Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

सुरण एक उपयोगी भाजी (#Dragon stalk yam)

ब्लॉग नं: 2025/274. दिनांक: 30 ऑक्टोबर , 2025. मित्रांनो ,  40  नंतर मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण हवे आहे ?  पोषणतज्ज्ञ सांगतात – ‘सुरण’ खा! 40  वर्षांनंतर आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. मधुमेह (डायबेटीस) ,  उच्च रक्तदाब (हाय बीपी) आणि वजनवाढ , ही या वयात अनेकांना भेडसावणारी प्रमुख आरोग्याची आव्हाने आहेत. अशा वेळी संतुलित आहार ही औषधाइतकीच प्रभावी ठरते .आजच्या ब्लॉग मध्ये आपण या संबंधी सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर : पोषणतज्ज्ञ लीना महाजन यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक साधी पण प्रभावी भाजी सुचवली आहे – सुरण (जिमीकंद/याम्स). दिसायला साधं वाटणारं हे कंदमुळ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे. सुरण खाण्याचे फायदे : लीना महाजन यांच्या मते ,  सुरणाचे नियमित सेवन केल्यास खालील आरोग्यदायी लाभ मिळू शकतात: 1. रक्तातील साखर संतुलित ठेवते – मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेषतः उपयुक्त. 2. हृदयाचे आरोग्य सुधारते – पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. 3. पचनासाठी फायदेशीर – फायबरमुळे बद्ध...

तुमचं लिव्हर रुसलंय तुमच्यावर !

ब्लाॅग नं.2025/274 दिनांकः 29 सप्टेंबर, 2025. मित्रांनो,  तुमच्या शरीरातलं कोणतं अंग तुमच्यावर रुसलेलं आहे ? आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या शारीरिक त्रासाचा सामना करतो. कुणाला थकवा जाणवतो , कुणाचं पचन नीट होत नाही , कुणाला भूक लागत नाही , तर कुणी सतत चिडचिड करतं. पण या त्रासामागचं कारण काय असू शकतं ? खरं तर , तुमचं शरीर तुमच्याशी बोलत असतं… फक्त आपण त्याचं ऐकत शिकत नाही. आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. सविस्तर:           खरं पाह्यला गेलं तर, आपलं शरीर आपल्याला कित्येक वेळा छोटे मोठे संकेत देत असतं. पण त्या संकेतांकडे आपण वेळीच लक्ष देत नाही,आणि मग त्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या संकटात होतं. म्हणून या शरीराच्या छोट्या मोठ्या संकेतांकडे गंभीर पूर्वक पाहणे,गरजेचे आहे.        शरीराचे छोटे-छोटे संकेत: थोडं लक्षपूर्वक पाहिलं , तर आपल्याला काही संकेत दिसू शकतात: जसे की,   1.सकाळी उठतानाच अंग थकल्यासारखं वाटणं, 2.चेहरा फिकट , निस्तेज दिसणं, 3.डोकं जड-जड वाटणं, 4.खाल्ल्यानंतर पोट सुजल्य...

इमल्सिफायर म्हणजे काय? माहित असणे आवश्यक. 2809

ब्लॉग नं: 2025/273 . दिनांक: 2 8 सप्टेंबर, 2025.  मित्रांनो,  इमल्सिफायर म्हणजे काय ? आजकाल बाजारात मिळणाऱ्या , अनेक पॅकेज्ड व फास्टफूड पदार्थांमध्ये इमल्सिफायर ( Emulsifier) हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.साध्या भाषेत सांगायचे तर , तेल व पाणी हे एकमेकात सहज मिसळत नाहीत.पण इमल्सिफायरमुळे हे दोन्ही घटक एकत्र राहून पदार्थाची चव , रंग , बनावट टिकून राहते.त्यामुळेच बिस्किट , चॉकलेट , केक , आईस्क्रीम असे पदार्थ जास्त चविष्ट व टिकाऊ बनतात.पण इमल्सिफायर नेहमी चांगलेच असतात कां ? उत्तर आहे.नाही.आजच्या ब्लॉगमधे इमल्सिफायर म्हणजे काय ? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तरः अन्नपदार्थांमध्ये वापरले जाणारे काही इमल्सिफायर: ( यापैकी काही प्राणीजन्य , विशेषतः गोमांस व डुकराच्या मांसावर आधारित असू शकतात.) 1. E-471 (Mono- and Diglycerides of Fatty Acids) :           सर्वाधिक वापरला जाणारा इमल्सिफायर.यांत   काहीवेळा गोमांस ( Beef) वा डुकराचे मांस ( Pig Flesh) यांच्या चरबीपासून तयार केला जातो. 2. E-472 (Esters o...

पाणी हे जिवन पण जास्त पिणे धोकादायक

ब्लॉग नं: 2025/272. दिनांक: 2 7 सप्टेंबर, 2025.  जागरूकता ही निरोगी मूत्रपिंडांची गुरुकिल्ली नुकताच जागतिक मूत्रपिंड दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने एक संदेश देण्यात आला. पाणी हे जीवनाचे अधिष्ठान आहे. पण एक गोष्ट आपण वारंवार विसरतो,जीवन देणारी हीच गोष्ट , कधी कधी समस्या देखील निर्माण करू शकते.जसे निर्जलीकरणामुळे शरीर त्रासते , तसेच जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.शरीराची नैसर्गिक गाळणी म्हणून कार्य करणाऱ्या , आपल्या मूत्रपिंडांवर त्याचा थेट परिणाम होतो.म्हणूनच एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो . नेमके किती पाणी योग्य आहे आणि जास्त पाणी केव्हा धोकादायक ठरते ? आजच्या ब्लॉगमधे हे आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: मूत्रपिंडांचे खरे काम: केवळ गाळणे नाही , संतुलन राखणे: आपण सहसा मूत्रपिंडांचे काम "फिल्टर" म्हणून समजतो.पण प्रत्यक्षात ते शरीरातील पाणी , क्षार आणि खनिजांचे संतुलन राखणारे नियामक आहेत.जर एखाद्याने अति पाणी प्यायले तर, रक्तातील सोडियमची पातळी कमी होते.या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात.कमी झालेल्या सोडियममुळे शरीरातील द्रव संतुलन बिघ...

नवरात्र केवळ धार्मिक नाही,तिला वैज्ञानिक आधार आहे

  ब्लॉग नं: 2025/27 0 . दिनांक: 2 6 सप्टेंबर, 2025.   मित्रांनो,           कधी तुम्हाला हा प्रश्न पडतो कां,की नवरात्र नऊ रात्रीच का असतं? आणि समजा पडला असेल आणि तुम्ही कुणाला विचारलं असेल,तर त्यानं योग्य,तुमच्या मनाला पटेल असं उत्तर दिलं कां? काल माझ्या वाचनात MSN वर ही पोस्ट आली.आणि मी वाचली देखिल. कारण मला उत्सुकता होती.मला वाचल्यावर कळलं की,या परंपरेत विज्ञान लपलेले किंवा दडलेले आहे.मला पटलं आणि आज मी तुम्हाला ब्लॉगच्या स्वरूपात शेअर करत आहे. सविस्तर:    नवरात्र ही,चंद्राच्या हालचाली आणि ऋतू बदलण्याशी जवळून जोडलेली आहे.ही स्थिती वर्षातून दोनदा येते , उन्हाळा आणि हिवाळा सुरू होताना.हा संक्रमणकालीन काळ आहे,जेव्हा मानवी शरीर सर्वात असुरक्षित असते.नऊ रात्री अमावस्येपासून नवव्या दिवसापर्यंत,चंद्राच्या संपूर्ण चक्राशी संबंधित असतात.प्राचीन ऋषींचा असा विश्वास होता की,निसर्गाच्या लयीशी सुसंगत असताना,शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्यासाठी,नऊ रात्री पुरेशा असतात. नऊ ही संख्या अनेक परंपरांमध्ये पूर्णतेचे प्रतिनिधित्व...

बटाटे योग्य पद्धतीने खा

  ब्लॉग क्र. 2025/26 9 . दिनांक: 2 5 सप्टेंबर , 2025. मित्रांनो, 🥔 बटाटे खाण्याची योग्य पद्धत आणि मधुमेहापासून बचाव: भारतीय स्वयंपाकघरात बटाट्याशिवाय जेवण अपुरेच वाटते. भाजी , पराठा , पुरी , समोसा , वडे , कटलेट कित्येक पदार्थ बटाट्याशिवाय अपूर्ण आहेत. बटाटा हा स्वस्त , सहज उपलब्ध आणि चविष्ट पदार्थ असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो काहीसा वादग्रस्त ठरतो. 🍟 बटाटे आणि मधुमेहाचा धोका: संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की,बटाट्याचे काही प्रकारे सेवन केल्यास ते टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढवतात.टाइप-२ डायबेटीस ही एक जीवनशैलीशी निगडित विकार आहे , ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि शरीर इन्सुलिनसाठी प्रतिरोधक होते.यामुळे दीर्घकाळात हृदयरोग , किडनीचे विकार , अगदी अवयव कापण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात.बटाटे तळून किंवा साध्या कार्बोहायड्रेट्ससोबत खाल्ले तर, रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होते.फ्रेंच फ्राईज हा बटाटे खाण्याचा सर्वात अस्वास्थ्यकर मार्ग आहे , हे आता सर्वमान्य झाले आहे. ✅ आरोग्यदायी पर्याय – मॅश केलेले बटाटे: हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या मते ,...

व्हिटॅमिन डीची कमतरता-रोगप्रतिकारक शक्तीला घातक

  ✍️ ब्लॉग क्र. 2025/267. दिनांकः 24 सप्टेंबर 2025.    मित्रांनो, 🌞 व्हिटॅमिन डी – कमतरता रोगप्रतिकारक शक्तीला घातक : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पोषणाचा अभाव,ही एक मोठी समस्या बनली आहे. कामाचा ताण , असंतुलित आहार , घरात आणि ऑफिसमध्ये बसून काम करण्याची सवय,यामुळे बरेच लोक आवश्यक जीवनसत्वांकडे दुर्लक्ष करतात. त्यात सर्वात जास्त चर्चेत असलेलं जीवनसत्व म्हणजे,व्हिटॅमिन डी . लोक बहुतेक वेळा मानतात की,व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणजे फक्त पाठदुखी , हाडांची समस्या किंवा नैराश्य . पण तज्ज्ञांच्या मते याहूनही गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो.तो म्हणजे याचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.   सविस्तर: 🛡️ व्हिटॅमिन डी आणि रोगप्रतिकारक शक्ती: अमेरिकेतील आरोग्यतज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग सांगतात की , आहारात पुरेसे व्हिटॅमिन डी नसेल तर ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर करते.कारण , व्हिटॅमिन डी हे टी-पेशी ( T-Cells) तयार करण्यात मदत करते.टी-पेशी म्हणजे लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार , ज्या आपलं शरीर संसर्ग , विषाणू आणि विव...

ज्याचे पोट साफ – तो जीवनात जास्त काळ सुखी

  ✍️ ब्लॉग क्र. 2025/ 26 7 .   दिनांकः 2 3 सप्टेंबर , 2025 मित्रांनो, जगात ज्यांचे पोट साफ – ते जीवनात जास्त काळ सुखी राहतात 🌿 असं म्हटलं जातं की, “सुखाचा मार्ग पोटातून जातो” याचा अर्थ चांगले,चविष्ट आणि पोटभर जेवण मिळाल्यावर माणूस सुखी आणि समाधानी होतो.पण फक्त जेवण चांगलं आणि चविष्ट असून चालत नाही,तर त्यासाठी पोट साफ असणे आवश्यक आहे. “ पोट साफ असेल तर मन प्रसन्न , आणि मन प्रसन्न असेल तर जीवन सुखी.” ही आपल्याकडे पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी जुनी म्हण आहे. खरं तर , शरीराचं आणि मनाचं आरोग्य हे थेट पचनसंस्थेशी निगडित आहे. आतडं निरोगी नसेल तर कितीही पौष्टिक आहार घेतला तरी त्याचा उपयोग शरीराला होत नाही. आजचा ब्लॉग या विषयावर आहे.   समारोप: 🌱 जेवतांना खायच्या गोष्टी: रोज जेवताना शेंगदाणा किंवा तीळाची चटणी अवश्य  खावी.तसेच हिरवी मिरची , लसूण आणि मीठ घालून केलेला ठेचा पचन सुधारतो.काकडी , बीट , पानकोबीची कोशिंबीर खाल्ल्याने पोट हलके राहते.आणि जेवणानंतर बडीशोप , ओवा , तीळ युक्त मिश्रण चर्वण केल्याने ढेकर , जळजळ , गॅसेस कमी होतात. 🌿 पोट साफ रहाण्यासाठ...

नवरात्र उत्सव

ब्लॉग नं. 2025/266 दिनांक: 22 सेप्टेंबर, 2025.                           मित्रांनो ,                          नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा                आज घटस्थापना,नवरात्राचा शुभारंभ.महाराष्ट्र हे उत्सवप्रिय राज्य म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रात आज बऱ्याच शहरात दुर्गेची स्थापना करण्यात येते.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे  आराध्य दैवत आहेत आणि त्यांचे आराध्य दैवत तुळजापूरची तुळजाभवानी   होते.त्या अर्थाने महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवाला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत.   सविस्तर: महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठ आहेत.जी साडेतीन शक्तीपिठे म्हणून संबोधली जातात.ती आहेत, कोल्हापूरची अंबाबाई , तुळजापूरची तुळजा भवानी ,  माहूरगडची रेणुकामाता आणि नाशि...