Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

मधुमेह हात पाय पसरवतोय

Blog No 2024/225.

दिनांक:24,सप्टेंबर, 2024 

मित्रांनो,

            मागील वर्षी 321 आणि यावर्षी 225 ब्लॉग्ज मी लिहिले.पण एक विषय असा आहे की मी त्या विषयावर तीन ते चार वेळा ब्लॉग लिहिला आणि आज पुनः 5 व्या वेळेस लिहितो आहे,कारण तो तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.मी रोज ब्लॉग लिहिण्यासाठी काही पोस्ट म्हणा काही चॅनल चाळत असतो,त्या सर्वात देखिल मधुमेह या विषयावर जास्तीतजास्त पोस्ट असतात,याला कारण मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि लोकांचे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणे कारणीभूत आहे. आज पुनः मधुमेह या विषयावर ब्लॉग लिहीत आहे.

सविस्तर:

            इतक्यात माझ्या संबंधातील दोघांनी मधुमेह झाला आहे कां ते तपासण्यासाठीची,HBA1c ही शरीरातील तिमाही सरासरी शुगरची तपासणी करणारी टेस्ट केली. आणि हे प्रमाण 7 च्यावर म्हणजे मधुमेह झाला आहे हे दर्शविणारे होते.पण त्यांची Fasting म्हणजे सकाळी उठल्याबरोबर घेतलेली शुगर आणि जेवणानंतर 2 तासांनी घेतलेली शुगर नॉर्मल होती. म्हणून ते HBA1c कडे दुर्लक्ष करून मला मधुमेह नाही असे घोषित करते झाले. अपोलो लॅबोरटरीजच्या HBA1c टेस्टिंग प्रमाणे मधुमेहाची पातळी आणि त्यावरचा अभिप्राय असा आहे.

 वेगवेगळ्या लॅबोरटरीजच्या नुसार आंकडे थोडे इकडे तिकडे असू शकतात.  

1.       HBA1c 5.7 च्या खाली मधुमेह नाही.

2.       HBA1c 5.7 ते 6.4 मधुमेह पूर्व (म्हणजे होऊ शकतो)

3.       HBA1c 6.5 आणि त्याच्यावर म्हणजे मधुमेही

मधुमेहीसाठी  

4.       HBA1c 6 ते 7 म्हणजे Excellent Control

5.       HBA1c 7 ते 8 Fair to Good Control

6.       HBA1c 8 ते 10 Unsatisfactory Control

7.       HBA1c 10 च्या पुढे Poor Control

            याचा अर्थ हाच आहे की ज्याची शुगर लेव्हल 5.7 च्या खाली आहे, तो मधुमेही नाही,तो सामान्य म्हणता येईल. यातील नंबर 4 ते 7 जे मधुमेही आहेत आणि जे गोळ्या आणि/किंवा इंसुलिन घेतात. त्यानंतरची त्यांची तीन महिन्यांची सरासरी शुगर लेव्हल आहे.ते नंबर जे मधुमेही नाही त्यांच्यासाठी लागू नाही.

            हे सगळे द्यायचे कारण हे की भारतात जेवढे निदान झालेले मधुमेही आहेत, त्यापेक्षा हा आंकडा किती तरी जास्त असू शकतो असे वारंवार माझ्या वाचनात आले आहे.आजकाल मधुमेह होण्यासाठी अमुक वय झालं तर होऊ शकतो असं राहिलेले नाही. म्हणून खाली दिलेली लक्षणे तुमच्यात आढळून येत आहेत कां बघा. कारण मधुमेह हा सायलंट किलर आहे,त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर तो एक एक अवयव निकामी करत जातो. डायबिटीजची (मधुमेह) लक्षणे दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागली जातात: टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज, आणि त्यातील लक्षणे काही प्रमाणात वेगवेगळी असू शकतात. दोन्ही प्रकारात रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढते, ज्यामुळे खालील सामान्य लक्षणे आढळतात:

 सामान्य लक्षणे (दोन्ही प्रकारांसाठी):

1. खूप तहान लागणे (Polydipsia) - वारंवार तहान लागणे, जरी भरपूर पाणी प्यायलं तरी.

2. वारंवार लघवीला जाणे (Polyuria) - रात्रीसह वारंवार लघवीला लागणे.

3. भूक वाढणे (Polyphagia) - जास्त भूक लागणे.

4. अतिशय थकवा (Fatigue) - खूपच थकल्यासारखं वाटणे, ऊर्जेची कमतरता.

5. वजन कमी होणे - कारणाशिवाय वजन घटणे, विशेषत: टाइप 1 डायबिटीजमध्ये.

6. अंधुक दृष्टि (Blurred Vision) - डोळ्यांवर परिणाम होऊन दृष्टी अस्पष्ट होणे.

7. हळू भरून येणाऱ्या जखमा - त्वचेवरील जखमा, चिरा किंवा संसर्ग हळू भरून येणे.

8. वारंवार संसर्ग होणे - मूत्रपिंडाचे किंवा त्वचेचे संसर्ग वारंवार होणे.

टाइप 1 डायबिटीजचे लक्षणे:

- लहान वयात किंवा तरुणांमध्ये सामान्यतः आढळतात.

- लक्षणे अचानक सुरू होतात.

- वजन अचानक आणि जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.  

टाइप 2 डायबिटीजचे लक्षणे:

- सामान्यतः प्रौढांमध्ये किंवा वृद्धांमध्ये आढळतात.

- लक्षणे हळूहळू विकसित होतात.

- वजन कमी होण्याऐवजी वजन वाढलेले किंवा स्थिर राहते.

लक्षणांमध्ये विशेष:

- टाइप 2 डायबिटीजमध्ये काहींना प्रारंभिक लक्षणे दिसत नाहीत, म्हणून हा आजार हळूहळू आणि अनियंत्रितपणे वाढतो.

समारोप:

            यापैकी कुठलीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.कारण वेळीच इलाज केलात तर मधुमेह नियंत्रण (औषधे आणि आहाराचे योग्य नियोजन करून ) शक्य होऊ शकते.त्याला जास्त वाढू देऊ नका.अन्यथा दृष्टी दोष, किडनीचे आजार,उच्च रक्तदाब आदि रोग उद्भवू शकतात. तेव्हा वेळीच काळजी घ्या, काळजी करू नका.टाइप 1 हा आनुवंशिक असू शकतो आणि टाइप 2 हा ताण,तणाव,काळजी इत्यादि मुळे होतो.

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...