Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

कर्ण मधुर संगीताचा जनक संगीतकार खय्याम

 Blog No.2024/033

Date: -18th, February,2024. 

मित्रांनो,

            “दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिये” हे गाणे म्हटले की जशा आशा भोसले डोळ्यासमोर उभ्या रहातात. तसंच एक नांव आठवल्याशिवाय रहात नाही, ते म्हणजे संगीतकार खय्याम. आपल्या कर्णमधुर संगीताने ज्यांनी लोकांची मनं जिंकली त्या खय्याम यांची आज 97 वी जयंती. आजचा हा ब्लॉग त्यांना समर्पित.    

सविस्तर    

मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी यांचा जन्म एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२७ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबातील राहोन या गांवी झाला.ते लहानपणी नवी दिल्लीत आपल्या मामाच्या घरी पळून गेले. तेथे त्यांना शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित अमरनाथ यांच्याकडून प्रशिक्षण मिळाले.

करिअर

चित्रपटांतील भूमिकांच्या शोधात खय्याम लाहोरला गेले. तेथे त्यांचा पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिश्ती यांच्याशी परिचय झाला. त्यांनी चिश्ती यांच्या रचनेचा पहिला भाग गायला. प्रभावित होऊन चिश्ती यांनी त्यांना सहाय्यक म्हणून सामील होण्याची ऑफर दिली.खय्याम यांनी चिश्ती यांना सहा महिने मदत केली आणि ते 1943 मध्ये लुधियानाला आले. तेव्हा ते केवळ १७ वर्षांचे होते.

दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लष्करात काम केले. 1948 मध्ये हीर रांझा चित्रपटाद्वारे संगीतकार म्हणून पदार्पण केले. बीवी या 1950 ला आलेल्या चित्रपटातील मोहम्मद रफीने गायलेले "अकेले में वो घबराते तो होंगे" हे गाणे हिट ठरले.त्यानंतर फूटपाथ  या चित्रपटातील तलत मेहमूद यांनी गायलेले "शाम-ए-गम की कसम" हे गाणे जबरदस्त गाजले. राज कपूर आणि माला सिन्हा यांच्या फिर सुबह होगी या चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली, ज्यात साहिर लुधियानवी यांची मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेली गाणी खय्याम यांनी संगीतबद्ध केली होती.त्यापैकी "वो सुबह कभी तो आयेगी", "आसमान पे है खुदा और जमीन पे हम" आणि "चिन-ओ-अरब हमारा" ही उल्लेखनीय होतं. कैफी आझमी यांनी लिहिलेल्या शोला और शबनम चित्रपटातील गाणी गाजली. चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत मधील लताचे "बहारों मेरा जीवन भी सवरों" आणि रफीचे "और कुछ देर ठहर" ही गाणी खूप गाजली. त्यानंतर 1976 ला आलेल्या यश चोप्रा दिग्दर्शित 'कभी कभी' मध्ये त्यांनी साहिर लुधियानवीसोबत पुन्हा काम केले. मुकेश आणि लता यांनी गायलेले "कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है", किशोर आणि लता यांनी गायलेले "तेरे चेहरे से नजर नहीं" आणि  मुकेश यांनी गायलेले "मैं पल दो पल का शायर हूं" ह्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले.त्यानंतर त्यांनी त्रिशूल, थोडी सी बेवफाई, बाजार, दर्द, नूरी, नखुदा, सवाल, बेपन्ना आणि खानदान या चित्रपटांना संगीत दिले.

त्यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन म्हणजे 1981 ला आलेल्या मुझफ्फर अलीच्या उमराव जान” मधील त्यांनी संगीत दिलेली आणि आशा भोंसले यांनी गायलेली "आँखों की मस्ती के", "ये क्या जगा है दोस्त", आणि "दिल चीज क्या है" ही गाणी होतं. कभी कभी चित्रपटातील गाणी ऐकून राजेश खन्ना यांनी आपल्या थोडिसी बेवफाई, दर्द  आणि दिल-ए-नादान (1982) साठी संगीत दिले. त्यांनी कमाल अमरोही दिग्दर्शित रझिया सुलतान (1983) चित्रपटासाठी संगीत दिले आणि लताने गायलेले त्यांचे "आये दिल-ए-नादान" हे गाणे मैलाचा दगड मानले जाते.

त्यांनी मिर्झा गालिब, दाघ, वली मोहम्मद वली, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी आणि नक्श ल्यालपुरी, निदा फाजली, जान निसार अख्तर आणि अहमद वासी यांच्या गीतांवर काम केले.  खय्यामच्या संगीताला गझलचा स्पर्श होता, पण त्याचे मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात होते. रचना भावपूर्ण, मधुर आणि भावनिक होत्या, गाणी कविता आणि उद्देशाने समृद्ध होती आणि शैली त्या काळातील लोकप्रिय संगीत ब्रँडपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळी होती, जे एकतर अर्ध-शास्त्रीय, गझल किंवा हलकी आणि आकर्षक असायची.   

पुरस्कार आणि सन्मान

1.       1977 ला कभी कभी साठी  फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार;

2.       1982 ला उमराव जान साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार;

3.       1982 ला उमराव जान साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

4.       2007 संगीत नाटक अकादमी पुरस्कार

5.       2010 फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार

6.       2011 भारताचा तृतीय सर्वोच्य नागरी पुरस्कार पद्मभूषण.  

मृत्यू

19 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 

समारोप

            कभी कभी मेरे दिलमे, मै पलदो पलका शायर हूं, हजार राहे मुडके देखी या, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा सारखी कर्णमधुर गाणी जी आजही ओठावर रेंगाळतात.त्या सुरेल संगीतकारास 97 व्या जयंतीनिमित विनम्र अभिवादन.        

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

image courtesy!  Wikipedia

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. खैय्याम हे अतिशय लोकप्रिय संगीतकार होते.त्यांनी संगीत दिलेले सिनेमे देखील प्रचंड लोकप्रिय झाले.कर्णमधुर गाणे व सुयोग्य संगीत साज हे त्यांचे वैशिष्ट्य होते.अजरामर संगीतकार : अनंत मिसे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...