Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

जम्मू आणि काश्मीर बदलते आहे.

 Blog No. 2024/ 052.   

Date:20th, March 2024.

 

मित्रांनो,

            भारत सरकारने 2019 मधे कलम 370 हटविले. त्या वेळेस विरोधी पक्ष आणि अनेक संघटनांनी याचा विरोध केला होता. कलम 370 ने जम्मू आणि काश्मीर राज्याला भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा दिलेला होता.भारतीय संघराज्यात केलेले कायदे जम्मू आणि काश्मीरला लागू होत नव्हते.भारतातील कुठल्याही व्यक्तीस या राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.एक प्रकारे ते एक वेगळं राष्ट्र असल्यासारखे होते.कलम 370 हटविल्यानंतर खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन झाले.जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी नेत्या शेहला रशीद यांची नुकत्याच CNN-News18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली,त्या संबंधात लिहिण्यासाठी आज हा दूसरा ब्लॉग.

 

सविस्तर

जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या माजी नेत्या शेहला रशीद यांची 19 मार्च रोजी CNN-News18 च्या रायझिंग भारत समिट या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमात तिने नरेंद्र मोदी सरकारचे समर्थक होण्याच्या निर्णयाचा बचाव केला आणि ती म्हणाली की काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे,ती नाही.तिचे म्हणणे आहे की "बरेच लोक म्हणतात की मी 180-डिग्री यू-टर्न घेतला... पण वस्तुस्थिती अशी आहे की मी बदलले  नाही तर काश्मीरमधील जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे. मी फक्त त्या बदलाची कबुली देत आहे."

शेहला रशीद च्या मते ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर खोऱ्यात बरेच विकासात्मक बदल झाले.CNN-News18 मार्की लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या चौथ्या आवृत्तीच्या रायझिंग भारत समिट 2024 मध्ये बोलताना रशीद म्हणाली की 10 वर्षांपूर्वी आम्ही "स्वातंत्र्याची " मागणी करत होतो.पण आता आमचे मुद्दे बदलले आहेत.आता चांगले रस्ते बनवणे आणि वीज कपात कमी करणे हे आमचे मुद्दे झाले आहेत.हे आमचे सरकार आहे आणि आमच्या मागण्या यांच्या समोर आम्ही मांडू शकतो हा भरवसा आमच्यात आला आहे.”  

आम्ही अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी किती सामान्य काश्मिरी रांगेत उभे होते हे पाहिले. माझा अजेंडा हा सरकारची खुशामत करण्याचा नाही.आम्ही दिवसरात्र मोदी मोदी करणार नाही.मी सहमत आहे की अजूनही काही समस्या सोडवायच्या आहेत,जसे की सतत पॉवर कट. पण, हा एक बदल आहे की आता रस्ते आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या,या आमच्या समस्या झाल्या आहेत.ती म्हणाली की लोक आता सरकारकडे तक्रारी करत आहेत.स्वतःचा विचार करत आहेत,सोई सुविधांचा विचार करत आहेत."

            शेहला रशीद ही माजी विद्यार्थी नेता म्हणाली “कोविड -19 साथीच्या आजारादरम्यान तिची भूमिका जी भूमिका होती ती आता बदलली आहे.मला जाणवले की कधीकधी,आम्ही मास्क, लस आणि लॉकडाऊन यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून सरकारचा विरोध करत होतो. आमचा विरोध कधी कधी उभारलेल्या छावण्यांमुळे होता. सरकारचा बदलाचा सिद्धांत वेगळा होता आणि आमचा वेगळा होता. उदाहरणार्थ, 10 वर्षांपूर्वी आम्ही पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावर आधारला विरोध करत होतो.पण आता आम्ही डिजी यात्रा आणि डिजी लॉकर सारखे ॲप्स वापरतो,” तिने असेही म्हटले की आम्ही आधी विरोधासाठी विरोध करत होतो.

तिने पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले आणि सांगितले की, तुमच्या वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यात काही गैर नाही. "मेरी जितनी मेरी उमर नहीं है, उतना पीएम मोदी का अनुभव है [पीएम मोदींचा अनुभव माझ्या वयापेक्षा खूप जास्त आहे].

समारोप

            मी देखिल हेच सांगू इच्छितो की मी सरकारची खुशामत करण्यासाठी हे लिहीत नाही,तर जम्मू आणि काश्मीर मधे राहणारी हे तरुणी जर असे सांगत असेल तर ही चांगली गोष्ट आहे.काश्मीर खोऱ्यात किती नागरिकांनी आणि सैनिकांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहेत. तिथे जर “अमन आणि शांती” नांदत असेल तर कुणाला नको आहे. तुमचा,माझा,आपला भारत देश असाच शांततेत नांदो,जेणेकरून जे गरीब आहेत,मागास जातीतील आहे.त्यांना देखिल 75 वर्ष नंतर कां होईना स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळोत.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. खूप छान माहिती. खर तर राजकारण पक्ष बाजूला ठेऊन ह्या बदलाचं सकारात्मक बदलाचं सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे

    ReplyDelete
  2. We must take advantage of the changing times and engage them on the process of our great nation

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...