Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

सर्वांग सुंदर चित्रपट अंगूर

 Blog No. 2023/161       

Date: 23rd, June 2023.

 

मित्रांनो,

            हिन्दी चित्रपटसृष्टी एक काळ असा ही होता की जेव्हा,अॅक्शन चित्रपटांना खूप गर्दी होत असतांना,कॉमेडी चित्रपटांनी देखिल भरपूर मनोरंजन तर केलेच पण धंदा ही जबरदस्त केला.चुपके चुपके,गोलमाल,चष्मेबद्दूर,अंगूर,पती पत्नी और वो इत्यादि.मुख्य म्हणजे बासू चॅटर्जी किंवा ऋषिकेश मुखर्जी यांच्या सारख्या दिग्दर्शकांचे हे चित्रपट म्हणजे निव्वळ हसवणूक असे.धकाधकीच्या जीवनात एक छानसा विरंगुळा मिळतं असे.आताशा मी चित्रपट विशेष पहात नाही.विनोदी एकही पाहिल्याचं आठवतं नाही किंवा पाहिला असेल तर आठवतं नाही,कारण लक्षात ठेवण्यासारखं विशेष नसतं.”नवीन गोष्टींना तुम्ही नांव ठेवू लागलात की समजायचं की तुम्ही म्हातारे झालात.” असं व्हॉटस् अप यूनिवर्सिटीवर ऐकल्याचं आठवतं.पण असं काही नाही,कारण नवीन मुलांना विचारलं की इतक्यातला कॉमेडी चित्रपट कुठला म्हटलं की तेही थोड्या वेळ विचारात पडतात.तर मला आज गुलजार यांचा “अंगूर” आठवला. त्यावर आजचा ब्लॉग. 

प्रास्ताविक

            सुप्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांनी 1982 ला शेक्सपियरच्या “कॉमेडी ऑफ एररस्” या नाटकावर आधारित “अंगूर” हा चित्रपट प्रकाशित केला.यात संवेदनशील अभिनेता संजीवकुमार आणि देवेन वर्मा हे दोघेही दुहेरी भूमिकेत होते.त्यांच्या सोबतीला मौशुमी चॅटर्जी, दीप्ती नवल, अरुणा इराणी, उत्पल दत्त,युनूस परवेज,सी.एस.दुबे हे कलाकार होते. राहुल देव बर्मन यांचे संगीत होते. 

कथानक

            “अंगूर” चे कथानक हे राज तिलक (उत्पल दत्त) यांच्या परिवाराभोवती फिरते.राज तिलक यांना दोन जुळी मुले असतात.दोन्ही मुलांचे नांव अशोक (संजीवकुमार) ठेवण्यात येते.एक दिवस राज तिलक,त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले बाहेर गेलेले असतांना राज तिलक यांना आणखी एक जुळे सापडते.ते या जुळ्या भावंडांचा स्वीकार करुन त्यांना घरी आणतात.त्या दोघांचे नांव बहादूर (देवेन वर्मा) ठेवतात.पुढे एका अपघातात या परिवाराची विचित्र फाळणी होते.वडिलांसोबत दोन मुलं एक अशोक आणि एक बहादूर आणि आई सोबत एक अशोक आणि एक बहादूर असे एकमेकांपासून दूर होतात.यातील एका अशोकचे लग्न सुधाशी (मौशुमी चॅटर्जी) होते आणि बहादूरचे लग्न प्रेमाशी (अरुणा इराणी) शी होते.  

            दूसऱ्या अशोकला डिटेक्टिव कादंबऱ्या आवडतात आणि त्याचा सोबती बहादूरला भांग आवडत असते.कर्मधर्म संयोगाने दोन्ही जोड्या एकाच शहरात येतात.त्या नंतर जोडया अदलाबदली होणे, आणि खूप साऱ्या प्रासंगिक विनोदांनी भरलेला हा चित्रपट पुनः पुनः पहावा असं वाटतं.यातील मौशुमी चॅटर्जीसाठी अशोकने बनवायला दिलेला दागिना,सोनाराने दुसऱ्या अशोकच्या हाती सोपवणे.एका बहादूरने दोरी आणण्यासाठी जाणं आणि दुकानदाराने बोलावून ती दुसऱ्याच बहादूरला सोपविणे.डिटेक्टिवची आवड असणाऱ्या संजीवकुमारचे सारखे “गॅंगवाला लगता है” असे म्हणणे देखिल विनोद उत्पन्न करुन जाते.अरुणा इराणीचा नवरा बहादूर तिथे नसतांना दूसरा बहादूर तिथे पोहोचणे. त्याच्या तोंडी असलेले “प्रीतम आन मिलो” हे गाणं मनोरंजक आहे. 

सारांश

            “अंगूर” हा एक सर्वांग सुंदर कॉमेडी चित्रपट होता.महत्वाचे म्हणजे हा चित्रपट संजीवकुमार आणि देवेन वर्मा यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांभोवती फिरत असला तरी देखिल तो कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सगळ्या परिवाराने एकत्र बसून बघण्यासारखा हा चित्रपट होता.आर.डी.चे चित्रपटाच्या कथानकाला साजेसे संगीत, खुमासदार संवाद असलेला “अंगूर” मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये सर्वोत्तम असा होता आणि त्या वेळेस रेटिंग वगैरे द्यायची पद्धत असती तर मी या चित्रपटाला नक्कीच 5 पैकी 5 मार्क्स दिले असते.  

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.       

Comments

  1. मीनल ओगले.June 23, 2023 at 9:44 AM

    अतिशय आवडता चित्रपट.संजीव कुमार आणि देवेन वर्मा या दोघांनी धमाल उडवून दिली होती.पुनःप्रत्ययाचा अनुभव मिळाला.👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान विनोदी चित्रपट होता.Very nice write up.

    ReplyDelete
  3. हा चित्रपट केंव्हाही , कधीही , कुठेही पहावा . सॅटिस्फाक्शन गैरंटीड . आपल्या प्रभावशाली लिखाणातून जुन्या सोन्याला नवीन झळाळी लाभली आहे .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...