Blog No. 2024/ 052.
Date:20th, March 2024.
मित्रांनो,
भारत सरकारने 2019 मधे कलम 370 हटविले. त्या वेळेस विरोधी पक्ष
आणि अनेक संघटनांनी याचा विरोध केला होता. कलम 370 ने जम्मू आणि काश्मीर राज्याला भारतातील
इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा दिलेला होता.भारतीय संघराज्यात केलेले कायदे जम्मू आणि
काश्मीरला लागू होत नव्हते.भारतातील कुठल्याही व्यक्तीस या राज्यात स्थावर मालमत्ता
खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.एक प्रकारे ते एक वेगळं राष्ट्र असल्यासारखे होते.कलम
370 हटविल्यानंतर खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन झाले.जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी नेत्या शेहला रशीद यांची नुकत्याच CNN-News18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली,त्या संबंधात
लिहिण्यासाठी आज हा दूसरा ब्लॉग.
सविस्तर
जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी
नेत्या शेहला रशीद यांची 19 मार्च रोजी CNN-News18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात
मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमात तिने नरेंद्र मोदी सरकारचे समर्थक होण्याच्या
निर्णयाचा बचाव केला आणि ती म्हणाली की काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे,ती नाही.तिचे
म्हणणे आहे की "बरेच लोक म्हणतात की मी 180-डिग्री यू-टर्न घेतला...
पण वस्तुस्थिती अशी आहे की मी बदलले नाही
तर काश्मीरमधील जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे. मी फक्त त्या बदलाची कबुली देत आहे."
शेहला रशीद च्या मते ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर खोऱ्यात बरेच विकासात्मक बदल झाले.CNN-News18 मार्की लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या चौथ्या आवृत्तीच्या रायझिंग भारत समिट 2024 मध्ये बोलताना रशीद म्हणाली की 10 वर्षांपूर्वी आम्ही "स्वातंत्र्याची
" मागणी करत होतो.पण आता आमचे मुद्दे बदलले आहेत.आता चांगले रस्ते बनवणे आणि
वीज कपात कमी करणे हे आमचे मुद्दे झाले आहेत.हे आमचे सरकार आहे आणि आमच्या मागण्या
यांच्या समोर आम्ही मांडू शकतो हा भरवसा आमच्यात आला आहे.”
“आम्ही अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी किती सामान्य काश्मिरी रांगेत उभे
होते हे पाहिले. माझा अजेंडा हा सरकारची खुशामत करण्याचा नाही.आम्ही दिवसरात्र मोदी
मोदी करणार नाही.मी सहमत आहे की अजूनही काही समस्या सोडवायच्या आहेत,जसे
की सतत पॉवर कट. पण,
हा एक बदल आहे की आता रस्ते आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या
समस्या,या आमच्या समस्या झाल्या आहेत.ती म्हणाली की लोक आता सरकारकडे तक्रारी करत
आहेत.स्वतःचा विचार करत आहेत,सोई सुविधांचा विचार करत आहेत."
शेहला रशीद ही माजी विद्यार्थी नेता म्हणाली “कोविड -19 साथीच्या आजारादरम्यान तिची भूमिका जी भूमिका होती ती आता बदलली आहे.“मला
जाणवले की कधीकधी,आम्ही मास्क,
लस आणि लॉकडाऊन यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून सरकारचा
विरोध करत होतो. आमचा विरोध कधी कधी उभारलेल्या छावण्यांमुळे होता. सरकारचा बदलाचा
सिद्धांत वेगळा होता आणि आमचा वेगळा होता. उदाहरणार्थ, 10 वर्षांपूर्वी आम्ही पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावर आधारला विरोध करत होतो.पण
आता आम्ही डिजी यात्रा आणि डिजी लॉकर सारखे ॲप्स वापरतो,” तिने असेही म्हटले की आम्ही आधी विरोधासाठी विरोध करत होतो.
तिने पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले आणि सांगितले की, तुमच्या वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यात काही गैर नाही.
"मेरी जितनी मेरी उमर नहीं है, उतना पीएम मोदी का अनुभव है [पीएम मोदींचा अनुभव माझ्या
वयापेक्षा खूप जास्त आहे].
समारोप
मी देखिल
हेच सांगू इच्छितो की मी सरकारची खुशामत करण्यासाठी हे लिहीत नाही,तर जम्मू आणि काश्मीर
मधे राहणारी हे तरुणी जर असे सांगत असेल तर ही चांगली गोष्ट आहे.काश्मीर खोऱ्यात किती
नागरिकांनी आणि सैनिकांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहेत. तिथे जर “अमन आणि शांती”
नांदत असेल तर कुणाला नको आहे. तुमचा,माझा,आपला भारत देश असाच शांततेत नांदो,जेणेकरून
जे गरीब आहेत,मागास जातीतील आहे.त्यांना देखिल 75 वर्ष नंतर कां होईना स्वातंत्र्याची
फळे चाखायला मिळोत.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
🙏👍
ReplyDelete👍👍
ReplyDeleteखूप छान माहिती. खर तर राजकारण पक्ष बाजूला ठेऊन ह्या बदलाचं सकारात्मक बदलाचं सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे
ReplyDeleteWe must take advantage of the changing times and engage them on the process of our great nation
ReplyDelete