बेल ही
भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व असलेली वनस्पती आहे. या वनस्पतीला धार्मिक, अध्यात्मिक आणि औषधी उपयोगांमुळे
अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलाच्या पानांचा, फळांचा,
सालीचा आणि मुळांचा वापर विविध विकारांवर केला जातो. चला, आजच्या ब्लॉगमध्ये,बेल वनस्पतीचे आरोग्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया.
सविस्तरः
बेल
पानाचा आरोग्यदृष्ट्या खूप फायदा आणि उपयोग होतो.हे तुम्हाला खालील विवेचनावरुण लक्षात
येईल.मग मधुमेह असो, किडनीचे विकार असोत, डोळ्याचे किंवा कानाचे विकार असो, हृदय असो
किंवा हृदयाशी संबंधित कोलेस्ट्रॉल,इतकेच काय तर पचनसंस्थेवर देखील बेल फळ किंवा बेल
पानाचा रस फायदेकारक आहे.
1. मधुमेह
नियंत्रण:
रोज
सकाळी उपाशीपोटी 30 मि.ली.
बेल पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
2. डोळ्यांचे विकार:
बेल
पानांचा दोन दोन थेंब रस, डोळ्यांत टाकल्याने डोळ्यांच्या विकारांपासून मुक्ती
मिळते.
3. मानसिक
स्थैर्य:
मानसिक
अस्थिरता असलेल्या लोकांनी रोज सकाळी,उपाशीपोटी बेलाची तीन-चार पाने चावून
खाल्ल्यास मनःशांती मिळते.
4. कानाचे विकार:
10-15 बेल
पाने ठेचून तिळाच्या तेलात गरम करावीत,आणि हे तेल कानात टाकल्याने कानाच्या समस्या
दूर होतात.
5. किडनी आणि यकृतासाठी:
बेल
पानांचा रस प्यायल्याने किडनी आणि यकृताच्या समस्यांवर गुणकारी परिणाम होतो.
6. पचनसंस्थेसाठी:
कच्च्या
बेल फळाचा रस प्यायल्याने,पोटदुखी, मुरडा, आतड्यांना सूज आणि अल्सरेटिव्ह
कोलाइटिस, यांसारख्या विकारांवर गुणकारी परिणाम होतो.
7. हृदयासाठी फायदेशीर:
रोज
सकाळी उपाशीपोटी 30-40 मि.ली.
बेल पानांचा रस, प्यायल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात आणि हृदयाचे कार्य
सुधारते.
8. शरीरातील उष्णतेसाठी:
बेल फळ
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
9. रक्तवाढीसाठी:
बेल
पानांचा रस नियमित प्यायल्याने,शरीरात रक्तवाढ होते आणि कॅन्सरसारख्या गंभीर
आजारांपासून संरक्षण मिळते.
10. कोलेस्ट्रॉल नियंत्रण:
सात-आठ
बेल पानांचा काढा तयार करून,तो उपाशीपोटी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी
नियंत्रित राहते.
11. अपचन आणि गॅसेस:
सकाळी
उपाशीपोटी 4-5 चमचे
बेल पानांचा रस प्यायल्याने,अपचन, गॅसेस आणि मलावरोध त्वरित
बरे होतात.
12. थायरॉईडसाठी:
आठ-दहा
बेल पानांचा काढा,रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने थायरॉईडचे विकार दूर होतात.
13. ताप आणि खोकल्यासाठी:
वारंवार
ताप येणे व खोकल्याच्या समस्यांवर,सकाळ-संध्याकाळ बेल पानांचा दोन चमचे रस पिणे
लाभदायक ठरते.
समारोपः
बेल ही
वनस्पती केवळ आरोग्यदृष्ट्या नव्हे,तर अध्यात्मिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे.
आपल्या आजारांवर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी,बेल वनस्पतीचा
योग्यप्रकारे उपयोग करावा. या वनस्पतीचे संवर्धन व संगोपन करून,आपण निसर्गाचे आणि
आरोग्याचे रक्षण करू शकतो.
आजचा
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
उपयोगी माहिती🙏RR
ReplyDeleteजुलाबांवर बेलफळाचा मुरंबा खूपच उपयुक्त आहे असा माझा अनुभव आहे.
ReplyDelete