Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

बाल गंधर्व एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व

 Blog No. 2023/164       

Date: 26th, June 2023.


मित्रांनो,

            कदाचित नारायण श्रीपाद राजहंस कोण असा कुणा मराठी माणसाला,जर तो नाट्यप्रेमी नसेल,प्रश्न केला.तर उत्तर माहित नाही असं असेल.पण बाल गंधर्व कोण म्हटलं तर सगळेच सांगतील की हो मी ओळखतो.बाल गंधर्व एक प्रसिद्ध मराठी गायक आणि रंगमंच अभिनेता होते.त्यांनी जेव्हा रंगमंचावर भूमिका केल्या.तेव्हा महिलांना रंगमंचावर अभिनय करण्याची परवानगी नसे.मराठी नाटकांतील स्त्री पात्रांच्या भूमिकेसाठी बाल गंधर्व ओळखले गेले,एवढेच नव्हे तर खूप प्रसिद्ध झाले. आज त्यांची 136 वी पुण्यतिथि आहे.त्यांना आदरांजली वाहणारा हा आजचा ब्लॉग.

 

प्रास्ताविक    

            नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बाल गंधर्व यांचा जन्म 26 जून,1888 ला,एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात श्रीपाद राजहंस आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई राजहंस यांच्या पोटी झाला.त्यांचे जन्मगांव सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे हे आहे.अगदी लहान वयातच,त्यांचा विवाह देशस्थ ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित कुटुंबातील लक्ष्मीबाईशी झाला. 1940 मध्ये लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला.अकरा वर्षांनंतर, 1951 मध्ये, बाल गंधर्वांनी प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांची बहीण गौहरबाई कर्नाटकी हिच्याशी विवाह केला. गौहरबाई यांनी नारायणरावांसोबत नाट्य निर्मितीमध्ये काम केले होते,त्यामुळेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तिच्या पार्श्वभूमीच्या आणि धर्माच्या स्त्रीचा ब्राह्मण गृहस्थांशी विवाह समाजात अत्यंत अस्वीकार्य होता. नारायणरावांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने गौहरबाईंना स्वीकारले नाही.दोघेही निपुत्रिक राहिले आणि बाल गंधर्वांच्या तीन वर्ष आधी 1964 मध्ये गोहरबाईंचा मृत्यू झाला.

 थिएटर कारकीर्द

            बाल गंधर्व यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झालाहोता. त्यांनी अगदी लहान वयातच भजने गाऊन आपल्या गायनाची कारकीर्द सुरू केली.कोल्हापुरच्या शाहू महाराजांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना त्यांची नाट्य कारकीर्द घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. शाहू महाराजांनी त्यांची ओळख त्या काळातील प्रमुख मराठी संगीत नाटक कंपनी किर्लोस्कर मंडळीशीही करून दिली.

त्यांनी 1905 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.ही कंपनी मुजुमदार आणि नानासाहेब जोगळेकर चालवत होते.मध्ये जोगळेकरांच्या मृत्यूनंतर,मुजुमदार यांच्या हुकूमशाही आणि चालीरीतीच्या शैलीबद्दल असंतोष निर्माण झाला.बाल गंधर्व, गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांनी 1913 मध्ये ही कंपनी सोडून गंधर्व संगीत मंडळी स्थापन केली. 1921 मध्ये बाल गंधर्व कर्जबाजारी कंपनीचे एकमेव मालक बनले.त्यांनी सात वर्षांत कर्ज फेडले.पण ती कंपनी नंतर विसर्जित केली. बाल गंधर्वांनी नंतर प्रभात फिल्म कंपनीसोबत सहा चित्रपट बनवण्याचा करार केला.तथापि, धर्मात्मा (1935) या एका चित्रपटानंतर करार संपुष्टात आला.बाल गंधर्वांनी संत एकनाथांची मुख्य भूमिका केली होती.

बाल गंधर्वांनी 1937 मध्ये त्यांच्या नाटक कंपनीचे पुनरुज्जीवन केले.पण त्यांच्या वाढत्या वयामुळे ते स्त्री  भूमिका करू शकत नव्हते. त्यामुळे कंपनीने स्त्री भूमिका करण्यासाठी अभिनेत्रीचा शोध घेतला आणि एप्रिल 1938 मध्ये त्यांची गोहर कर्नाटकीशी ओळख झाली.बाल गंधर्वांचे लवकरच तिच्याशी घनिष्ट नाते निर्माण झाले.बाल गंधर्वांच्या जीवनात झालेल्या गोहरच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी,त्यांचे भाऊ बापूराव राजहंस यांनी कंपनी सोडली.

बाल गंधर्वांनी एकूण 27 उत्कृष्ट मराठी नाटकांमध्ये अभिनय केला आणि संगीत नाटक (संगीत) आणि नाट्य संगीत  सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय करण्यात मोठा वाटा उचलला. ते भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. बखले यांनी त्यांच्या स्वयंवर या नाटकाला संगीत दिले.गोविंदराव टेंबे यांनी मानापमानसाठी संगीत दिले.नंतरच्या काळात,बाल गंधर्वांचे संगीतकार मास्टर कृष्णराव (कृष्णराव फुलंब्रीकर) होते.

त्यांनी सादर केलेली गाणी मराठी नाट्यसंगीतातील अभिजात मानली जातात आणि त्यांच्या गायन शैलीचे मराठी समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. १९०१ मध्ये भाऊराव कोल्हटकर यांच्या निधनानंतर मराठी रंगमंचावर कठीण प्रसंग आले.बाल गंधर्वांनी रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले.त्यांच्या प्रसिद्ध समकालीनांमध्ये केशवराव भोसले ("संगीत-सूर्य" म्हणून ओळखले जाते) आणि दीनानाथ मंगेशकर यांचा समावेश होतो.अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी, वसंत शांताराम देसाई यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

 त्यांच्या प्रसिद्ध भूमिका

मानापमानमधील भामिनी (1911)

स्वयंवर मधील रुक्मिणी (1916)

एकच प्याला मधील सिंधू (1920)

संगीत शारदामधील शारदा (1909)

मृच्छकटिकात वसंतसेना

 बाल गंधर्व नांव कसे मिळाले

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक लोकमान्य टिळक हे श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.पुण्यातील गायनाच्या कार्यक्रमानंतर,लोकमान्य टिळकांनी राजहंसच्या पाठीवर थाप मारली आणि नारायण हे "बाल गंधर्व" असल्याचे म्हटले आणि तेव्हा पासून सर्व लोक त्यांना बाल गंधर्व नावानेच ओळखू लागले.

 पुरस्कार

1955 मध्ये, बाल गंधर्वांना प्रतिष्ठित "राष्ट्रपती पुरस्कार" प्राप्त झाला, जो आता संगीत नाटक अकादमी पुरस्कार म्हणून ओळखला जातो,तो भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींकडून मिळालेला भारतातील सर्वोच्च संगीत सन्मान होता.

1964 मध्ये, बाल गंधर्वांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला,भारताचा हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो.

 सन्मान

पुणे शहरातील नाट्यगृहाला त्यांच्या सन्मानार्थ ‘बाल गंधर्व रंग मंदिर’ हे नाव देण्यात आले.पुणे महानगर पालिकेने हे नाट्यगृह बांधले आहे. या मागे प्रेरणा पु.ल.देशपांडे यांची होती. या नाट्यगृहाचा पायाभरणी समारंभ बाल गंधर्व हयात असतांना,त्यांच्याच हस्ते पार पडला होता. या नाट्यगृहाचे उदघाटन आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते झाले होते.  

बालगंधर्वांच्या जीवनप्रवासाचे चित्रण करणारा बालगंधर्व हा चित्रपट चंद्रकांत प्रॉडक्शनने मे २०११ मध्ये प्रदर्शित केला.यात बाल गंधर्वांची भूमिका सुबोध भावे यांनी केली.    

मृत्यू

१५ जुलै १९६७ रोजी 79 व्या वर्षी बाल गंधर्वांचे निधन झाले. अशा ह्या थोर कलाकारास माझी त्यांच्या जयंती दिनी आदरांजली.     

 आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.                                                                                             


Comments

  1. Bal gandharva baddal paripoorna mahiti cover kelat.mast

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...