Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

देवीचे नवरात्र आणि स्त्रीचा मानसन्मान

 Blog No.2023/267           

Date:- 21st,October 2023.

 

    
मित्रांनो,

               आज अष्टमी, देवीच्या नवरात्रातील अष्टमीला अनन्य साधारण महत्व आहे.काही जातीमध्ये नवरी मुलगी लग्नानंतर सतत 5 वर्षे अष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन देवीची साग्रसंगीत पूजा करते, संध्याकाळी मंदिरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम असतो.अष्टमीच्या दिवशी गुजराती लोकांमध्ये दांडिया खेळण्याचा कार्यक्रम होतो.तर आज आपण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत.  

प्रास्ताविक

            2020 ला आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे 2020 आणि 2021 ला सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना मर्यादा आला होत्या. मागच्या वर्षी 2022 ला हे निर्बंध उठवले गेले. पण तरी लोकांमध्ये थोडी साशंकता होती.यावर्षी मी लोक अतिशय उत्साहात नवरात्र साजरे करत आहेत.          

महाराष्ट्रातील देवीची शक्तीपीठ आहेत. कोल्हापूरची अंबाबाई,तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरगडची रेणुकामाता आणि नाशिक जवळील वणीची सप्तश्रृंगी देवी.ही सर्व शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारी  आहेत.ही सगळी जागृत ठिकाणं आहेत असं म्हटलं जातं.यांच्याशी निगडित बऱ्याच आख्यायिका आहेत. भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्ती पीठांना भेट देतात. नवरात्रात या शक्तीपीठांच्या ठिकाणी भरपूर गर्दी असते.

 महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर - 

कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर म्हणजेच अंबाबाईचे मंदिर हे सर्वात जुने देवस्थान आहे.या मंदिराचे किंवा देऊळाचे बांधकाम राष्ट्रकूटांनी किंवा त्या आधी पासूनच शिलाहार राजांनी आठव्या शतकात केले होते. पुराणात याचा उल्लेख 108 पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साढे तीन शक्तिपीठांपैकी एक असे केलेला  आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतात. ज्या वेळी मुघलांचे शासन होते त्या वेळी त्यांनी हिंदूंवर सूड घेण्यासाठी सर्व देऊळांचा विध्वंस आणि नासधूस केली.त्यावेळी या देऊळाची मूर्ती तिथल्या पुजाऱ्याने बरीच वर्षे लपवून ठेवली असे म्हटले जाते.छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत ई.स. 1715 ते 1722 या सुमारास मंदिराची पुनर्बांधणी केली.या देऊळात महालक्ष्मी आणि त्यांचा समोर गरुडमंडपात गरुड स्थापित केले गेले आहेत. देवीची मूर्ती दगडी असून वजन 40 किलोग्रॅम आहेत. मागील बाजूस दगडी सिंह आहे. देवी आईच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनाग आहे.  

 तुळजापूरची  तुळजाभवानी - 

तुळजापुरातील तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यपीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवी.भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली.खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो.

माहूर गडची रेणुका देवी- 

माहूर गडची रेणुका माता ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरगडावर रेणुकेचे तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजानी बांधले असे.आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला. माता रेणुकाची एक कथा सांगितली जाते.या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केला.नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास देईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती.त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले.त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर' म्हटले जाऊ लागले. 

सप्तशृंगी देवी वणी नासिक -

या देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखले जाते. ही सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वणी येथे असून हे मंदिर  4800 फूट उंचीवर सप्तशृंगगडावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे. या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवी देवतांनी हीची याचना केली,तेव्हा देवी होमातून प्रकट झाली.तिचे हेच रूप सप्तशृंगी गडावर  बघावयास मिळते.हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात.देवीची आठ फुटी उंच मूर्ती आहे.तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे.

सारांश

            मित्रांनो,तुम्हाला या शक्तीपीठांची माहिती असणारच,तरी हा ब्लॉग लिहिण्यामागे एक कारण आहे.देवी ही देवी असली तरी मुळात ती नारी आहे. आपण मोठ्या भक्तीभावाने नवरात्र साजरे करत असतो. पण आपण रोज वर्तमानपत्र वाचण्यासाठी उघडतो तर,एक तरी बातमी स्त्री अत्याचारावरील वाचावयास मिळते.शाब्दिक छळ, विनयभंग, व्यभिचार, बलात्कार आणि घरगुती हिंसाचार याबद्दल वाचावयास मिळते.नवरात्रात देवीचे नवरात्र साजरे करतांना नारीशक्तीची पूजा आपण खरोखर मनापासून करतो कां? कां आपण केवळ उत्सवप्रेमी म्हणून हे साजरे करत असतो? कां इतर वेळी आपण केवळ कामांध आणि वास्तवतेची भान हरपलेले पुरुष असतो? घरगुती हिंसाचार हा अत्यंत भयानक आहे.याचं कारण असं की यात कधीकधी त्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत त्याची आई,बहीण किंवा वहिनी या देखिल सहभागी असतात.आपण स्त्री असल्याचा यांना विसर पडतो कां?  

            देवीची खऱ्या अर्थाने पूजा करायची असेल तर स्त्रीला तिचा मान सन्मान द्यायला हवा.पृथ्वीवरील ही जीवसृष्टी केवळ हवामान,पाणी यावर अवलंबून नसून ही जीवसृष्टी अव्याहत अबाधित सुरू राहण्यासाठी स्त्रीचे योगदान मोठे असते.नवरात्रात उत्सव साजरे करायला हरकत नाही.पण नारीचा मानसन्मान न राखता हे करत असू तर तो नुसता छलावा आहे,नाटक आहे,ढोंग आहे.असं मला वाटतं.तुम्हाला काय वाटतं कमेन्ट बॉक्स लिहा.          

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.                                       

Comments

  1. Nice blog and thought provoking and and Implementation of good things into practices

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...