Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

माझे बालपण


    
 

            मित्रांनो, माझं लहानपण म्हणजे 50 वर्षापूर्वीच जग. मी पहिली ते चौथी, चाळीसगांवच्या सरस्वती विद्या मंदिरमधे शिकलो. चाळीसगांव ते धुळे मार्गावर, रेल्वे लाईनच्या, मुंबई-हावरा हा रेल्वे मार्ग, अलिकडेच माझी शाळा. केळकर मावशी, माझ्या आईची दूरची बहिण, शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. पण मला काही वेगळी ट्रीटमेंट मिळायची अशातली गोष्ट नव्हती. त्या एक कडक मुख्याध्यापिका होत्या.

                माझे वडील आबासाहेब,तेव्हा चाळीसगांव ला छगनलाल टेक्सटाईल मिल ह्या कापड गिरणीत ऑफिसर होते, त्यांची पोस्ट डाईंग ॲड प्रिटींग मास्टर अशी होती. सकाळी 6.00 वाजता पहिला भोंगा होत असे. त्या वेळेस घडाळ्यापेक्षा भोंग्यावर दिनचर्या अवलंबून असायची. 6.30 ला पुन्हा एक भोंगा व्हायचा. चाळीसगांव फारस मोठ नव्हतं  तेव्हा. भोंग्याचा आवाज साऱ्या चाळीसगांवात ऐकू जात असे. मिल पासून दूर रहाणाऱ्या कापड गिरणी कामगारांसाठी हा इशारा असतं असे की वेळेत पोहोचायचे आहे ना मग चला घरुन निघा. माझे वडील आबासाहेब सांगत की तेव्हा लेट लतिफांचे प्रमाण हे नगण्यच असायचं. म्हणजे काही ना तितकेच महत्वाचे कारण असल्याशिवाय उशीरा येणे किंवा अनुपस्थित रहाणे नगण्यच. सातला पाच मिनीटे कमी असतांना ते स्यतः निघायचे, मिल घरापासून दूर असली की 6.30 वाजताच घरुन निघायचे. वक्तशीरणाचे बाळकडू मला मिळाले ते आबासाहेबांकडून. ते मला राजा म्हणत. राजा, एक गोष्ट लक्षांत ठेव. वेळ पाळणे ही जगातली सर्वात सोपी गोष्ट. कारण ती पाळण आपल्या हातात असतं. कुठल्याही कामासाठी निघायचं असेल तर निघायची वेळ ठरवायची आणि त्या वेळेच्या 15 मिनीटे आधी तयार होऊन बसायचं. तुझ्या आयुष्यात तू वेळेसाठी कधी ही बोलणी खाणार नाही आहेस.मग मी बॅकेत काम करतांना हे जीवनभर जपलं. माझी सौ आणि भाऊ , फलाना फलाना, माझ्याच बॅकेतला बाजूला रहाणारा, मी बॅकेत गेल्या नंतर कसा 15 मिनीटाने  जातो  हे सांगत असतं ,पण मी मात्र माझी वेळ सोडली नाही. जीवनांत चांगल-वाईट, खरं-खोटे, चूक-बरोबर असं खूप लोक सांगत असतात. त्यातलं  नेमके काय घ्यायचं ते आपण ठरवायचं. कारण जीवन आपल्याला  जगायचं असतं. असो.

                  तर भोंग्याभोवती दिनचर्या फिरत असे. माझी दुपारची शाळा असल्याने, दुपारचे भोंगे किती किती वाजता होतात, हे फक्त सुट्टीच्या दिवशी कळायचं.शाळेत जायला सायकल रिक्षा यायची. समोर रिक्षाचालक  आणि पाठीमागे एक चौकोनी डब्बा असायचा. त्यात तीघं चौघं जण बसत असू. त्या दिड किमी च्या सफरीला तोड नाही.कुणी अगदी लहान मुलं रिक्षात असली की ती शाळेपर्यत रडत असतं. माझ्या वडिलांच्या नोकरीमुळे, म्हणजे एका ठिकाणची सोडून दुसरीकडे जाण्यामुळे, माझे एक वर्ष वाया जाणार होते. तेव्हा पहिल्या वर्गात  वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रवेश मिळत असे. मला 6 पूर्ण झाल्यावर पहिलीत प्रवेश घ्यावा लागला. पण त्यावेळेस उड्डान परिक्षा नावाची संकल्पना होती. मी पहिलीची आणि दुसरीची परिक्षा (उड्डान) परिक्षा दिली आणि पहिली नंतर तिसरीत बसलो. मी दुसरीत शिकलोच नाही. यामुळेच असेल कदाचित, दोन नंबरची कामं मला आयुष्यात कधी जमली नाहीत म्हणा, ईच्छाही झाली नाही. असो.

                  त्या वेळेस खेळ वेगळेच होते. बहुतेक मैदानी खेळ असतं. विटी दांडू किंवा गिल्ली डंडा ही म्हणतं, लगोऱ्या, चोर पोलीस, कबड्डी, पाऊस आला की खुपसणीचा खेळ खेळत असू. अरे हां आणि काचेच्या गोट्याचे खेळ रंगत असतं. माझी उंची इतरांपेक्षा जास्त असल्याने काही खेळात माझ्या उंचीचा फायदा होत असे.

                  चाळीसगांवच्या मिल कंपाऊंड मधे खुप जागा होती. एका बाजूला पूर्व पश्चिम अशी मोठी चाळ होती. त्यात ऑफिसर, क्लर्क यांना आपापल्या हुद्द्यानुसार कमी जास्त आकाराची घरं होती. बैठी चाळ होती. चाळीच्या पश्चिम टोकाला एक दुमजली म्युनिसीपालटीच्या शाळेची इमारत होती. त्याच्या पलीकडे एक आयताकृती मैदान होतं. तिथे आम्ही क्रिकेट खेळत असू. त्या काळीही क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ होता. भारताने मॅच जिंकली की समोरच्या पानावर बातमी येत असे. मोठ्या अक्षरात अगदी पाऊण अंकी फाॅट मधे भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय अशी बातमी यायची आणि त्या खाली विजयाच्या शिल्पकारांचे फोटो. त्यावेळेस चंद्रा, बेदी आणि प्रसन्नानी अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. तो होता लिटील मास्टर   सुनिल गावस्करच्या उदयाचा काळ. पहिल्याच मालिकेत गावस्करने 700 च्या वर धावा कुटल्या होत्या. फारुख इंजिनियरचे मला खुप आकर्षण होते त्याच्या लांब कल्ल्यांमुळे.अजित वाडेकर हे वेस्ट इंडीज विरुध्द विजय मिळवणारे भारताचे कर्णधार होते. वर्तमान पत्रातील येणारे फोटो कापून, एखाद्या मागच्या वर्षीच्या जुन्या वहीत चिटकवून ठेवण्याचा मला छंद जडला होता. असाच एक छंद आगपेटीच्या डबीची वरची कव्हर्स जमा करण्याचाही होता. त्या साठी आगपेटी आणायची म्हटली की ती किराणा दुकानातून केव्हाही आणायला मी तयार असे. दर वेळेस मग वेगळ्याच दुकानातून आणत असे. मग ते कितीही दूर असू दे. मग देवाजवळ किवा तुळशीजवळ आई दिवा लावायची तेव्हा तो एकाच काडीत लागू नये अशी ईच्छा करित असू आम्ही.(आम्ही म्हणजे मी आणि माझचा भाऊ मिलींद.) कारण काड्या जास्त लागल्या तर माचिस लवकर संपत असे.

           लोकसत्ता वाचायला सुरुवात केली ती 1967 साली, म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी, आजही माझ्या घरी लोकसत्ताच येतो. (मधला पॅन्डेमिकचा काळ सोडल्यास , अविरत) पण लोकसत्ताच्या दर्ज्यात या 55 वर्षात खुप फरक पडला, दर्जा घसरला हे खेदाने म्हणावेसे वाटते.

            मिल कंपाऊंडच्या बाहेर पडल्यावर चाळीसगांव पाचोरा रस्ता ओलांडल्यावर, उत्तरेला मारुतीचे मंदिर होते. तिथे शनिवारी खुप गर्दी होत असे. आम्ही आवर्जून जात असू.एक होत मित्रांनो त्यावेळी जातीपातीचा विषय कुणी काढत नसे. एकमेकांनी कधी जातं विचारली नाही आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही.

अशा आज अनोख्या वाटणाऱ्या,जगात मी लहानाचा मोठा झालो. पण हे अनोखे आयुष्य मी माझ्या मुलांना देऊ शकलो नाही आणि नातवांना शक्यच नाही याची खंत कुठेतरी मनाला असते. हा ताण सायकाॅलाॅजीत डिफाईन करण्या सारखा ताण नक्कीच नाही.कारण तो ताण नाही मित्रांनो, ती सल आहे, बोचतच रहाणार.

                                                                                                                                                प्रसाद नातु     


क्रमशः 

Comments

  1. Sir,apla likhan hey nehmi hrudayatun kagadavar alyasarkhe vatte. Enjoyed reading it. Aplya lahanpanichya athvaninshi sagle Jan nakkich enjoy kartil. 1960 pasun ataparyantchya kalkhandhat vegveglya tappyavar vegvegle badal hot gele. Apan nakkich yavar Chan lihu shakal Asa vatta. Please do write.
    Raman Kamble

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...