Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

केप टाऊन आणि बंगळुरू, धडा घ्यायला हवा

 Blog No. 2024/ 049.   

Date:17th, March 2024. 

मित्रांनो,

            काल दोन बातम्या वाचनांत आल्या,ज्या विचार प्रवर्तक तर होत्या पण चिंताजनक देखिल होत्या. पहिली बातमी ही की आपल्या देशातील बंगळुरू हे पाण्याच्या संकटाचा सामना करत आहे आणि दुसरी आहे दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” हे 14 एप्रिल नंतर जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात येणार आहे.मित्रांनो,आपल्याला “जे मुबलक प्रमाणात मिळत असतं,त्याचं किंवा त्याला कधीच मूल्य नसतं” हा अर्थशास्त्रीय नियम जरी खरा असला तरी,पाण्याच्या बाबतीत आपण त्याला अपवाद करायला हवं.पाण्याला मोल देणे आपल्याला शिकावच लागेल.कारण ते जर दिलं नाही तर,आज *केपटाऊन*चं झालं ते आपल्या शहराचं व्हायला वेळ लागणार नाही. 

सविस्तर

            काही वर्षापूर्वी मी दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” बद्दल जरूर ऐकलं होतं,की तिथे लोकांना पाण्याचा तुडवडा जाणवतोय.पण आता ती बातमी येऊन ठेपली आहे,ज्या बाबत काही वर्षापूर्वी मी वाचलेल्या बातमीत भाकीत केलेले होते.ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने जाहीर केले आहे की 14 एप्रिलला ते जगातील पहिले पानी नसलेले शहर म्हणून जाहीर केले जाईल आणि त्यानंतर तेथील सरकारने पाण्याचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविली आहे.तेथील लोकांना आंघोळ करण्यास मनाई करण्यात आली आहे.10 लाख लोकांचे पाण्याचे  कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू झाली आहे.केप टाऊन हे अटलांटिक महासागराच्या काठावर वसलेले शहर आहे. “सागर इतना मेरे पास है, फिर भी जिवन मे मेरे प्यास है” हे तेथील लोकांची अवस्था आहे.   भारतात ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले जाते, त्याचप्रमाणे केपटाऊनमध्ये पाण्याचे टँकर असतील जिथे 25 लिटर पाणी उपलब्ध असेल, अधिक पाणी मागणाऱ्या किंवा पाण्याची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

आपल्याला महाराष्ट्रात रेल्वेने लातूरला (महाराष्ट्र) पाणी पाठवले जात असल्याचे आठवत असेल. आता बंगळुरू पाण्यासाठी झगडत आहे.उद्या आपला नंबर लागू शकतो.रोजच्या जिवनात खरोखर आपल्याला किती पाणी लागतं आणि आपण किती खर्च करतो,याचा विचार करण्याची वेळ आली आहे.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.आपण कुणी आलं तर त्याला ग्लास मधे पाणी देतो,त्याला जेवढी तहान लागलेली असते तेवढे पाणी तो पितो. त्यापेक्षा आपण त्याच्या पुढ्यात एक तांब्याभर पाणी आणि ग्लास ठेऊन,त्याला म्हणायला हवं की आवश्यक तेवढचं पाणी ग्लासमध्ये घ्या,पाणी उरवू नका आणि मला फेकायला लावू नका,असं स्पष्ट बोलायची वेळ आता आली आहे.हे मी माझ्या घरी सुरू केलं आहे.  पाणीपातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.वृक्ष तोड करून आपणच पाण्याचा स्त्रोत बंद व्हायला कारणीभूत झालो आहोत. 

समारोप

हॉटेल,रेस्टारंट मधे देखिल पाण्याचा गैरवापर होत असतो,तो टाळायला हवा.एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत करू शकतो.एवढेच नव्हे तर आपण इतरांना याबाबत जागरूक करायला हवे.तुम्ही ते सहज करू शकता. :-

 1. रोज कार/बाईक धुवू नका*.

 2. अंगण/जिने/फरशी धुणे टाळा किंवा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करा.

 3. टॅप सतत चालू ठेवू नका. विशेषतः  ब्रश करतांना.  

 4.जेवढे पाणी प्यायचे आहे तेवढेच ग्लास मधे घ्या आणि पिऊन टाका. प्यायले तर कदाचित तुम्ही कमी पाणी पित असाल तर शरीराला फायदा होईल.  

 5. घरातील गळणारे नळ दुरुस्त करा. दुरुस्त होत नसल्यास बदलून टाका.   

 6. झाडाना कमीत कमी पाणी द्या.

 7. अंगणात सडा घालू नका.

8.  पाण्याचा गैरवापर टाळा आणि इतर नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करा,प्रत्येकाने किमान एकाला जागृत केले तरी ही चळवळ वाढीस लागेल.या संकटाला एकजुटीने सामोरे जाऊया.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. छान ब्लॉक लिहिलं थँक्स केप टाउन बंगलोर आता हा प्रश्न आपल्या घरातील येणार आहेत याबद्दल चिंता व्यक्त नक्कीच केली आहे पण सर्वांनी पाऊल उचलायला पाहिजे एवढेच.
    वृक्षतोड भयंकर होत आहेत त्याबाबतीत सुद्धा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे विकासाचं मॉडेल हे सस्टेनेबल असलं पाहिजे पाण्याचे स्त्रोत म्हणजे वृक्ष तेच आपण संपत चाललो आहे याचे परिणाम पुढच्या पिढीला नक्कीच भोगावे लागतील

    ReplyDelete
  2. खरं आहे.प्रत्येकाने याकडे गंभीरपणे बघण्याची वेळ आली आहे. मीही पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते

    ReplyDelete
  3. Nature gives man disposes. This rampant loot of nature must be stopped. Nice blog.

    ReplyDelete
  4. माहितीपूर्ण लेख. पाण्याचा वापर जपून करायला हवा.विषय निवड उत्तम. भावना नातू.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर लेख. भीषण वास्तवता या लेखातून होते. आपण सगळ्यांनीच वेळेत पाण्याचं मोल ओळखलं नाही तर आपल्यावर सुध्धा ही भीषण संकट येयला वेळ लागणार नाही. त्यामुळे vflugh योग्य पावले उचलून पाणी वाचवणे योग्य ठरेल


    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...