Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

बेल एक उपयोगी फळ

ब्लाॅग सं.2025/139
दिनांकः- 20 मे, 2025.

मित्रांनो,

बेल ही भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीला धार्मिक, अध्यात्मिक आणि औषधी उपयोगांमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलाच्या पानांचा, फळांचा, सालीचा आणि मुळांचा वापर विविध विकारांवर केला जातो. चला, आजच्या ब्लॉगमध्ये,बेल वनस्पतीचे आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया.

सविस्तरः

बेल पानाचा आरोग्यदृष्ट्या खूप फायदा आणि उपयोग होतो.हे तुम्हाला खालील विवेचनावरुण लक्षात येईल.मग मधुमेह असो, किडनीचे विकार असोत, डोळ्याचे किंवा कानाचे विकार असो, हृदय असो किंवा हृदयाशी संबंधित कोलेस्ट्रॉल,इतकेच काय तर पचनसंस्थेवर देखील बेल फळ किंवा बेल पानाचा रस फायदेकारक आहे.          

1. मधुमेह नियंत्रण:

रोज सकाळी उपाशीपोटी 30 मि.ली. बेल पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

2. डोळ्यांचे विकार:

बेल पानांचा दोन दोन थेंब रस, डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांच्या विकारांपासून मुक्ती मिळते.

3. मानसिक स्थैर्य:

मानसिक अस्थिरता असलेल्या लोकांनी रोज सकाळी,उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून खाल्ल्यास मनःशांती मिळते.

4. कानाचे विकार:

10-15 बेल पाने ठेचून तिळाच्या तेलात गरम करावीत,आणि हे तेल कानात टाकल्याने कानाच्या समस्या दूर होतात.

5. किडनी आणि यकृतासाठी:

बेल पानांचा रस प्यायल्याने किडनी आणि यकृताच्या समस्यांवर गुणकारी परिणाम होतो.

6. पचनसंस्थेसाठी:

कच्च्या बेल फळाचा रस प्यायल्याने,पोटदुखी, मुरडा, आतड्यांना सूज आणि अल्सरेटिव्ह कोलाइटिस, यांसारख्या विकारांवर गुणकारी परिणाम होतो.

7. हृदयासाठी फायदेशीर:

रोज सकाळी उपाशीपोटी 30-40 मि.ली. बेल पानांचा रस, प्यायल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात आणि हृदयाचे कार्य सुधारते.

8. शरीरातील उष्णतेसाठी:

बेल फळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

9. रक्तवाढीसाठी:

बेल पानांचा रस नियमित प्यायल्याने,शरीरात रक्तवाढ होते आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते.

10. कोलेस्ट्रॉल नियंत्रण:

सात-आठ बेल पानांचा काढा तयार करून,तो उपाशीपोटी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.

11. अपचन आणि गॅसेस:

सकाळी उपाशीपोटी 4-5 चमचे बेल पानांचा रस प्यायल्याने,अपचन, गॅसेस आणि मलावरोध त्वरित बरे होतात.

12. थायरॉईडसाठी:

आठ-दहा बेल पानांचा काढा,रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने थायरॉईडचे विकार दूर होतात.

 

13. ताप आणि खोकल्यासाठी:

वारंवार ताप येणे व खोकल्याच्या समस्यांवर,सकाळ-संध्याकाळ बेल पानांचा दोन चमचे रस पिणे लाभदायक ठरते.

समारोपः

बेल ही वनस्पती केवळ आरोग्यदृष्ट्या नव्हे,तर अध्यात्मिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे. आपल्या आजारांवर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी,बेल वनस्पतीचा योग्यप्रकारे उपयोग करावा. या वनस्पतीचे संवर्धन व संगोपन करून,आपण निसर्गाचे आणि आरोग्याचे रक्षण करू शकतो.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

  1. उपयोगी माहिती🙏RR

    ReplyDelete
  2. जुलाबांवर बेलफळाचा मुरंबा खूपच उपयुक्त आहे असा माझा अनुभव आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...