Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

ज्याचे पोट साफ – तो जीवनात जास्त काळ सुखी

 ✍️ ब्लॉग क्र. 2025/267.  

दिनांकः 23 सप्टेंबर, 2025

मित्रांनो,

जगात ज्यांचे पोट साफ – ते जीवनात जास्त काळ सुखी राहतात 🌿

असं म्हटलं जातं की, “सुखाचा मार्ग पोटातून जातो” याचा अर्थ चांगले,चविष्ट आणि पोटभर जेवण मिळाल्यावर माणूस सुखी आणि समाधानी होतो.पण फक्त जेवण चांगलं आणि चविष्ट असून चालत नाही,तर त्यासाठी पोट साफ असणे आवश्यक आहे. पोट साफ असेल तर मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न असेल तर जीवन सुखी.” ही आपल्याकडे पिढ्यानपिढ्या सांगितली जाणारी जुनी म्हण आहे. खरं तर, शरीराचं आणि मनाचं आरोग्य हे थेट पचनसंस्थेशी निगडित आहे. आतडं निरोगी नसेल तर कितीही पौष्टिक आहार घेतला तरी त्याचा उपयोग शरीराला होत नाही. आजचा ब्लॉग या विषयावर आहे.  

समारोप:

🌱 जेवतांना खायच्या गोष्टी:

रोज जेवताना शेंगदाणा किंवा तीळाची चटणी अवश्य  खावी.तसेच हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून केलेला ठेचा पचन सुधारतो.काकडी, बीट, पानकोबीची कोशिंबीर खाल्ल्याने पोट हलके राहते.आणि जेवणानंतर बडीशोप, ओवा, तीळ युक्त मिश्रण चर्वण केल्याने ढेकर, जळजळ, गॅसेस कमी होतात.

🌿 पोट साफ रहाण्यासाठी घरगुती उपाय

पोट साफ रहाण्यासाठी,त्रिफळा चूर्ण (1 चमचा कोमट पाण्यासह) किंवा पतंजली दिव्या उदरकल्प चूर्ण.

तसेच ओवा थोडे चावून खा. भाकरी खातांना भाकरीवर लाल चटणी आणि तेल टाकून खावी.किंवा आठवड्यातून एकदा लहान चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना घ्यावे. रोज सकाळी उठल्यावर कच्चा लसूण (1-2 पाकळ्या कोमट पाण्यासोबत घेणे फायद्याचे ठरते. सकाळी पाव लिंबू, मीठ टाकून कोमट पाणी पिल्याने पोट लगेच साफ होते.यापैकी तुम्ही कुठलाही उपाय करून पाहू शकता.  

🥛 ताक – पृथ्वीवरील अमृत:

रोज जेवणानंतर एक ग्लास ताजं ताक घ्या.त्यात जिरेपूड, धनेपूड, काळं मीठ घातल्यास मल नरम राहतो, गॅसेस कमी होतात आणि ढेकर येणं थांबतं.केवळ ताकावर काही दिवस राहिलं तरी शरीराला पंचकर्मासारखा फायदा होतो. त्वचेला तेज येतं आणि मन प्रसन्न राहतं.

💪 जीवनशैलीतील बदल:

पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरी, नाचणीच्या भाकऱ्या आहारात सामावून घ्या. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या.तसेच जमल्यास सफरचंद व केळी ही दोन फळं रोज खा.व्यायाम दररोज 45 निटं करा. यांत चालणं, सायकलिंग, एरोबिक्स किंवा जिने चढणं,या सारखे व्यायाम करू शकता. योगासनं नियमित केल्याने पचनसंस्था तंदुरुस्त राहते. रात्री झोपताना देशी गायीचं दूध आणि एक चमचा तुप घ्यावे.

🌟 आतड्यांची काळजी का घ्यावी?

तुम्ही लक्षात घ्या की,शरीराच्या 70% रोगप्रतिकारक पेशी आतड्यांमध्ये असतात. चुकीचा आहार, ताणतणाव, पर्यावरणातील प्रदूषण यामुळे पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थ, पाणी आणि ताक यांचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.

🌿 समारोप 🌿

पोट हे आपल्या आरोग्याचं मूळ आहे. निरोगी पोट म्हणजे उत्साही शरीर आणि आनंदी मन. लहानसहान घरगुती उपाय, साधे आहारातील बदल आणि नियमित व्यायाम यामुळे पोट हलकं राहतं, पचन सुधारतं आणि आयुष्य अधिक निरामय होतं.म्हणूनच लक्षात ठेवा. पोट स्वच्छ, तर जीवन सुखी.

👉 या सोप्या आणि नैसर्गिक उपायांचा अंगीकार करा आणि आपल्या आयुष्याला द्या निरोगीपणाचं आणि समाधानाचं वरदान. 🌸

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 🏻 लेखक: प्रसाद नातु 

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

 

Comments

  1. अत्यंत उपयुक्त माहिती, धन्यवाद
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...