Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

2023 मिश्र परिणामांचे वर्ष

 Blog No.2023/321. 

Date: -31st, December 2023. 

मित्रांनो,

            या वर्षातील म्हणजे 2023 चा हा 321 वा ब्लॉग. आज 2023 संपणार आणि उद्यापासून 2024 सुरु होणार. नवीन संकल्प सोडायचा दिवस.माझे म्हणाल तर मी संकल्प केला आहे. येत्या वर्षात  ब्लॉग ची संख्या 350 पर्यन्त नेण्याचा प्रयत्न करणार आहे.अर्थात तसे विषय मिळणे आवश्यक असते.पण प्रयत्न नक्की असेल. आजच्या ब्लॉगमध्ये वर्ष 2023 मधे भारतात काय काय विशेष घडलं याचा आढावा आपण घेणार आहोत. 

प्रास्ताविक

            2023 हे भारतासाठी संमिश्र स्वरूपाचे गेले.भारतात दोन आंतरराष्ट्रीय एवेंट्स झाले. एक G-20 परिषद आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2023. आता प्रत्येक महिन्यात काय महत्वाच्या गोष्टी घडल्या हे थोडक्यात बघू या. 

जानेवरी 2023

            वर्षाच्या सुरुवातीला विनेश फोगट,साक्षी मलिक आणि बजरंग पूनिया यांच्या नेतृवाखाली भारतीय कुस्तीगीरांनी भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध आंदोलन सुरु केले.यामागे सत्य किती होते आणि राजकारण किती हे सांगणे कठीण.कारण ब्रिज भूषण शरण सिंग यांनी अध्यक्ष पद स्वीकारताच प्रदेशांमधील सगळे अध्यक्ष बरखास्त करून टाकले होते. जे 70-80 वर्षाचे झाले तरी अध्यक्ष पदी  कायम होते.त्यातील एक नांव म्हणजे महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते. त्या लोकांनी प्रमुख खुर्च्या आडवून ठेवल्या होत्या. कामाच्या नावाने बोंब. 

फेब्रुवरी 2023

            या महिन्यात आपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीषकुमार सिसोदिया यांच्यावर सीबीआयने अटक केली. त्यानंतर दारू वितरकांना लाभ पोहोचविण्यात आला. त्यात भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.  

 मार्च 2023

            मार्च महिन्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर “सब मोदी चोर है” या वक्तव्याबद्दल गुजरातमधील कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी काढून घेण्यात आली. याच महिन्यात उत्तर पूर्वेतील राज्यात निवडणुका झाल्या.  

 एप्रिल 2023

            एप्रिल 2023 मधे भारत जगात सर्वात जास्त लोकसंख्या आसलेले राष्ट्र घोषित करण्यात आले. चीनच्या 142.57 कोटी लोकसंख्येला मागे टाकत आपली लोकसंख्या 142.86 कोटी झाली.उत्तर प्रदेशात कुप्रसिद्ध गुंड अतिक अहमदची हत्या करण्यात आली.

 मे 2023

            मणीपुरमध्ये हिंसाचाराचे थैमान मे महिन्याने बघितले. मैतियी समुदाय आणि इतर यांच्यातील हा संघर्ष पेटला.

            मे 2023 मधे देशाला नवे संसद भवन मिळाले. 971 कोटी रुपये खर्चून या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सध्याच्या संसद भवनात 543 आणि 250 अनुक्रमे ,लोकसभा आणि राज्यसभा बसू शकतात. त्याऐवजी नवीन संसद भवनात 888 आणि 300 अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभा बसू शकतील. देशाला 75 वर्षे पूर्ण होऊन देखिल भारतात स्वतःचे बांधलेले संसद भवन नव्हते. ही लाजिरवाणी गोष्ट होती.

 जून 2023

            या महिन्यात कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात होऊन त्यात 280 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि जवळपास 850 लोक जखमी झाले. कोरोमंडल एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीवर आदळून हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.     

 जुलै 2023

            हा महिना भारतासाठी लाजिरवाणा ठरला. मणीपुर दोघा स्त्रियांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला.

 ऑगस्ट 2023

            ऑगस्ट महिन्यात भारताला भूषणावह अशी कामगिरी भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखविली. 23 ऑगस्ट 2023 चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरविण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत पहिला देश ठरला.

 सप्टेंबर 2023

            भारतात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या G-20 जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले.भारताला या परिषदेचे अध्यक्षपद आणि यजमानपद मिळाले.       

 ऑक्टोबर, 2023

            सिक्कीममधील साऊथ ल्होनक लेक हा 17000 फुट उंचीवरचा तलाव फुटल्याने तिस्ता नदीला पूर येऊन 70 लोकांचा मृत्यू झाला. ज्यात आर्मीच्या जवानांचा समावेश होता.           

 नोवेंबर 2023

            या महिन्यात मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभेसाठी मतदान झाले.

            तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधे सतत 10 सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताला अजिंक्यपद खेचून आणण्यात अपयश हाती लागले. याच महिन्यात 41 मजूर जे बोगदा दुर्घटनेत अडकले होते. त्यांची अखेर सुखरूप सुटका झाली.

 डिसेंबर 2023   

या महिन्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेश विधानसभा स्वतःकडे राखत राजस्थान आणि छत्तीसगढ येथील कॉंग्रेसची सत्ता खाली खेचत भारतीय जनता पार्टीने एनडीए खाली राज्यांची संख्या 17 पर्यन्त पोहोचवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. कॉंग्रेसला तेलंगणामध्ये सत्ता मिळविता आली.

 समारोप

            2024 या वर्षाची सुरुवात अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाने होणार आहे. या वर्षी तुम्हा सर्वांसाठी आणि भारतासाठी सर्व मंगलमय होईल ही आशा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. आता भेटू या नवीन वर्षात.   

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  प्रसाद नातु, पुणे.     

image courtesy@shutterstock                                      

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...