Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

व्हिटॅमिन डीची कमतरता-रोगप्रतिकारक शक्तीला घातक

 ✍️ ब्लॉग क्र. 2025/267.

दिनांकः 24 सप्टेंबर 2025.  

मित्रांनो,

🌞 व्हिटॅमिन डी – कमतरता रोगप्रतिकारक शक्तीला घातक :

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पोषणाचा अभाव,ही एक मोठी समस्या बनली आहे. कामाचा ताण, असंतुलित आहार, घरात आणि ऑफिसमध्ये बसून काम करण्याची सवय,यामुळे बरेच लोक आवश्यक जीवनसत्वांकडे दुर्लक्ष करतात. त्यात सर्वात जास्त चर्चेत असलेलं जीवनसत्व म्हणजे,व्हिटॅमिन डी.लोक बहुतेक वेळा मानतात की,व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणजे फक्त पाठदुखी, हाडांची समस्या किंवा नैराश्य. पण तज्ज्ञांच्या मते याहूनही गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो.तो म्हणजे याचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.  

सविस्तर:

🛡️ व्हिटॅमिन डी आणि रोगप्रतिकारक शक्ती:

अमेरिकेतील आरोग्यतज्ज्ञ डॉ. एरिक बर्ग सांगतात की, आहारात पुरेसे व्हिटॅमिन डी नसेल तर ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर करते.कारण, व्हिटॅमिन डी हे टी-पेशी (T-Cells) तयार करण्यात मदत करते.टी-पेशी म्हणजे लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार, ज्या आपलं शरीर संसर्ग, विषाणू आणि विविध आजारांपासून वाचवतात.

👉 जर शरीरात व्हिटॅमिन डी कमी असेल, तर टी-पेशी नीट कार्य करू शकत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन, व्हायरल अटॅक व ऑटोइम्यून आजारांचा धोका वाढतो.

⚠️ ऑटोइम्यून आजार आणि व्हिटॅमिन डीची भूमिका:

ऑटोइम्यून आजार म्हणजे असे विकार, ज्यात शरीराची संरक्षण यंत्रणा (इम्युनिटी) स्वतःच्या पेशींवरच हल्ला करते.व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे टी-पेशी निरोगी व आजारी पेशींमधला फरक ओळखू शकत नाहीत. त्यामुळे शरीरात चुकीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रिया होऊन निरोगी ऊतींना हानी पोहोचते.काही संशोधनांनुसार, व्हिटॅमिन डी कमी झाल्यास थायमस ग्रंथीचा आकार घटतो आणि रक्तातील टी-पेशींची संख्या कमी होते.

🌿 व्हिटॅमिन डीचे फायदे:

1.व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी बहुमुखी लाभदायी घटक आहे.

2.हाडे आणि दात मजबूत करते.

3.रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

4.मूड सुधारतो, नैराश्य कमी करते.

5.वजन नियंत्रणास मदत करते कारण कॅल्शियम व व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्समुळे भूक कमी होते.

📊 व्हिटॅमिन डीची शिफारस केलेली मात्रा:

राष्ट्रीय आरोग्य संस्थांनुसार:

👶 बाळ (0-12  महिने) 10  mcg (400 IU)

👦 मुले व किशोरवयीन   15  mcg (600 IU)

🧑 प्रौढ (18.70 वर्षे)     15 mcg (600 IU)

👴 70 वर्षांवरील प्रौढ 20 mcg (800 IU)

🤰 गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला 15 mcg (600 IU)

🚨 व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे:

            व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे ही पुढीलप्रमाणे आहेत,जसे की सतत थकवा, अशक्तपणा, झोप नीट न लागणे, हाडे व स्नायूंमध्ये वेदना, नैराश्य किंवा दुःखाची भावना, केस गळणे,भूक न लागणे, रक्तदाब वाढणे आणि वारंवार आजारी पडणे आहेत.  

🌞 व्हिटॅमिन डीचे नैसर्गिक स्रोत:

सकाळी सूर्यप्रकाशात 15-20 मिनिटं फिरणं,

दूध, ताक, दही खाणे.  

अंडी, मासे (सॅल्मन, सार्डिन्स) खाणे

फोर्टिफाइड फूड्स (व्हिटॅमिन डीने समृद्ध धान्य, सोया दूध इ.) चा उपभोग घेणे.  

समारोप:

व्हिटॅमिन डी ही केवळ हाडांसाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक  आहे. याची कमतरता केवळ थकवा किंवा वेदनाच नाही तर गंभीर संसर्ग, ऑटोइम्यून आजार आणि दीर्घकालीन त्रासाचं कारण बनू शकते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता ही शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम करते.   

म्हणूनच—
👉 सूर्यप्रकाश, संतुलित आहार आणि आवश्यकतेनुसार सप्लिमेंट्स या तीन गोष्टींचा योग्य समतोल साधा.
👉 तुमची व्हिटॅमिन डी पातळी योग्य ठेवा आणि तुमचं आरोग्य दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवा. 🌸

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 🏻 लेखक: प्रसाद नातु 

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

 

Comments

  1. उपयोगी माहिती 🙏 RR

    ReplyDelete
  2. उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...