Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

जोडप्यांचे प्रकार

ब्लॉग सं. 2025/147.

दिनांकः 28 मे, 2025.

मित्रांनो

हा ब्लॉग आज लिहायचं कारण म्हणजे,आज आमच्या लग्नाचा वाढदिवस.मध्यंतरी,कुठेतरी मी वाचलं होतं की,जोडप्यांचे भिन्न प्रकार असतात.मला आज हेच जाणून घ्यावसं वाटलं की,आपलं जोडपं नेमकं कुठल्या प्रकारात मोडत.जोडप्यांमधील एकमेकांमधील नातेसंबंध,व्यवहार, संवाद,विचारांची देवाणघेवाण हे लक्षात घेऊन एक संशोधन करण्यात आले आणि विषयसाधर्म्य असलेली एक इंग्लिश मालिका, यांत ही भिन्न जोडपी उलगडून दाखविण्यात आले,सांगण्यात आले. आजच्या ब्लॉगमध्ये आपण हे भिन्न प्रकार जाणून घेणार आहोत.

सविस्तर:

गिलॉम प्ले यांच्या व्हिडिओ पॉडकास्ट मालिकेतील "लेजेंड" च्या एका भागात सांगितले आहे की, "सर्व जोडपी सारखीच असतात किंवा जवळजवळ सारखीच असतात." सेक्सोलॉजिस्ट आणि कपल्स थेरपिस्ट गिल्बर्ट बो जौदे यांनी,जोडप्यांच्या नात्यांना समजून घेण्यासाठी,एक साधी परंतु प्रभावी चौकट मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाच प्रकारची जोडपी असतात,जी प्रेम अनुभवण्याचे विविध पाच मार्ग दाखवतात.चला आजच्या ब्लॉगमध्ये या पाच प्रकारच्या जोडप्यांची माहिती करून घेऊ.

सविस्तर: 

गिल्बर्ट बो जौदे जोडप्यांच्या नात्यांचे गुण-वैगुण्य मोजत नाहीत किंवा त्यांना गुणांक देत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक जोडपे हे स्वतःचे अनोखे नाते सांगते.त्यांच्या निरीक्षणाने आणि सल्ल्यानुसार जोडप्यांचे पाच मुख्य प्रकार पुढे आले आहेत. ही प्रकारवारी कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी नाही, तर नात्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि ते कसे कार्य करते याचा विचार करण्यासाठी आहे.

1. फ्यूजन कपल

"फ्यूजन कपल" म्हणजे एकमेकांमध्ये पूर्णपणे विलीन झालेली जोडपी.हे जोडपे प्रत्येक गोष्ट एकत्र करते. त्यांची समान मित्रमंडळी,समान आवडी आणि कधीकधी समान सोशल मीडिया अकाउंटही असतं.त्यांच  तत्त्वज्ञान आहे – "दोघांसाठी एक, एकासाठी दोघं."

फायदे: नाते सुरक्षिततेचे आणि आनंदाचे आश्रयस्थान बनते.

तोटे: जर एका जोडीदाराला अधिक वैयक्तिक स्वातंत्र्याची गरज भासली तर,तणाव निर्माण होऊ शकतो.

2. समांतर जोडपे

समांतर जोडपे,यातील प्रत्येक आपलं स्वतःचं स्वतंत्र जीवन जगतो आणि तरीही नाते टिकवून असतात. उदाहरणार्थ, पती त्याच्या मित्रांसोबत हायकिंगला जातो,तर पत्नी तिच्या मैत्रिणींसोबत सुट्टीचा आनंद घेते.

फायदे: भरपूर स्वातंत्र्य आणि कमी वाद.

तोटे: भावनिक जवळीक कमी होण्याची आणि असण्याची शक्यता.

3. वादग्रस्त जोडपे

"वादग्रस्त जोडपे", ह्या जोडप्यातील जोडीदार, प्रत्येक गोष्टीवर वारंवार वाद घालतात, परंतु त्याचप्रमाणे ते तीव्रतेने एकमेकांवर प्रेमही करतात. त्यांच्यातील वाद कधी कधी नात्याची गरज असते.

फायदे: उत्साहपूर्ण नाते आणि खऱ्या भावना व्यक्त होतात.

तोटे: अशा वादांमुळे भावनिक थकवा येऊ शकतो.

4. साथीदार जोडपे

साथीदार जोडप्यांना "टीम" म्हणून ओळखले जाते. हे जोडपे एकमेकांना बिनशर्त पाठिंबा देतात आणि नातं प्रामाणिकपणे टिकवतात.

फायदे: संतुलन आणि आत्मविश्वास निर्माण होतो.

तोटे: कधीकधी नात्यातील भावनिक भाग,इतका मजबूत होतो की शारीरिक इच्छा कमी होते.

5. पट्टी जोडपे/बांधलेले जोडपे:

पट्टी जोडपे किंवा बांधलेले जोडपे,हे दुःखातून उभे राहते उदाहरणार्थ ब्रेकअप,शोक किंवा विश्वासघातानंतर.हे जोडपे एकमेकांना आधार देते आणि एकमेकांच्या वेदना समजून घेते.

फायदे: खोलात जाऊन ऐकण्याची क्षमता आणि खरा आधार मिळतो.

तोटे: न भरलेल्या जखमेवर नाते बांधल्यामुळे दीर्घकालीन तणाव येऊ शकतो.

समारोप:

गिल्बर्ट बो जौदे यांची टायपोलॉजी ही एक विचार करण्याची चौकट आहे.जोडप्यांचे नाते कालांतराने बदलत जाऊ शकते.म्हणजे,कधी एक फ्यूजन जोडपे,समांतर जोडप्यांमध्ये बदलते,तर कधी वादग्रस्त जोडपे स्थिर साथीदार बनतात.या बदलांमध्ये नात्याचे स्वरूप समजून घेणे आणि गरजांशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते.

यासाठी  नेमके काय करणे जरुरीचे आहे,तर एकमेकांच्या भावना समजून घेणे,एकमेकांच्या गरजांचा आणि विचारांचा सन्मान करणे, नात्यातील चांगल्या गोष्टी ओळखणे,नात्यात येणाऱ्या अडथळ्यांवर काम करणे.शेवटी, योग्य नाते म्हणजे,जिथे तुम्हाला स्वतःसाठी सुरक्षित,आत्मविश्वासू आणि पूर्ण वाटते, होय.  

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...