Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

टपरवेअर कंपनी झाली दिवाळखोर

Blog No 2024/250.

दिनांक:22,ऑक्टोबर2024 

मित्रांनो,

            तुम्हाला कदाचित आठवत असेल की,स्वयंपाकघरात जे प्लॅस्टिकचे डब्बे आपण टिकाऊ आहेत म्हणून आणि जरी थोडे महाग असले तरी वापरत होतो,ते म्हणजे टपरवेअर कंपनीचे डब्बे असतं. एवढ्यात मात्र हे नांव ऐकू येईनासे झाले. कारण डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले? हे आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये.

सविस्तर:

टपरवेअर कंपनीचा एकतरी डब्बा (कंटेनर) प्रत्येकाच्या घरी मिळेलच. हे नाव आपल्या अगदी परिचयाचे आहे.अन्नासाठी सगळ्यात सुरक्षित प्लास्टिक म्हटलं तर टपरवेअरचे नावच आधी यायचे. घटती विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे ‘टपरवेअर ब्रॅंड कॉर्प’ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. फूड स्टोरेज कंटेनर फर्मने यापूर्वीही दिवाळखोरीचा इशारा दिला होता.मात्र, कंपनीवर ही वेळ का आली? कंपनीचे नक्की काय चुकले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

टपरवेअरची स्थापना

टपरवेअरची स्थापना 1946 मध्ये केमिस्ट अर्ल टपर यांनी केली. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या संस्थापकाला महामंदीनंतर लगेचच,एका प्लास्टिक कारखान्यात मोल्ड तयार करताना कंपनीची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली.अन्न अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी टपरवेअरमध्ये नवीन प्लास्टिक वापरण्यात आले.जेव्हा अनेक कुटुंबांसाठी फ्रीज खूप महाग होते,त्या लोकांनी टपरवेअरच्या डब्यांचा वापर केला.परंतु, अगदी सुरुवातीला कंपनी इतकी लोकप्रिय नव्हती.

कसा झाला कंपनीचा विस्तार:

अमेरिकेच्या सेल्सपर्सन ब्राउनी वाईज यांनी टपरवेअरला घराघरात पोहोचवले.त्यांनी त्यासाठी ‘टपरवेअर पार्टीज’ आयोजित करण्यास सुरुवात केली.ज्यामध्ये घरोघरी जाऊन स्त्रियांना टपरवेअर विकले जायचे. हा ब्रँड 1950 आणि 1960 च्या दशकात लोकप्रिय झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक याचा वापर करू लागले.टपरवेअरच्या लवचिक हवाबंद सील डब्यांमुळे इतरांच्या तुलनेत त्याला वेगळेपण आले आणि त्याची मागणी वाढू लागली. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांची उत्पादने जगभरातील सुमारे 100 देशांमध्ये विकली जात होती.भारतात देखिल अनेक स्त्रिया टपरवेअर कंपनीची एजन्सी घेऊन काम करत होत्या.   

कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली कशी?

आता ग्राहक पर्यावरणपूरक डब्यांचा वापर करू लागले आहे. टपरवेअरची प्लास्टिक उत्पादने आजच्या पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांशी जुळवून घेऊ शकली नाहीत. “टपरवेअरचा काळ आता संपला आहे,” असे हरग्रीव्स लॅन्सडाऊन येथील मनी अँड मार्केट्सच्या प्रमुख सुसाना स्ट्रीटर यांनी बीबीसीला सांगितले. “खरेदीदारांच्या वर्तनातील बदलांमुळे टपरवेअर या ट्रेंडच्या बाहेर ढकलले गेले.ग्राहकांनी प्लास्टिक सोडण्यास सुरुवात केली आहे आणि अन्न साठवण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक मार्ग शोधले.”

गेल्या वर्षी टपरवेअर कंपनीने ही कंपनी बंद होऊ शकते, असे जाहीर केले होते.करोना काळात टपरवेअर मागणीत थोड्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, करोनानंतर टपरवेअरच्या मागणीत घट झाली. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, प्लास्टिक आणि शिपिंगच्या किमती,अलीकडच्या वर्षांत झपाट्याने वाढल्याने, कंपनीला वाढत्या खर्चामुळेदेखील धक्का बसला आहे. स्वस्त, नॉन-ब्रँडेड प्लास्टिक खाद्यपदार्थांच्या कंटेनरशी स्पर्धा करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कंपनीला उच्च वेतन आणि वाहतूक खर्चाचाही फटका बसला.

टपरवेअरने अलीकडेच अ‍ॅमेझॉन आणि टार्गेद्वारे उत्पादने विकून तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जूनमध्ये ऑर्लँडो येथील फर्मने 2024 च्या सुरुवातीस आपला अमेरिकेतील एकमेव कारखाना बंद केला आणि उत्पादनाचे कामकाज मेक्सिकोमध्ये हलवले.तसेच 148 कामगारांना कामावरून काढून टाकले असल्याचे देखील सांगितले.

दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल

टपरवेअरने दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला. “गेल्या अनेक वर्षांपासून, मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे,” असे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी ॲन गोल्डमन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीने आपल्या ब्रँडचे संरक्षण करण्यासाठी आणि कंपनीमध्ये आणखी रूपांतर करण्यासाठी,व्यवसायासाठी विक्री प्रक्रिया सुरू करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

न्यूयॉर्क येथील फर्मने दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान कार्यरत राहण्यास स्वारस्य व्यक्त केले आहे. ‘एएफपी’नुसार गोल्डमन म्हणाले, “आम्ही या प्रक्रियेदरम्यान आमच्या ग्राहकांना आवडत असलेल्या आणि विश्वास ठेवत असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांसह सेवा देत राहण्याची योजना आखत आहोत.” बीबीसीने वृत्त दिले की, कंपनी दिवाळखोरी जाहीर करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या आठवड्यात त्यांचे शेअर्स 50 टक्क्यांहून अधिक घसरले.

टपरवेअरची सूचीबद्ध मालमत्ता 500 दशलक्ष ते एक अब्ज इतकी आहे, तर कंपनीची देणी एक अब्ज ते 10 अब्जापर्यंत वाढली आहे. कर्जदारांनी कर्जाची भरपाई सुरू ठेवल्यानंतरही व्यवसायात घसरण सुरूच होती. टपरवेअरने सांगितले की, गेल्या वर्षी नवीन व्यवस्थापन संघाच्या नियुक्तीनंतर त्यांच्या योजना आणि कार्यक्षमता सुधारण्यात प्रगती झाली आहे. परंतु, खरंच कंपनी पुन्हा उभी राहू शकेल का, की निधीअभावी कंपनी पूर्णपणे बंद पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



समारोप:

            जागतिक बाजारपेठेत टिकून रहाणे, हे आव्हान असतं, स्पर्धा जीवघेणी असते. तसेच राष्ट्राराष्ट्रातील व्यवहारिक संबंध यावर देखिल बरेच काही अवलंबून असतं. म्हणून आपण बऱ्याच वेळा हे बघतो की एखादी वस्तु किंवा एखादी कंपनी बाजारात जेवढी जोमाने पुढे येते,प्रसिद्धी पावते,लोकप्रिय होते,तेवढ्याच वेगाने,झपाट्याने ती पाठीमागे पडते आणि बऱ्याच वेळी लुप्त होते.बघूया टपरवेअर पुनः फिनिक्स पक्षासारखी उसळी मारून वर येते की नाहीशी आणि लुप्त होते.   

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु,पुणे.             


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...