Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

उत्सव म्हणजे श्रद्धा,भक्ती? की एक इवेंट?

Blog No.2023/277           

Date: - 24th, October 2023.

 मित्रांनो,

            आजचे माझे लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.पण बुवाबाजी आणि भोंदुगिरी यासारख्या गोष्टींमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिति सारख्या संघटनांचा उदय झाला.आणि त्यात काही प्रमाणात अंधश्रद्धे सोबत श्रद्धेचे निर्मूलन झाले आहे.कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी रेषा आहे.श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष अश्या आहेत. माझ्यासाठी जी श्रद्धा आहे ती तुमच्यासाठी अंधश्रद्धा असू शकते आणि vice versa.आज या विषयावर मी लिहिणार आहे. 

आपला परिसर

            मित्रांनो,आज आजूबाजूला नुसती नजर टाकली तर काय दिसतंय. माणूस स्वतःला इतरांपासून दूर ठेवू इच्छित आहे.स्वार्थी झाला. भ्रष्टाचार, हिंसाचार,व्यभिचार हे सगळे दुराचार वाढले आहेत आणि सदाचार आणि शिष्टाचार वगैरे शब्दकोशातले शब्द झाले आहेत.या परिस्थितीमुळे मी वैतागलो नाही. तर ही पार्श्वभूमी यासाठी लिहिली की या अशा जगात कुणी सत्पुरुष जन्माला येऊ शकतो या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही.

            काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एक प्रसिद्ध महाराज त्या वेळेस गावात येणार होते. त्यांचे सर्व प्रोग्राम माझ्या एका स्थानिक मित्राने ठरविले होते.गावातल्या मोठ्या मैदानावर भव्य मंडप टाकला होता. बाहेर महाराजांच्या साहित्याची विक्री करणारे स्टॉल लावले होते.महाराज नजीकच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एका थ्री स्टार हॉटेल मध्ये (या वरचे स्टार हॉटेल तिथे नव्हते) तिथे उतरले होते.विदर्भात मार्चमध्येच उन्हाळ्याचे चटके बसायला सुरुवात झाली होती.त्यामुळे त्यांना एसी आवश्यक होता म्हणे. इकडे त्यांचे भक्त 9.00 वाजता महाराज येणार म्हणून उन्हात जमा झालेले.थोड्या थोड्या वेळात ‘महाराज निघालेत लवकरच पोहोचतील.’ अशा घोषणा लाऊड स्पीकरवरुन होत होत्या. मी मित्रासोबत त्याच्या दुकानात बसून होतो. एवढ्यात लँड लाइनवर फोन आला.मला स्पष्ट ऐकू येत होते. तिकडून विचारणा केली गेली. “बाबांच्या साहित्याची किती विक्री झाली.” इकडून आकडा सांगीतला गेला. मग तिकडून सूचना आली. “25,000 झाली की कळवा मग बाबा इथून निघतील. बाबांना 26 किमी पोहोचायला एक तास लागेल,बाबा तुमच्या घरी चहा पान करतील. मग सभेच्या स्थानी प्रस्थान करतील. तोपर्यंत आकडा 30,000 रुपया पर्यन्त पोहोचतो कां बघा.”    

            माझ्या त्या बी.एस.सी. गोल्ड मेडलिस्ट मित्राला विचारले की हे काय रे बाबा? तर तो म्हणाला की बाबा एकदा येऊन सांगून जातील तर त्यांचे विचार लोकांच्या कानावर वारंवार आले पाहिजेत,वाचले गेले पाहिजेत तर त्यांना काही समजेल.देव असा फुकट मिळत नाही ना. खर्च करावा लागतो. मी मनातल्या म्हटलं की या महाराष्ट्रात आहे ना? जिथे संत होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊली सांगून गेले “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधीयेल्या. “ज्ञानबा तुकाराम” चा जयघोष करतं आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखों वारकरी मार्गक्रमण करत असतात. मित्राच्या म्हणयाप्रमाणे देव त्यांना कधीच भेटणार नाही किंवा पावणार नाही. मी अधिक वाद घातला नाही. कारण त्याचे उच्च विचार मला सांगत होते की तो समजाविण्याच्या पलीकडे लीन झाला आहे. जर त्याच्या सारख्या सुशिक्षित माणसाचे असे हाल असतील तर मग अशिक्षितांचे काय?

            तरी मी तिथे थांबलो,म्हटलं हा एसी वाला बाबा एकदा पाहूनच घ्यावा. थोड्या वेळाने मित्राच्या घरी बाबांचे आगमन झाले. त्यांचे पाय धरायसाठी अगदी हाय तोबा गर्दी. मी नुसता पहात उभा होतो, ते पाहून बरेच जण मला ढकलून पुढे निघून गेले. मला मागे उभा बघून माझा मित्र मला पुढे घेऊन गेला आणि ओळख करून दिली, मॅनेजर आहे वगैरे सांगितले. तेव्हा त्याने मला बाबांच्या पाया पडण्यासाठी खुणावले. मी बाबांना उभ्या उभ्या नमस्कार केला आणि म्हटले “माझे श्रद्धास्थान शेगावीचे संत गजानन महाराज आहेत.त्यांना सोडून मी कुणाच्या पाया पडत नाही.गुरु एकच असावा असे म्हणतात ना.” ते फक्त हसले.

            माझ्या गुरूमधे आणि मित्राच्या गुरूमधे तुलनेचा प्रसंग न यावा असं त्यांना भेटायच्या आधी मनात होतं. पण मी सावरू शकलो नाही.कुठे “नंदी बैलासारखे मला काय सजविले म्हणून,महागडी वस्त्रे आणि अलंकार फेकून देणारा माझा शेगांवीचा राणा आणि कुठे ही महागडी तलम वस्त्रे घालून सजलेला हा बाबा (भगवी वस्त्रे साधुने परिधान करावी म्हणून त्या वस्त्रांचा रंग भगवा होता),हाताची बोटे दहा त्यामुळे अंगठ्या दहाच घालता आल्या, एक गळा होता पण साखळी घालण्याचे बंधन नसल्याने,गळ्यात सोनेरी 4-6 साखळ्या (अदमासे 4-5 तोळ्याच्या असाव्या) घातल्या होत्या. मी म्हटलं हा माणूस लोकांना आता अध्यात्माच्या चार गोष्टी सांगणार. मला हसू आलं. लहानपणी एक गोष्ट ऐकलेली, एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन एका साधूकडे जाते. आणि ती साधूना विनंती करते की माझ्या मुलाला जरा समजावा, हा खूप साखर खातो.साधू महाराजांनी दोन मिनिटे विचार केला आणि त्या मुलाच्या आईला म्हणाले “आई,15 दिवसांनी या.मग मी सांगतो त्याला.” पंधरा दिवसांनी पुन्हा ती आई आणि मुलगा साधुकडे पोहोचले. साधू त्या मुलाला म्हणाले “ए मुला,जास्त साखर खाऊ नाही पोटात किडे पडतात.” आई, साधू महाराजांना म्हणाली, “महाराज, हे आपण 15 दिवसांपूर्वी सांगू शकला असतात?” साधू महाराज म्हणाले “15 दिवसांपूर्वी मी स्वतः देखिल साखर खूप खात होतो. मी आधी साखर खाणे बंद केले आणि मगच मला हा त्याला खाऊ नकोस सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला ना.”

            जो ऐहिक सुखे भरभरून उपभोगतो,त्याला खरचं कुणाला काही सांगायचा अधिकार पोहोचतो कां? इतरांना मीचा त्याग करा सांगणारा, पहा माझ्या दर्शनासाठी किती गर्दी झाली असं मी मी म्हणतो, तेव्हा हसावं की रडावं समजत नाही.असा माणूस कसा परमेश्वराच्या जवळ असल्याचा दावा करतो.अशा या भोंदूच्या जाळ्यात सुशिक्षित कसे अडकतात? आश्चर्य वाटतं.आज काल पॅटर्न बदलला आहे.आज काल आपल्या वैयक्तिक,घरगुती सोहळ्याचे सार्वजनिकरण करायचं हा नवा ट्रेंड आहे.अर्थात खेड्यापाड्यातून हा प्रकार अनेक वर्षापासून  बघायला मिळतो/मिळायचा.पण यात कुठेही खेड्यातला लोकांचा कुणासाठी किंवा कुणाला दाखविण्यासाठी मी हे करतोय असा आविर्भावही नसायचा आणि तसे ते करत नसत.जसे विदर्भात सालबर्डीच्या महादेवाला जाऊन आले की मौंद करायची प्रथा होती.म्हणजे सगळ्यांना जेवायला बोलावत असतं.गणपतीच्या दिवसांत किंवा गौरी/महालक्ष्मी जेवतात,त्या दिवशी देखिल लोकांना भोजन देतात. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं.पण आजकाल अशा काही गोष्टी केल्या जातात.त्या इतरांना माझी देवाशी कशी जवळीक आहे,मी किती मोठा देवभक्त आहे,मी देवाचं किती करतो.हे दाखवायचं असतं,थोडक्यात इवेंट करायचा.जाहिरात करायची असते.पण कशासाठी?हेच मला समजतं नाही.असो.

तसचं देवाकडे काही मागणं आणि नवस बोलणं.मी तर देवाला काहीही न मागणारा माणूस आहे.त्याला काही कशाला मागायचं, देव सर्वसाक्षी आहे ना? मग असं त्याला काही मागून आपण त्याच्या सर्वसाक्षी असण्यावर आपला विश्वास नाही हे आपण सिद्ध करतो किंवा आपल्या देवावरच्या श्रद्धा तेवढ्या मजबूत नाही हे आपण दर्शवितो.नवस बोलणं हे तर लाच देण्यासारखं आहे आणि तेही कुणाला,ज्याने तुला सर्व काही दिलं,तेच तू देवाला देणार. तुझ्याकडे स्वतःचं असं काय आहे? म्हणून म्हणतो देवाची भक्ती आणि सेवा करणे हा सर्वस्वी व्यक्तिगत विषय आहे.      

सारांश

            अध्यात्म,अध्यात्म काय वेगळं आहे हो? ते कुठे शिकून मिळतं असं नाही वाटतं, ते आचरणातून यायला हवं आणि ते दुसऱ्याला दाखवायसाठी नाही स्वतःसाठी.म्हणून म्हणतो,आजच्या काळांत कुणीही पोहोचलेला वगैरे नाही.आपण अगदी एक समान आहोत. उलट जो असा दांभिकपणाने वागतो,त्याला फॉलो करणारे त्याच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत.कारण ते आपल्यापेक्षा दूसरा कुणी मोठा आहे असं मानतात. तो दांभिक तर मी माझं मध्ये अडकलेला आहे.त्यापेक्षा देवाचे नांव घ्यावे,शक्य झाल्यास त्याच्या दर्शनाला मंदिरात जावं.आणखी काय लिहू. मी जे लिहिले ते कुणा कुणाला पटणार देखिल नाही.आणि तसा आग्रह देखिल नाही.पण कुणाला विचार प्रवृत करू शकलो तर तेवढीच ईशसेवा होईल असं वाटलं म्हणून लिहिलं. नुकतंच वाकड, पुणे येथे एका मित्राने अशाच एका सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.त्यावरून मनात आलं आणि लिहिलं.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. Even though our literacy rate has increased, it failed to remove the superstitions amongst the folks who want God to give them without making efforts

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...