Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक

 ब्लॉग सं. 2025/229.

दिनांक: 19 ऑगस्ट, 2025.      



मित्रांनो,

मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक

मधुमेह हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा जीवनशैलीचा आजार आहे. तो शरीराच्या जवळजवळ सर्व भागांवर परिणाम करतो.दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास,मूत्रपिंड, हृदय आणि मेंदू यांवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.पण याबाबत घाबरण्याची गरज नाही, कारण हा आजार पूर्णपणे उलट (Reverse) करणे कठीण असले तरी, योग्य आहार, औषधे आणि जीवनशैलीच्या मदतीने तो प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतो.मधुमेह नियंत्रणासाठी 3 सोपे पण प्रभावी आहार घटक,तुम्ही जवळ बाळगलेत,तर त्याचा कसा उपयोग होतो,ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये पहाणार आहोत.  

सविस्तर:

मधुमेह कसा होतो?

जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन,योग्य प्रमाणात होत नाही किंवा शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह निर्माण होतो.मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातील बदल खूप महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर मधुमेहाच्या रुग्णांनी खालील 2 गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या तर त्याचा फायदा नक्कीच होतो.

1. दालचिनीनैसर्गिक रक्तशर्करा नियंत्रक:

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. नील सावलिया यांच्या मते, नाश्त्यानंतर दालचिनीचा एक छोटा तुकडा खाणे फायदेशीर ठरते.त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते याचा अर्थ,शरीरात निर्माण होणाऱ्या इन्सुलिनचा पूर्णपणे वापर शरीर करू शकते.कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते,पचन सुधारते, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू देत नाही, त्यातील अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास सहाय्यक ठरते.  

2. वेलची किंवा वेलदोडा स्वाद आणि औषधी गुणधर्मांचा संगम

वेलदोडा किंवा वेलची ही औषधी गुणधर्मांनी भरलेली असून, आयुर्वेदात तिला हार्ट टॉनिक म्हटले जाते.इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून मधुमेह नियंत्रित करण्यास मदत, दुपारच्या जेवणानंतर 1-2  वेलची चावल्याने पचन सुधारते, रक्तदाब संतुलित ठेवते, बद्धकोष्ठतेपासून मुक्तता देते, आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते.  (डिटॉक्सिफिकेशन) हे सध्या मी करून पहात आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलदोडे घेतो,त्यामुळे माझे पचनाचा प्रश्न बऱ्या पैकी सुटला असे म्हणू शकतो.    

3. लवंगइन्सुलिन स्राव वाढवणारे औषधी दाणे

रात्रीच्या जेवणानंतर 1-2 लवंग खाल्ल्यास, इन्सुलिन स्राव वाढतो, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, तोंडाचे आरोग्य सुधारते म्हणजे सकाळी उठल्यावर तोंडाला येणारा वास येत नाही, संसर्गांपासून बचाव करते, पचनाच्या समस्या कमी होतात आणि लवंगातील नायजेरिसिन नावाचे घटक इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात.

समारोप:

जर तुम्हाला मधुमेह असेल तर योग्य आहार + जीवनशैली + डॉक्टरांनी सांगितलेली औषधे या तिघांचा समतोल राखणे आवश्यक आहे.दालचिनी, वेलची आणि लवंग हे छोटेसे घटक जरी असले तरी, त्यांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.फक्त त्याचे अधिक मात्रेत सेवन केल्यास अॅसिडिटी होऊ शकते. इन्सुलिन संवेदनशीलता या विषयावर एक संपूर्ण  ब्लॉग लिहिण्याचे मनांत आहे. कारण इन्सुलिन संवेदनशीलता म्हणजेच मधुमेह होय.      

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 🏻 लेखक: प्रसाद नातु

 

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अत्यंत उपयुक्त माहिती, धन्यवाद प्रसाद
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. दालचिनी,वेलदोडा आणि लवंग हे तिन्ही पदार्थ अत्यंत उपयुक्त आहे. रोगप्रतिकार व्यक्ती सुद्धा वाढवतात आणि प्रकृती चांगली ठेवतात. छान माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...