण्यांत जातं.देवदर्शन वगैरे जेवढे कमी उत्पन्न गट किंवा पगारदार व्यक्तींशिवाय इतर म्हणजे शेतकरी, व्यवसायिक यांना जमतं तेवढं जमत नाही. तुम्ही स्वतःच विचार करा किती वेळा आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला गेलात किंवा प्रगट दिनाला गजानन महाराजांचे दर्शन घेतले, किंवा नवरात्रात महालक्ष्मीचे दर्शन. नाही जमतं.मग साठी नंतर आपण हे काहीच केले नाही याची जाणीव होते.ज्याचा पाप पुण्यावर विश्वास असतो, तो आपल्या हातून काहीच पूण्यकर्म झालं नाही म्हणत दु:खी होतो. पण आपण आपला प्रपंच नीटनेटका केलेला असतो.आपलं कर्म व्यवस्थित केलेले असतं. अशांसाठी एक सुंदर गीत राम उगावकर आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी लिहीलं असावं असं वाटून जातं. या गीताबद्ल आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. 

एक वेगळं भक्तिगीत 

       हे भक्तीगीत नवीन नाही. साधारणतः 1983-84 च्या आसपासचं असावं. पं.रामदास कामत यांनी खुप आर्त स्वरुपात गायले आहे. जणू आपल्या सगळ्यांची ती भावना त्यांनी देवापर्यत पोहोचवलेली आहे. या भक्तीगीतात म्हटलयं "कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." पुढे कवि लिहीतात "कधी नाही आलो तुझिया कथाकिर्तनाला".नोकरीच्या व्यापात कधी वेळच मिळत नाही न. तुटपुंजा, संसार पुढे रेटण्या इतका पगार,त्यामुळे "कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला " अशीच अवस्था असते. ".गंधफूल नाही जवळी तुझ्या पूजनाला" पण भक्तीभाव असतो. म्हणून कवि परमेश्वराला म्हणतो "भक्तीभाव जाणून घे तू वसे जो उरांत".

कर्म हिच पूजा आहे. 

       पुढच्या कडव्यात कवि म्हणतो की, "कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी." गीता वाचलेली असो किंवा नसो, कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. "नित्य सर्व कर्मांमधे तुला पाहतो मी." स्वतःचे कार्य निट करणे हिच ईशपूजा आहे, असे आपण म्हणतोच ना. पुढे कवि म्हणतो "कर्मरुप सेवा तुझिया पदी वाहतो मी." आपलं कार्य आपण एक पूजा मानून करतो. अगदी इंग्रजीत देखिल म्हटलयं "Work is worship". त्यामुळेच कवि पुढे म्हणतो की, "तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसांत. मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात." आपण नोकरीत अगदी रमलेलो असतो.  किती अर्थपूर्ण आणि सुंदर गाणं आहे. ह्या गाण्याचा मला अधिक परिचय साठीनंतर व्हावा. हा योगायोग निश्चितच नव्हता. ह्या गीतात सांगितलेले मी काहीच करु शकलो नाही हे मनावरचं मळभ, हे गाणं गायलं की दूर होतं असं मला जाणवलं. तुम्ही अनुभव घेऊन बघा.
  "कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात". ऐकण्यासाठी टाईप करा. https://youtu.be/fVCp1xIxWmk



प्रसाद नातु,पुणे.  

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  2. Adhunik jagatli vastavvadi post. Sadhyachya dhakadhakichya jeevnat ashi Shannara denari gani khup Anand detat

    ReplyDelete
  3. साधारण पणे मध्यम वर्गीय नोकरदार व्यक्तीच्या अध्यात्मिक जीवनाचे यथार्थ वर्णन केले आहे. मी देखील नोकरी मध्ये Work is worship ला प्राधान्य दिले व त्याचाचांगला अनुभव आला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...