Blog No. 2024/ 049.
Date:17th, March 2024.
मित्रांनो,
काल दोन बातम्या वाचनांत आल्या,ज्या विचार प्रवर्तक तर होत्या पण चिंताजनक देखिल होत्या. पहिली बातमी ही की आपल्या देशातील बंगळुरू हे पाण्याच्या संकटाचा सामना करत आहे आणि दुसरी आहे दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” हे 14 एप्रिल नंतर जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात येणार आहे.मित्रांनो,आपल्याला “जे मुबलक प्रमाणात मिळत असतं,त्याचं किंवा त्याला कधीच मूल्य नसतं” हा अर्थशास्त्रीय नियम जरी खरा असला तरी,पाण्याच्या बाबतीत आपण त्याला अपवाद करायला हवं.पाण्याला मोल देणे आपल्याला शिकावच लागेल.कारण ते जर दिलं नाही तर,आज *केपटाऊन*चं झालं ते आपल्या शहराचं व्हायला वेळ लागणार नाही.
सविस्तर
काही वर्षापूर्वी मी दक्षिण आफ्रिकेची राजधानी “केपटाऊन” बद्दल
जरूर ऐकलं होतं,की तिथे लोकांना पाण्याचा तुडवडा जाणवतोय.पण आता ती बातमी येऊन ठेपली
आहे,ज्या बाबत काही वर्षापूर्वी मी वाचलेल्या बातमीत भाकीत केलेले होते.ते म्हणजे दक्षिण
आफ्रिकेच्या सरकारने जाहीर केले आहे की 14 एप्रिलला ते जगातील पहिले पानी नसलेले शहर
म्हणून जाहीर केले जाईल आणि त्यानंतर तेथील सरकारने पाण्याचा पुरवठा करण्यात असमर्थता
दर्शविली आहे.तेथील लोकांना आंघोळ करण्यास मनाई करण्यात आली आहे.10 लाख लोकांचे पाण्याचे कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू झाली आहे.केप टाऊन
हे अटलांटिक महासागराच्या काठावर वसलेले शहर आहे. “सागर इतना मेरे पास है, फिर भी जिवन
मे मेरे प्यास है” हे तेथील लोकांची अवस्था आहे. भारतात
ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले जाते, त्याचप्रमाणे
केपटाऊनमध्ये पाण्याचे टँकर असतील जिथे 25 लिटर पाणी उपलब्ध
असेल, अधिक पाणी मागणाऱ्या किंवा पाण्याची लूट करणाऱ्यांवर
कारवाई करण्यासाठी पोलिस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
आपल्याला महाराष्ट्रात रेल्वेने लातूरला (महाराष्ट्र) पाणी पाठवले जात असल्याचे आठवत असेल. आता बंगळुरू पाण्यासाठी झगडत आहे.उद्या आपला नंबर लागू शकतो.रोजच्या जिवनात खरोखर आपल्याला किती पाणी लागतं आणि आपण किती खर्च करतो,याचा विचार करण्याची वेळ आली आहे.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.आपण कुणी आलं तर त्याला ग्लास मधे पाणी देतो,त्याला जेवढी तहान लागलेली असते तेवढे पाणी तो पितो. त्यापेक्षा आपण त्याच्या पुढ्यात एक तांब्याभर पाणी आणि ग्लास ठेऊन,त्याला म्हणायला हवं की आवश्यक तेवढचं पाणी ग्लासमध्ये घ्या,पाणी उरवू नका आणि मला फेकायला लावू नका,असं स्पष्ट बोलायची वेळ आता आली आहे.हे मी माझ्या घरी सुरू केलं आहे. पाणीपातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.वृक्ष तोड करून आपणच पाण्याचा स्त्रोत बंद व्हायला कारणीभूत झालो आहोत.
समारोप
हॉटेल,रेस्टारंट मधे
देखिल पाण्याचा गैरवापर होत असतो,तो टाळायला हवा.एक जबाबदार नागरिक म्हणून आपण
पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत करू शकतो.एवढेच नव्हे तर आपण इतरांना याबाबत
जागरूक करायला हवे.तुम्ही ते सहज करू शकता. :-
1. रोज कार/बाईक धुवू नका*.
2. अंगण/जिने/फरशी धुणे टाळा
किंवा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करा.
3. टॅप सतत चालू ठेवू नका. विशेषतः
ब्रश करतांना.
4.जेवढे पाणी प्यायचे आहे तेवढेच
ग्लास मधे घ्या आणि पिऊन टाका. प्यायले तर कदाचित तुम्ही कमी पाणी पित असाल तर शरीराला
फायदा होईल.
5. घरातील गळणारे नळ दुरुस्त
करा. दुरुस्त होत नसल्यास बदलून टाका.
6. झाडाना कमीत कमी पाणी द्या.
7. अंगणात सडा घालू नका.
8. पाण्याचा गैरवापर टाळा आणि इतर नागरिकांमध्ये जागृती
निर्माण करण्याचा प्रयत्न करा,प्रत्येकाने किमान एकाला जागृत केले तरी ही चळवळ वाढीस
लागेल.या संकटाला एकजुटीने सामोरे जाऊया.
तुम्हाला आजचा
ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
छान ब्लॉक लिहिलं थँक्स केप टाउन बंगलोर आता हा प्रश्न आपल्या घरातील येणार आहेत याबद्दल चिंता व्यक्त नक्कीच केली आहे पण सर्वांनी पाऊल उचलायला पाहिजे एवढेच.
ReplyDeleteवृक्षतोड भयंकर होत आहेत त्याबाबतीत सुद्धा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे विकासाचं मॉडेल हे सस्टेनेबल असलं पाहिजे पाण्याचे स्त्रोत म्हणजे वृक्ष तेच आपण संपत चाललो आहे याचे परिणाम पुढच्या पिढीला नक्कीच भोगावे लागतील
खरं आहे.प्रत्येकाने याकडे गंभीरपणे बघण्याची वेळ आली आहे. मीही पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत असते
ReplyDeleteNature gives man disposes. This rampant loot of nature must be stopped. Nice blog.
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख. पाण्याचा वापर जपून करायला हवा.विषय निवड उत्तम. भावना नातू.
ReplyDeleteखूप सुंदर लेख. भीषण वास्तवता या लेखातून होते. आपण सगळ्यांनीच वेळेत पाण्याचं मोल ओळखलं नाही तर आपल्यावर सुध्धा ही भीषण संकट येयला वेळ लागणार नाही. त्यामुळे vflugh योग्य पावले उचलून पाणी वाचवणे योग्य ठरेल
ReplyDelete🙏🏾👏
ReplyDelete