Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

सक्षम आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांची कपात

  Blog No. 2023/24  Date ,30th,  January 2023 .   मित्रांनो,               परदेशांत आलेली मंदी आणि मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आलेली नोकरी कपात.ह्याच्या वार्ता आजकाल मोठ्या प्रमाणात ऐकायला येत असतांना एक गोष्ट काळजी लावणारी आहे. ती म्हणजे ही कपात करतांना एखादा कर्मचारी सक्षम आणि निष्ठावंत आहे.त्याला ही नोकरीतून कमी केले जात आहे.भारतात मंदी नाही आणि भारतात अशी परिस्थिति नसली तरी, परदेशातील घडणाऱ्या गोष्टींचे अंधानुकरण करीत,ते जे करीत असतात,त्या मागे काही उदात्त हेतु आहे.असे मानणाऱ्यांची खुळचट लोकांची संख्या आपल्या देशात कमी नाही.म्हणून काळजी वाटते.     Experience Quotient ( EQ ) देखिल महत्वाचा            वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागी तेवढ्या पगारात 2 ते 3 नवीन कर्मचारी ठेवता येतील,अशी ही कृती देखिल अशीच बिनडोक पणाची आहे. कारण intelligent quotient ( IQ ) सोबत तेवढाच Experience Quotient ( EQ ) देखिल महत्वाचा आहे.विशेषतः जिथे decision making चा प्रश्न ...

आर्थिक साक्षरता म्हणजे काय आणि महत्व

Blog No. 2023/23  Date ,29th,  January 2023.   मित्रांनो,               भारताची digitalisation  कडे मोठी झपाट्याने वाटचाल सुरु असतांना,काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की,वाटते की त्या सोबत आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अधून मधून एखाद्याच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे,एटीएम कार्ड ची सविस्तर माहिती विचारून अकाऊंट पूर्णपणे खाली केल्याचे,ऐकायला मिळते.बँकांकडून आणि रिजर्व बँकेकडून टी.व्ही.“जानकार बनिये सतर्क राहिये” अशी जाहिरात दाखविल्यानंतर लगेच बातम्यामधून कुणाचे तरी अकाऊंट हॅक झाले.पूर्ण पैसे काढून घेतले सारखी बातमी ही पहायला/ऐकायला  मिळते ही किती विडंबना आहे.अजूनही सुशिक्षित घरातील स्त्रिया ह्या एटीएम कार्ड वापर करीत नाहीत किंवा यूपीआयचा वापर करु शकत नाही. त्यांना रोख (कॅश) जवळ बाळगणे जास्त सोयीचे वाटते.             आर्थिक साक्षरता कां गरजेची     आज ही बाब ब्लॉग साठी निवडण्याचे कारण असे की, माझ्या पावणे सहा वर्षाच्या नातवासाठी,मी जेम्स चॉकलेटचा बॉल मिळतो,तो त्याल...

अर्थसंकल्पाकडून माझ्या अपेक्षा आहेत

Blog No. 2023/22   Date ,28th,  January 2024.   मित्रांनो.             मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे कारण पुढच्या वर्षी मे 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे.त्यामुळे पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या जातील. यंदाच्या बजेटमधे काही लोकप्रिय घोषणा होईल अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे. मार्च २०२० पर्यंत मी कर्मचारी होतो आणि आता ज्येष्ठ नागरिक आहे. मी पगारदार कर्मचाऱ्यांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो असे मला वाटते.म्हणून एक पगारदार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकाला यंदाच्या अर्थसंकल्पात काय काय अपेक्षित आहे. हे मी थोडक्यात मांडत आहे. 1.       महागाई आणि पगाराच्या उत्पन्नातील वाढ लक्षात घेता करमुक्त उत्पन्नाची सीमा जी रु.250,000 आहे ती वाढली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. 2   80 सी अंतर्गत वजावट रु. 1.50 लाखाची सीमा ही 2014 पासून बदललेली नाही,ती वाढावी अशी अपेक्षा  आहे. 3   हाऊसिंग लोन च्या इनस्टालमेंटची वजावट मिळते ती 80 सी अंतर्गत न ठेवता,ती वेगळ्या  कलमाखाली मिळावी....

भारतातील वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे

  Blog No. 2023/21  Date ,27th,  January 2023. मित्रांनो,              दिवसेंदिवस जसजसे मनुष्याचे सरासरी आयुर्मान वाढत चालले आहे. तसतसे वृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10 कोटी 40 लाख वृद्ध व्यक्ती (वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक   होत्या. त्यातील 5 कोटी 30 लाख महिला आणि 5 कोटी 10 लाख पुरुष होते. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि हेल्पएज इंडियाच्या अहवालानुसार 2026 पर्यन्त वृद्ध लोकांची संख्या 17 कोटी 30 लाख पर्यन्त वाढण्याची शक्यता आहे. सध्या शहरी भागात राहाणारे वृद्ध एकूण लोकसंख्येच्या 71% एवढे आहे तर 29% वृद्ध ग्रामीण भागात रहातात.        वृद्ध पालकांच्या समस्या   बदलत्या काळानुसार ,   चांगले जीवनमान जगण्यासाठी मुले शहरांमध्ये किंवा इतर प्रदेशांत किवा परदेशात देखिल जातात.काही पालक त्यांच्या मुलांसोबत जाण्यास तयारी दर्शवितात.तर काही वेळेस पालक वृद्ध झाले की मुलांना त्यांचे ओझे होते.त्यातून त्यांना मुक्ती हवी असते.म्हणून ते स्वतःच्या पालकांना त्यांच्या गावांत सोडून निघ...

रमाबाई रानडे

  Blog No. 2023/20   Date 24th , January 2023 . मित्रांनो,             तुम्हाला ती झी मराठीवरील मालिका आठवते,ज्यात स्पृहा जोशीची भूमिका खूप गाजली होती. तुम्ही अंदाज केला असल्यास तुम्ही बरोबर ओळखलेत. “उंच माझा झोका” या रमाबाई रानडे ह्यांच्या जीवनावर आधारित ही मालिका खूप लोकप्रिय झाली.आज रमाबाई रानडे ह्यांचा जन्म दिवस. सांगली जिल्हयातील देवराष्ट्रे ह्या छोट्याशा गावात कुर्लेकर परिवारात 25 जानेवारी,1862 ला त्यांचा जन्म झाला.त्या पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर.त्या काळी स्त्रियांना शिक्षण देणे हे निषिद्ध मानले जात असल्याने,त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकविले नाही. त्यांचा केवळ 11 व्या वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे लग्नाच्या वेळेस विधुर होते आणि भारतातील सामाजिक सुधारणेचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. घरातील इतर स्त्रियांचा विरोध पत्करून त्यांनी रमाबाईस शिकविण्याचे ठरविले.रमाबाईंना सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी आपली मदतनीस म्हणून बनविण्यासाठी म...

निद्रिस्त किंवा अचेतन मनाची शक्ती

Blog No. 2023/20   Date 23 rd , January 2024. मित्रांनो,             आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे,हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर,आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले,कॉलेज मनासारखे मिळाले नाही,नोकरी मनासारखी मिळाली नाही,नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही,बॉस मनासारखा मिळाला नाही,अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो, काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो, आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्मक घडण्यात होतो. “म...

उदंड झाली स्मारके

Blog No. 2023/19  Dated 22nd , January 2024.      मित्रांनो,              भारत हा पुतळ्यांचा आणि स्मारकांचा देश आहे, असे वर्णन जरी कुणी केले तरी ते वावगे ठरू नये, इतके भारतात पुतळे आणि स्मारकं आहेत. तुम्ही जर दिल्लीला गेलात तर दोन तीन दिवस,तुम्हाला नुसती स्मारकं बघायला लागतील.इथे महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,लाल बहादूर शास्त्री,ग्यानी झेलसिंग, शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी, राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी, के.आर.नारायणन, चंद्रशेखर,चौधरी चरण सिंग,जगजीवनराम, आय.के.गुजराल यांची स्मारकं आहेत.ही सारी स्मारकं भूतपूर्व राष्ट्रपती,भूतपूर्व पंतप्रधान,भूतपूर्व उप-पंतप्रधान यांची आहेत.तरी यांत डॉ.राजेंद्रप्रसाद,डॉ.राधाकृष्णन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्व. मोरारजी देसाई,स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.पी.व्ही.नरसिंहराव,चौधरी देवीलाल ह्यांचा समावेश नाही,हे महत्वाचे आहे. स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे             ही स्मारकं उभारण्याचे कारण आणि उद्दिष्टे काय आहेत.हे आप...

आपला जीव आपली जबाबदारी

  Blog No. 2023/18   Dated 21st , January 2024.    मित्रांनो,             माझे ब्लॉग तुम्ही गेल्या 15-20 दिवसांपासून वाचत असाल,तर माझा समृद्धी महामार्गावरचा फेरफटका हा ब्लॉग तुम्ही वाचला असाल , तर इतक्यात मी समृद्धी महामार्गावर जाऊन आलो.महामार्गाविषयी ज्या बातम्या पसरविण्यात आल्या,त्या बद्दल देखिल मी त्यांत लिहिले होते. मागील दोन दिवसांत केंद्र सरकारच्या सडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 17 डिसेंबर 2022 ला वर्ष 2021 करिता प्रसिद्ध केलेला भारतातील 2021 वर्षात झालेल्या रोड अॅक्सिडेंट बाबतचा एक अहवाल वाचनात आला.त्यामुळे हा ब्लॉग लिहायला घेतला.               हा अहवाल अतिशय विस्तृत असा असून,ह्यात कुठल्या प्रकारच्या मार्गावर किती अपघात होतात, त्यांत मृत्युमुखी किती पडतात,अपघात होण्याची कारणे,रोडची अवस्था.मोठ्या महानगरात होणाऱ्या अपघातांची संख्या, अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या इत्यादि ह्याची सविस्तर मीमांसा केली आहे.गेल्या दोन द...