Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

भारत आघाडीची आर्थिक शक्ती बनण्याच्या मार्गावर

 Blog No. 2024/ 055.   

Date:29th, March 2024. 

मित्रांनो,

            बरेच दिवस झाले ब्लॉग लिहिला नाही आणि पोस्ट केला नाही.नुकतीच माझ्या वाचनात,भारताच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.अरविंद पनगरिया,यांची टाइम्स नाऊ समिट 2024 मधील मुलाखत वाचनात आली.त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की,काही भारतीय आणि जागतिक पातळीवर,भारताच्या विकास क्षमतेबद्दल सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते,त्या लोकांनी आपल्या चष्म्यावर बसलेले धुके आधी तपासून पहावे आणि मग टीका करावी.कारण जो जीडीपी डेटा आहे तो सांख्यिकीशास्त्रज्ञांच्या अतिशय व्यावसायिक एजन्सीजकडून करवून घेण्यात आला आहे. आज याच विषयावर ब्लॉग लिहिला आहे.   

सविस्तर

            डॉ अरविंद पनगरिया म्हणतात,की आता भारताला थांबवता येणे शक्य नाही,कारण भारत एक आघाडीची शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे.ते पुढे म्हणतात की,भारत,75 वर्षांहून अधिक काळ लोकशाही टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या विकसनशील देशाचे एक दुर्मिळ उदाहरण आहे.कारण दुस-या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या आणि विकसनशील देश असलेल्या फार कमी देशांनी लोकशाही टिकवून ठेवली आहे.

            ते पुढे म्हणतात की लोकशाहीत, एकमत घडवण्यास वेळ लागतो,परंतु एकदा सहमती निर्माण झाली की ती टिकून राहते,याच्या विपरीत हुकूमशाही राजवटीत,जेथे नेत्यांमध्ये झालेले बदल हे उलथापालथ घडवू शकतात.याचे उदाहरण म्हणजे चीन होय.दुसरे म्हणजे, 1992-93 मधे आपल्या देशात आर्थिक सुधारणा आता जवळपास 31-32 वर्षानंतर आपण सुरू ठेवल्या आहेत आणि काही सुधारणा अजून प्रलंबित आहेत, त्यावर देखिल जवळपास एकमत झाले आहे.या नव्या सुधारणांचा मार्ग कदाचित 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक सोपा,सरळ आणि स्वच्छ असेल.

            त्यांच्या मधे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये, कोणतेही प्रतिस्पर्धी नाहीत.कारण अमेरिका आणि युरोप या परिपक्व अर्थव्यवस्था आहेत,ज्या कदाचित 2%, 3% वाढतील. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने आपली मोठी प्रगती केली आहे. भूतकाळात दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर यांसारख्या वेगाने वाढलेल्या देशांची आकडेवारी बघितल्यास,अतिशय वेगवान वाढ होण्यास तीन दशकांचा कालावधी लागतो हे दिसून येते.चार दशकांपर्यन्त 8% ते 10% वाढ असलेल्या अर्थव्यवस्था नंतर  5 %, 6 % वर येतात आणि मग पाचव्या दशकात ती 3% किंवा 4% वर येतो.त्यामुळे चीनमधील नेतृत्वाने काही  वेगळे निर्णय घेतले आहे,जे वाढीस फारसे अनुकूल नाहीत.एवढेच नाही तर स्वतःच्या उत्क्रांतीच्या दृष्टीनेही ते आता अशा ठिकाणी पोहोचले आहे,जिथे त्याचा विकास दर घसरला आहे.त्यामुळे,भारत ही एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे.

            डॉ अरविंद पनगरिया यांच्या मते चौथा घटक देखिल महत्वाचा आहे.तो म्हणजे आज भारताचा जीडीपी,  ज्याला पाया म्हणता येईल तो, सुमारे $3.6 ट्रिलियन इतका भक्कम आहे.या आधीच्या काळात जीडीपी इतका कमी होता की 7%, 8%, 9% ची वाढ देखील पुरेशी वाटत नव्हती.त्यामुळे आता अर्थव्यवस्थेची वाढ शक्य वाटते आहे आणि हे होऊ शकते,असा विश्वास वाटतो.त्यात केंद्रात आणि अनेक राज्यांमध्येही सक्षम नेतृत्व आहे, हे वेगळे सांगायला नको.असे डॉ अरविंद पनगरिया म्हणतात.  

            चीनने आधीच शिखर गाठले आहे आणि भारताबाबतचा सर्वमान्य समज असा आहे की, भारताचा अमृत काल नुकताच सुरू झाला आहे आणि पुढील दोन-तीन दशके भारत विकासित देश बनवण्याच्या दिशेने मोठी गती आणणार आहेत. 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकते. चीनची गती कमी होत आहे आणि भारत योग्य वेळी वेग वाढवत आहे का?

            डॉ अरविंद पनगरिया यांचा याकडे पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोण म्हणजे, दरडोई उत्पन्न,दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण अजूनही $3,000 च्या खाली आहोत. अंदाजे  $2,500. याचा अर्थ असा की आपले दरडोई उत्पन्न आणि इतर देशांनी जे काही साध्य केले आहे त्यात खूप मोठी तफावत आहे.ते म्हणतात की सध्याच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने,आपण कालांतराने अधिक भांडवल वाढवून,आपली उत्पादकता पातळी वाढवली आणि  सरासरी कामगार उत्पादकता पातळी लक्षणीय उच्च पातळीपर्यंत नेऊन ठेवली,तर आपण चीनशी दक्षिण कोरियाशी तुलना करू शकतो.50, 60, 70 आणि 80 च्या दशकात भारताचे दरडोई उत्पन्न आणि इतर देशातील दरडोई उत्पन्न या याहूनही मोठी तफावत असेल,पण तेव्हा आर्थिक सुधारणा झाल्या नाहीत.खूप विविध प्रकारचे घ्यावे लागत.एक प्रकारचे परवानाराज अस्तित्वात होते.त्यामुळे उद्योजकांना खरोखरच मुक्त वातावरण नव्हते. 

आपली अर्थव्यवस्था खुली

            आज उद्योजकांना मुक्त वातावरण आहे.आपली अर्थव्यवस्था खुली आहे,गुंतवणूक येते आहे, तंत्रज्ञानाचा वापर शक्य झाला आहे.आणि जेव्हा प्रत्येकाला जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींशी स्पर्धा करावी लागते,तेव्हा त्यांच्यातून सर्वोत्तम गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे,यापुढे कदाचित यापेक्षाही अधिक वेगवान वाढ होणे शक्य होईल. आपली अर्थव्यवस्था सध्या प्रतिवर्षी सुमारे 7% किंवा त्यापेक्षा जास्त दराने वाढत आहे.आणि पुढील पाच वर्षात आणखी काही सुधारणांसह,आपण हा दर 8% किंवा 9% पर्यन्त गाठू शकतो.ही वाढ एक-दोन दशके सहज टिकून ठेवल्यावर जेव्हा विकास दर घसरेल, जसे की इतर सर्व देशांच्या बाबतीत घडले आहे, तरीही आपण 6% किंवा 7% दर कायम ठेवू शकू. 

समारोप

            डॉ अरविंद पनगरिया यांनी अतिशय शास्त्र शुद्ध पद्धतीने,जे लोक आपल्या अर्थव्यवस्थेवर किंवा तिच्या वाढण्याच्या गतीवर प्रश्न चिन्ह करत आहेत,त्यांना उत्तर दिले आहे.अर्थात ज्याला कधी कुठलीच गोष्ट स्वीकारायची नसते आणि नकारात्मक बोलत रहायचे असते.ते कधी सत्य स्वीकारतांना दिसत नाही.पण देश बदलत आहे हे नक्की.लोकांमध्ये काही तरी करण्याची जिद्द असणे,ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांना तसे  पूरक वातावरण मिळणे ही देखिल तितकीच महत्वाची गोष्ट आहे.याचा मेळ साधला गेला तर विकास घडत असतो.मग कुणामुळे कां असेना सकारात्मक बदल घडताहेत हे महत्वाचे.   

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

           

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...