Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

तोंडाची चव जाणे कारणे आणि उपाय

Blog No.2023/266           

Date:- 20th,October 2023. 

मित्रांनो,

               आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की तोंडाला चव नाही आहे किंवा इतरांना देखिल म्हटलेलं कानी येतं, आज माझ्या तोंडाला चव नाही आहे. आपण तेवढे चिकित्सक नसतो,त्यामुळे असं कशामुळे होतं असेल किंवा जर होतं असेल तर ते सुधरविण्यासाठी काही उपाय देखिल असतात यावर फारशी चिकित्सा करत नाही. सर्वसामान्य कारण सांगितलं जातं,अरे तुझं पोट बिघडलं असेल.पण नाही मित्रांनो,याची बरीच कारणं असतात आणि ती दूर करण्याचे उपाय देखिल असतात. आजच्या ब्लॉग मध्ये हे आपण पहाणार आहोत.        

प्रास्ताविक  

               तोंडाला चव नसणे याची बरीच कारणं असू शकतात,ती कारणं खालील प्रमाणे:-

1.संक्रमण (Infection) : विषाणूजन्य (Viral)  किंवा बॅक्टेरियाचे (Bacterial) संक्रमण झाल्यामुळे तोंडाची चव जाऊ शकते.विशेषत: वरच्या श्वसनमार्गावर परिणाम करणारे संक्रमण (Upper respiratory Tract Infection, URI) ज्यामुळे तोंडाची चव जाऊ शकते. 

2.औषधे: काही  वेळेस आपण एखाद्याला आजाराला बरं करण्यासाठी औषध घेत असतो. या औषधाचा परिणाम म्हणून तोंडाची चव जाऊ शकते. 

3.दाताच्या समस्या: तुमच्या दात किंवा हिरड्यांच्या समस्या चवीवर परिणाम करू शकतात.मौखिक स्वच्छता न करणे किंवा तोंडात किडलेले दात असणे,ज्यामुळे देखिल चवीवर परिणाम होऊ शकते.

4.मज्जासंस्थेचे विकार: स्वाद नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती, जसे की मल्टीपल स्क्लेरोसिस,अल्झायमर रोग किंवा बेल्स पाल्सी यामुळे चव जाऊ शकते. 

5.केमोथेरपी आणि रेडिएशन: कर्करोगाच्या उपचारांमुळे चव प्रभावित होऊ शकते.ही गोष्ट तात्पुरती किंवा दीर्घकालीन चव कमी होण्यास कारणीभूत ठरु शकते. 

6 विविध जिवनसत्वे आणि खनिजांची कमतरता: काही वेळेस विविध जिवनसत्वे आणि खनिजांची कमतरतेमुळे देखिल तोंडाची चव जाऊ शकते. विशेषतः जस्त (Zinc) सारख्या खनिजाची कमतरता,तोंडाची चव घालवू शकते.

7.सायनस आणि नाकाच्या समस्या: सायनुसायटिस किंवा ऍलर्जी सारख्या समस्या देखिल तोंडाच्या चवीवर परिणाम करू शकतात. आपल्या एखाद्या गोष्टीचा वास नसेल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. चव जाणवण्यात गंध न जाणवणे परिणाम करू शकते. 

आपल्या तोंडाची चव जाण्यासाठी एवढी कारणे (सात कारणे) असू शकतात. याचा आपण कधी विचार करतो कां? याचं उत्तर नाही असेल. मी बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये लिहिले आहे की बऱ्याच गोष्टी आपण हलक्यात घेत असतो आणि मग काल पर्यन्त मला काहीच होतं नव्हतं, ठणठणीत होतो असं आपण म्हणतो पण तसं नसतं. काही वेळेस या छोट्या आजारमागे मोठे रोग दडलेले असतात.घाबरू नका नेहमीच नाही.पण हे तुमच्या डॉक्टरला ठरवू द्या. याला मेडिकल टर्म्स मध्ये underlying causes असे म्हणतात.             

तुमची चव सुधारण्यासाठी किंवा पुन: मिळविण्यासाठीचे उपाय जे की मूळ कारणावर अवलंबून असू शकतात: 

1.अंतर्निहित स्थितीवर उपचार करा (underlying causes) : जर एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे चव कमी झाली  असेल, तर त्या समस्येचे निराकरण केल्याने चव सुधारण्यास मदत होऊ शकते. 

.औषधी समायोजन (Adjustment) :तुमच्या तोंडाची चव गेली असेल आणि त्यास तुम्ही घेत असलेली औषधे कारणीभूत असतील तर ती औषध बदलणे किंवा बंद करणे हा पर्याय आहे का? हे ठरविण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरची भेट घ्यावी लागेल. 

3.तोंडाची स्वच्छता आणि आरोग्य: नियमित ब्रश करणे, फ्लॉसिंग आणि दंत तपासणी करून तोंडाची स्वच्छता राखा.  

4.आहार आणि पोषण: वर लिहिल्या विविध जिवनसत्वे आणि खनिजांची कमतरतेमुळे चव गेली असेल तर खरोखर कमतरता असेल तर डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट सांगू शकतात. झिंक आणि ब जीवनसत्त्वांसह सर्व आवश्यक पोषक तत्वांसह संतुलित आहार घेणे. 

5.नाक आणि सायनसची काळजी: नाकाची समस्या कारणीभूत असल्यास, या समस्यांवर उपचार केल्याने तुमची चव परत येण्यास मदत होऊ शकते.

6.मसालेदार पदार्थ टाळा: तुमच्या तोंडाची गेलेली चव बारी होत असतांना मसालेदार पदार्थ खाऊ नका, ते टाळा. कधीकधी चव लागत नसेल तर आपण मसालेदार पदार्थ खातो पण तसं करू नका.

सारांश

            थोडक्यात काय, तोंडाची चवच गेली आहे ना एक दोन दिवसात येईल परत, आणि तसं होत देखिल. पण तोंडाची चव वारंवार जात असेल तर मात्र कितीही जिवावर येत असेल तरी डॉक्टरची भेट घ्या आणि नेहमीसाठी ईलाज करून घ्या. त्यात काही गंभीर नसेल ही पण चव जाणे या गोष्टींमुळे आपल्याला काही खावेसे वाटतं नाही आणि या न खाण्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 प्रसाद नातु, पुणे.                                                                                                                                                                         


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...