Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

G-20 परिषद श्रीनगर मधे

 Blog No. 2023/134  

Date: 29th, May 2023.


 

मित्रांनो,

            या वर्षी भारताला G20 अध्यक्षपद आणि यजमानपद मिळाले आहे.त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परिषदांचे आयोजन भारत करित आहे.श्रीनगर येथे नुकत्याच झालेल्या पर्यटन कार्यगटातील G20 बैठकीत,सदस्य देशांतील 60 हून अधिक निमंत्रितांचा सहभाग होता.भारताच्या G20 अध्यक्षपदाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी पुष्टी केली आहे की,ह्या मेळाव्याला 'पर्यटन कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींकडून सर्वाधिक प्रतिनिधित्व' लाभले.  

 

प्रास्ताविक

            पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला एकाकी पाडण्याच्या आपल्या मुत्सद्दी खेळात चीनचा पराभव झाला आहे.“प्रतिनिधींचे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणे ही एक अविश्वसनीय प्रक्रिया होती.भारतातील पर्यटनावर कार्यशाळा घ्यायची असेल तर तिचे आयोजन आम्हाला श्रीनगरमध्येच करावे लागेल.त्याच्या शिवाय दूसरा योग्य पर्याय नव्हता.असेही श्रृंगला म्हणाले.माजी परराष्ट्र सचिवांचे वक्तव्य हे नरेंद्र मोदी सरकारच्या विचारांचे प्रतिध्वनित करते,मोदी सरकारने बीजिंगच्या विरोधात कठोर दृष्टिकोन स्वीकारला आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर,काश्मीरमधील श्रीनगरमध्ये, G20 बैठकीसारख्या  एका  मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करून,नवी दिल्लीने इस्लामाबाद आणि त्याच्या अनुकूल मित्रांना कठोर संदेश पाठवला आहे.काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या वारंवारच्या प्रयत्नांना चीन वगळता फार मोजक्या राष्ट्रांचे समर्थन मिळाले आहे.बीजिंगचे सर्वोत्तम लक्ष्य हे आहे की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) अनरोल करणे आणि पाकिस्तानला कर्जाच्या सापळ्यात अडकवणे.कारण आधीच चीनने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली असल्याने,  बीजिंगला काश्मीर संबंधात जी पाकिस्तानची भूमिका आहे तिची री ओढणे  आवश्यक झाले आहे.त्यामुळे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी “वादग्रस्त प्रदेशावर” जी20 बैठकीला विरोध केला यात आश्चर्य नाही.

 

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) मात्र वादग्रस्त प्रदेशात

एका बाजूला चीनने G-20 परिषद श्रीनगरला घेतली,जो की त्याच्या म्हणण्यानुसार “विवादित प्रदेश” आहे,तिच्यावर बहिष्कार टाकला.मग पाकव्याप्त काश्मीर(पीओके) हा देखिल “विवादित प्रदेश” आहे. तिथे चीन, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) का उभारीत आहे?भारताने त्या बाबत तीव्र शब्दांत आपला निषेध व्यक्त केला आहे,भारताने असे म्हटले आहे की सीपीईसी अंतर्गत क्रियाकलाप “स्वतःच अवैध, बेकायदेशीर आणि अस्वीकार्य” आहेत. म्हणून, CPEC प्रकल्प,जो 'पाकिस्तान व्याप्त भारता' मधून जात आहे त्यास "विवादित प्रदेशा" वर बांधलेली मालमत्ता मानली जावी आणि त्यास त्या दृष्टीने हाताळले जावे. जर चीनने भारताच्या ताब्यातील भूभागातून आपले व्यावसायिक उपक्रम मागे घेतले नाहीत,तर त्याला आक्रमकता मानले जाईल.असे ठणकावले आहे.

तैवानच्या प्रश्नावर,भारताने 'वन चायना पॉलिसी'ला दुजोरा द्यावा अशी चीनची अपेक्षा असताना, भारताने तैवान संबंधातील अलीकडच्या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे आणि बीजिंगला संयम राखण्याचे, स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी कृती टाळण्याचे आणि तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.अरुणाचल प्रदेशावर चीनच्या वारंवार केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आणि भूतानमधील भागांना ‘विवादित श्रेणी’ अंतर्गत आणण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीने “एक चीन धोरणा” चा पुनरुच्चार करणे थांबवले आहे.

 

सारांश

G-20 च्या पर्यटन विषयक गटाची परिषद श्रीनगरमधे आयोजित करुन भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे. 60 प्रतिनिधींची तेथील उपस्थिती हेच दर्शविते की कलम 370 हटविण्यात आले, त्याला आता जगातील फारश्या देशांचा विरोध राहिलेला नाही.या परिषदेच्या सफल आयोजनाबद्दल भारत सरकार अभिनंदनास पात्र आहे. तर आता इथेच थांबतो.पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...