Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

रोज दाढी करणे योग्य आहे का?

ब्लॉग नं  2025/106.

दिनांक: 17 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

            आजचा ब्लॉग हा पुरुषांसाठी आहे आणि त्यातही ज्यांना दाढी येते अशा पुरुषांसाठी.हो काहींना अजिबात दाढी येत नाही,म्हणून असं लिहिणं भाग पडलं आणि माझ्या पहाण्यात असे बरेच लोक आले. पुरुषांपुढे हा प्रश्न असतो की क्लीन शेव ठेवावी की दाढी वाढवावी. क्लीन शेव करायचंच ठरवलं तर दाढी रोज करावी कां? या बाबतीत तज्ञांचे मत काय हे आपण आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.

सविस्तर:

रोज दाढी करणे धोकादायक आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत:

आजच्या युगात व्यक्तिमत्त्व आणि लूकला खूप महत्त्व दिले जाते.विशेषतः पुरुषांसाठी दाढी हे व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनले आहे.दाढी ठेवणे किंवा क्लीन शेव लूक राखणे ही हल्ली फॅशन स्टेटमेंट झालं  आहे. मात्र, रोज शेविंग करावी की नाही याबाबत अनेक पुरुष संभ्रमात असतात. या संदर्भात तज्ज्ञांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

दाढी ठेवण्याचे फायदे आणि स्वच्छतेचे महत्त्व:

दाढी ठेवण्यामुळे त्वचेला थेट धोका नसतो.मात्र, मोठी दाढी असल्यास ती नियमितपणे स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.दिवसभराच्या धावपळीत धूळ, तेल, आणि मृत त्वचेच्या पेशी दाढीत साचतात.यामुळे त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. यासाठी फेशवॉश किंवा क्लिन्झरचा वापर करून दाढी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. दाढीची योग्य निगा न घेतल्यास त्वचेचे पोर्स बंद होण्याची शक्यता असते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

रोज शेविंग करणे सुरक्षित आहे का?

त्वचारोग तज्ञांच्या मते, रोज शेविंग केल्याने त्वचेला कोणताही थेट धोका नसतो. मात्र, शेविंग करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.उच्च गुणवत्तेचा ट्रिमर किंवा रेजर वापरणे आणि योग्य शेविंग क्रीम किंवा जेल निवडणे महत्त्वाचे आहे. अशा काळजीमुळे रोज शेविंग करणे सुरक्षित ठरते.जर एखादी व्यक्ती दाढी महिनाभर शेव करत नसेल, तर ती स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे. स्वच्छ दाढी त्वचेला पोषण देते आणि संसर्गाचा धोका कमी करते.

सेंसिटिव त्वचेसाठी उपाय:

काही पुरुषांची त्वचा अतिशय नाजूक असते. अशा त्वचेवर रोज शेविंग केल्यास जळजळ, लालसरपणा किंवा इतर त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. अशा परिस्थितीत डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरते. योग्य प्रकारची शेविंग उत्पादने न वापरल्यास त्वचेस हानी होऊ शकते. म्हणून संवेदनशील त्वचेसाठी मऊ आणि सौम्य उत्पादने निवडणे महत्त्वाचे आहे.

योग्य शेविंग पद्धतीचे महत्त्व:

शेविंग करताना अनेक पुरुष त्वचेला कापून घेतात किंवा जखम होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी योग्य शेविंग पद्धत अवलंबणे गरजेचे आहे.

  • त्वचेला अतिरिक्त ताण देऊ नका.
  • मऊ रेजर वापरा.
  • संवेदनशील त्वचेसाठी सौम्य उत्पादने निवडा.

स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंगचे महत्त्व:

दाढी ठेवली असो किंवा क्लीन शेव लूक, त्वचेची स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंग हे दोन्ही आवश्यक आहे.दररोज चेहरा आणि दाढी स्वच्छ धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.योग्य फेशवॉश किंवा क्लिन्झर वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

समारोप:

दाढी ठेवणे आणि रोज शेविंग करणे यामध्ये काहीही चुकीचे नाही, पण त्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. स्वच्छता, योग्य उत्पादने, आणि त्वचेची निगा घेतल्यास दाढी ठेवणे किंवा क्लीन शेविंग या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.स्वतःची दाढी आणि त्वचेसाठी योग्य उपाययोजना करा आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास जोडा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु,पुणे.



Comments

  1. शीर्षक वाचून साशंक झालो होतो. ब्लॉग वाचून निःशंक झालो.

    ReplyDelete
  2. Good information 👍

    ReplyDelete
  3. छान ब्लॉग

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...