Blog No.2025/017.
Date: -17th, January,2025.
मित्रांनो,
लयबद्ध आणि मधुर संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या ओ.पी. नय्यर अर्थात ओंकार प्रसाद नय्यर यांची काल 99 वी जयंती. ‘आस्मान” या 1952 साली आलेल्या चित्रपटापासून सुरु झालेली ओपीची कारकीर्द अगदी 1994 पर्यन्त विस्तारलेली होती. ‘जिद’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.अशा या संगीत दिग्दर्शकाला आज त्यांच्या 99 व्या जयंती दिनी माझा मानाचा मुजरा.
प्रास्ताविक
ओपी नय्यर यांचा जन्म 16 जानेवारी, 1926 ला पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. त्यांना तीन भाऊ होते.ओपी यांची पत्नी सरोज ही लग्नापूर्वी स्टेज डान्सर होती.सरोज यांनी “प्रीतम आन मिलो” हे गीत लिहिले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.
कारकीर्द
ओपी नय्यर यांनी सर्वप्रथम 1952 ला “आस्मान” या चित्रपटासाठी संगीत दिले. त्यानंतर छम छमा छम, बाज या चित्रपटांसाठी संगीत दिले.चित्रपट निर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त यांनी त्यांना “आरपार”, “मिस्टर अँड मिसेस 55” आणि CID चित्रपटासाठी करारबद्ध केले.नय्यर यांनी प्रामुख्याने संगीत दिग्दर्शन देतांना मोहम्मद रफी,शमशाद बेगम आणि आशा भोसले यांचा आवाज वापरला. “सारी सारी रात तेरी याद सताए” हे एक गाजलेले गीत जरी लता मंगेशकर यांनी गायलेले असले तरी त्यांनी लता मंगेशकर यांच्या सोबत नंतर काम केले नाही.भारतीय शास्त्रीय संगीतातील “पिलु” हा ओपी यांचा आवडता राग ज्याचे कर्नाटक संगीतातील कपी या रागाशी साम्य आहे. ओपी यांची बरीचशी गाणी या रागावर आधारित असतं.1957 मधे त्यांची नासिर हुसेन यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यासाठी ओपी नी “तुमसा नाही देखा” आणि “फिर वही दिल लया हूं” या चित्रपटांना संगीत दिले.
मोहम्मद रफी यांचेशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी महेंद्र कपूर यांच्यासोबत काम केले. “बहारे फिर भी आयेगी” मधील गाजलेले चित्रपटगीत ‘बदल जाये अगर माली,चमन होता नही खाली. बहारे फिर भी आती है बहारे फिर भी आयेगी” महेंद्र कपूर यांनी गायले होते. त्या नंतर ‘संबंध’ या चित्रपटासाठी “चल अकेला चल अकेला” हे गाणे मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड केले. ‘शमशाद बेगम’ यांच्या सोबत केलेले गाणे “कजरा मोहब्बत वाला” हे गाणे खूप हित झाले. त्यानंतर “नया दौर” या चित्रपटातील गाणी खूप गाजली.या चित्रपटातील “ये देश हे वीर जवानोका” हे अजूनही देशभक्ती गीत म्हणून लोकप्रिय आहे. CID मधे जॉनी वॉकरवर चित्रांकित झालेले “ए दिल है मुश्किल जीना यहा” हे गाणे देखिल खूप गाजले. किशोर कुमार मधील कलाकार त्यांनी खूप आधी ओळखला होता. किशोर कुमारला त्यांनी ‘बाप रे बाप’ आणि ‘रागिनी’ या दोन चित्रपटात संधि देखिल दिली.पण त्यांचे नाते जास्त टिकले नाही. “प्राण जाये पर वचन न जाये” या 1973 ला आलेल्या चित्रपटापासून ओपी नय्यर यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. त्यांनी एकंदर 75 चित्रपटासाठी संगीत दिले.त्यांनी 1992 मधे आलेल्या सलमान खान आणि करिश्मा कपूर अभिनित "निश्चय" या चित्रपटाला संगीत दिले होते. यातील 'देखो देखो तुम हो गया गुम' हे अमितकुमारने गायलेले, खास ओ.पी.नय्यर शैलीतील गीत खुप गाजले होते.
ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी
ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी पुढील प्रमाणे ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’,‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, “रेशमी सलवार कुर्ता’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘इशारो इशारो मे दिल’, ‘दिवाना हूवा बादल’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘जायिए आप कहा जाएगी’, ‘मन मोरा बांवरा’, ‘मेरा नाम चीन चीन चु’, ‘चल चल अकेला’, ‘बदल जाए अगर माली चमन होता नही खाली’, ‘सवेरे का सूरज तुम्हारे लिये है’, ‘लेके पहला पहला प्यार’, ‘ऐ दिल है मुश्किल जिना यहा’, ‘आँखों ही आँखों मे इशारा हो गया’, ‘कभी आर कभी पार’, ‘बाबूजी धीरे चलना’, ‘आओ हुजूर तुमको’ आणि इतर खूप सारी, ज्यांची यादी द्यायची झाली तर ती खूप मोठी होईल.
मृत्यू
28 जानेवारी,2007 ला हा महान संगीतकार आपल्याला सोडून गेला. त्यांचे मृत्यू समयी वय 81 वर्षे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी,एक मुलगा आणि तीन मुली एवढा परिवार ते सोडून गेले.
समारोप
अशा या लयबद्ध आणि मधुर संगीताच्या बादशहाला त्यांच्या 99 व्या जयंती निमित्त माझ्या कडून विनम्र अभिवादन. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
photo courtesy @music unrestricted
Nice information
ReplyDelete