Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

भारतात हायड्रोजन ट्रेन धांवणार !

ब्लॉग नं: 2025/136

दिनांक: 17 मे, 2025.

मित्रांनो

        तुम्ही कधी हायड्रोजन ट्रेनबद्दल ऐकलंत का? नसेल ऐकलं तर आजच्या ब्लॉगमधे हायड्रोजन ट्रेनबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.बऱ्याच काळापासून असे सांगितलं जातं आहे की,भारत देखिल जर्मनी किंवा चीनप्रमाणे हायड्रोजन ट्रेन बनवण्याचा प्रयत्न करत आहे.यासंबंधात एवढ्यात,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे आणि यासंबंधात एक अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, याच महिन्यात, पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. 

सविस्तरः

आपण अनुभवतं आहोत की,जगभर पर्यावरणाच्या प्रश्नाने भंडावून सोडले आहे,चिंतेत टाकले आहे.या दृष्टीने पाहिलं तर,ही हायड्रोजन ट्रेन आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरणार आहे,हे आपण जाणून घेणार आहोत.   हायड्रोजन इंधन किंवा हायड्रोजनशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टी,कार्बन उत्सर्जित करत नाहीत, हायड्रोजन इंधन बनवणे किंवा हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करणे,हे थोडे थोडे कठीण असले तरी, पृथ्वीवर सर्वात जास्त प्रमाणात काय उपलब्ध असेल,तर ते पाणी आहे आणि पाण्यात काय काय आहे,तर हायड्रोजन आणि ऑक्सीजन आहे.त्यातही पाण्याच्या एका अणूमध्ये दोन हायड्रोजन अणू असतात,त्यामुळे हायड्रोजन सर्वात सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे.या हायड्रोजनचाच वापर करुन ट्रेन चालवली जाणार आहे. 

 जगात कुठे कुठे हायड्रोजन ट्रेन धांवते?

            जागतिक स्तरावर पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे ही जर्मनीत धांवली तर हायड्रोजन ट्रेन चालवणारा दुसरा देश चीन आहे.आता त्यात जगात तिसरा,आता आपला नंबर असणार आहे.  

भारतात पहिली ट्रेन कुठे धावणार

भारतात हरियाणातील जिंद आणि सोनिपत दरम्यान, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. 1000 हॉर्स पॉवरवरचे इंजिन असणार आहे . जगात सध्या 600 ते 700 हॉर्स पॉवरवरची इंजिन प्रचलित आहेत. या ट्रेनमधे एका वेळी जास्तीतजास्त 2638 प्रवासी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतील. यात जर जास्त प्रवासी बसले तर, लिफ्ट जशी ओव्हरलोड झाली की जागीच थांबते,तशी ही ट्रेन जागीच थांबून राहील.

ट्रेनचे डिझाईनः

आता हिच्या डिझाइनबद्दल थोडे काही.या ट्रेनची रचना लखनौच्या रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने केली आहे,यात आठ प्रवासी कोच आहेत आणि त्यासोबत दोन हायड्रोजन इंधन कोच देखील बसवण्यात आले आहेत.आपण पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक गाड्या नेहमी सुरू ठेवू शकतो,पण यामध्ये एकदा इंधन भरले की,थोडी वाट पहावी लागते आणि त्यानंतर ही ट्रेन 1000 किमी पर्यन्त धावू शकते.हायड्रोजन ट्रेनचा वेग 140 प्रती तास असणार आहे.जर्मनीमधे सुरुवातीला दोन बोगी सह हायड्रोजन ट्रेन चालवण्यांत आली.आपण मात्र आठ कोचेसची हायड्रोजन ट्रेन सुरु करत आहोत.

समारोपः

या हायड्रोजन ट्रेनचे वैशिष्ट म्हणजे,ही ट्रेन CO2 किंवा कोणताही पर्यावरणीय प्रदूषक उत्सर्जित करणार नसून, फक्त पाणी आणि वाफ उत्सर्जित करणार आहे.याचा अर्थ ही ट्रेन पर्यावरणपूरक आहे. 

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 


प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...