Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

सुरण एक उपयोगी भाजी (#Dragon stalk yam)

ब्लॉग नं:2025/274.

दिनांक:30 ऑक्टोबर, 2025.

मित्रांनो

40 नंतर मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण हवे आहेपोषणतज्ज्ञ सांगतात – ‘सुरण’ खा!

40 वर्षांनंतर आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे ठरते. मधुमेह (डायबेटीस)उच्च रक्तदाब (हाय बीपी) आणि वजनवाढ,ही या वयात अनेकांना भेडसावणारी प्रमुख आरोग्याची आव्हाने आहेत. अशा वेळी संतुलित आहार ही औषधाइतकीच प्रभावी ठरते .आजच्या ब्लॉग मध्ये आपण या संबंधी सविस्तर जाणून घेणार आहोत.

सविस्तर:

पोषणतज्ज्ञ लीना महाजन यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक साधी पण प्रभावी भाजी सुचवली आहे – सुरण (जिमीकंद/याम्स). दिसायला साधं वाटणारं हे कंदमुळ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे.

सुरण खाण्याचे फायदे:

लीना महाजन यांच्या मतेसुरणाचे नियमित सेवन केल्यास खालील आरोग्यदायी लाभ मिळू शकतात:

1.रक्तातील साखर संतुलित ठेवते – मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी विशेषतः उपयुक्त.

2.हृदयाचे आरोग्य सुधारते – पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

3.पचनासाठी फायदेशीर – फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि वजन नियंत्रणास मदत होते.

4.त्वचा व रोगप्रतिकारक शक्ती सुधारते – अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला चमक येते आणि शरीराला आजारांपासून]]सुरण कबाब – एक चविष्ट हेल्दी डिश

सुरणाची एक रेसिपी:

आरोग्यदायी खाणे म्हणजे चव गमावणे असे नाही.  महाजन यांनी शेअर केलेली ही सोपी आणि चविष्ट रेसिपी करून बघा:

साहित्य:

1.तेल – 2 टेबलस्पून, 2.आलं – 1 टेबलस्पून, 3.हिरव्या मिरच्या – 2, 4.उकडलेले व चिरलेले सुरण – 250 ग्रॅम, 5.लाल तिखट – 1 टीस्पून,6.हळद – ½ टीस्पून, 7.धणे पूड – 1 टेबलस्पून, 8.जिरे पूड – ½ टीस्पून, 9.ओट्स पीठ/भाजलेल्या हरभऱ्याची डाळीचे पीठ – ½ कप

10.कोथिंबीर – 2 टेबलस्पून, 11.काळीमिरी – १ टीस्पून, 12.गरम मसाला – १ टीस्पून, 13.वेलची पूड – ¼ टीस्पून, 14.लिंबूरस – अर्ध्या लिंबाचा,15.मीठ – चवीनुसार, 16.ब्रेडक्रंब्स – ½ कप, 17.पुदिना – सजावटीसाठी

कृती:

1.कढईत तेल गरम करून आलंमिरच्या आणि सुरण हलके परतून घ्या.2. त्यात लाल तिखटहळदधणे-जिरे पूड घालून दोन मिनिटे शिजवा.3. नंतर ओट्स पीठ घालून नीट हलवा.4. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात कोथिंबीरकाळीमिरीगरम मसालावेलची पूड आणि लिंबूरस घालून मॅश करा.5. मीठ घालून लहान कबाबच्या आकारात गोळे करा.6. ब्रेडक्रंब्समध्ये घोळवून दोन्ही बाजूंनी तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.7. पुदिन्याने सजवून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

विज्ञान काय सांगते?

हेल्थलाइन’च्या अहवालानुसार सुरण हे पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. यात पोटॅशियममॅंगनीजफायबरकॉपर आणि व्हिटॅमिन सी असते. हे घटक हाडांची ताकदचयापचयलोहतत्वाचे शोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.संशोधनात आढळले आहे की,सुरणामध्ये डायोजेनिन (Diosgenin) नावाचे संयुग असते,जे मज्जातंतूंची वाढ आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील दाह कमी होतोकर्करोगाचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्य सुधारते.प्राण्यांवर झालेल्या संशोधनात असे दिसले की,सुरणावर आधारित आहारामुळे आतड्यातील ट्युमरची वाढ कमी होते. तसेच प्रयोगशाळेतील अभ्यासात सुरणाचे अर्क, रक्तातील ग्लुकोज आणि HbA1c कमी करण्यास उपयुक्त ठरले.

समारोप:

मधुमेहउच्च रक्तदाब किंवा वजनवाढ यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर,सुरण आपल्या दैनंदिन आहारात जरूर समाविष्ट करा. हे आरोग्यासाठी उपयुक्त तर आहेचपण योग्य पद्धतीने बनवल्यास खूप चविष्टही लागते.40 नंतरची जीवनशैली अधिक आनंददायी आणि निरोगी करण्यासाठी,हा साधा पण प्रभावी उपाय जरूर करून बघा.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

🏻 लेखक: प्रसाद नातु 

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

Comments

  1. कोणावर छान माहिती बरोबर छान रेसिपी सुद्धा. मस्तच👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...