Skip to main content

मूत्रपिंडाचे शुद्धीकरण गरजेचे.

ब्लॉग नं.2025/152 दिनांक: 2 मे, 2025. मित्रांनो, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मूत्रपिंड पूर्णपणे शुद्ध करणे नाही,तर शरीर स्वच्छ करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला सहाय्य करणे. डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी कुठल्या पाच पदार्थांचे सेवन करावे आणि डिटॉक्सिफिकेशन कां जरूरी आहे,हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहाणार आहोत.       सविस्तर: मूत्रपिंडांना विषमुक्त करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे पाच पदार्थ खाली दिले आहेत: 1 . क्रॅनबेरी : क्रॅनबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यात अशी संयुगे आहेत जी मूत्रमार्गाच्या अस्तरांना बॅक्टेरिया चिकटण्यापासून रोखतात.यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका कमी होण्यास मदत होते , ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. कसे सेवन करावे , ताजे क्रॅनबेरी किंवा गोड न केलेले क्रॅनबेरी रस विषमुक्तीसाठी सर्वोत्तम आहेत. 2 . लाल शिमला मिरची : शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम कमी परंतु, जीवनसत्त्वे अ , क आणि बी 6 जास्त असतात.लाल शिमला मिरची मूत्रपिंडाचा ताण कमी करण्यास मदत करते.त्यात लाइकोपीन देखील असते , जे मूत्रपिंडाच्या आरोग्यास ...

जंगलतोड आणि युरोपियन युनियन

 Blog No. 2023/135  

Date: 30th, May 2023.


 

मित्रांनो,

            पर्यावरणाविषयी एकूणच सगळीकडे जागरुकता निर्माण करण्याचे कार्य जागतिक पातळीवर सुरु आहे.अशातच एक बातमी वाचण्यात आली की,भारतातील जंगलतोड रोखण्यास युरोपियन युनियन मदत करू शकते.या बातमीने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना? तसं मलाही वाटलं. पण पूर्ण बातमी वाचल्यावर नेमकं काय ते कळलं.त्यावरच आहे माझा आजचा ब्लॉग.

 

प्रास्ताविक

            युरोपियन युनियन हा युरोप खंडातील 27 देशांचा संघ आहे.युरोपियन युनियनकडे वस्तूंचे उत्पादन घेण्याची क्षमता नाही.म्हणजे त्याचे उत्पादन घेण्यासाठी त्यांच्याकडे योग्य जमीन आणि हवामान नाही.त्यामुळे त्या विशिष्ट वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी ते इतर देशांवर अवलंबून आहेत.युरोपियन युनियन मधील देशांना चॉकलेट आणि बिस्किटांसह इतर बर्‍याच वस्तूंच्या उत्पादनांमध्ये पाम तेल मोठ्या प्रमाणात लागते.पण हे देश पाम तेलाचे उत्पादन करीत नाहीत.त्यांना त्यांच्या देशात जर पाम तेल उत्पादन घेणे सुरु करायचे असेल तर, त्यांना पामची शेती करावी लागेल आणि त्यासाठी त्यांना जंगलतोड करावी लागेल.खरं तर चॉकलेट आणि बिस्किटांसह इतर बर्‍याच वस्तूंच्या उत्पादनांमध्ये पाम तेल उपयोगात आणण्यासाठी युरोपियन युनियन जगभरातील 16% जंगलतोड होण्यास जबाबदार आहेत.      


         

युरोपियन युनियन जगभरात कुठेही जंगलतोड होऊ नये यासाठी सक्रिय

            युरोपियन युनियनच्या लक्षात उशिरा कां होईना आले आहे की, जगभरात कुठेही असो जंगलतोड होणे योग्य नाही.कारण जंगले हीच कार्बनचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यभूत ठरतात.ते हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात,साठवतात आणि हवामान बदलाशी लढण्यास मदत करतात.त्यामुळे EU आता काहीतरी महत्त्वाकांक्षी कार्य करीत आहे.अलीकडेच युरोपियन युनियनने फॉरेस्टेशन-फ्री प्रोडक्टस् रेग्युलेशन (EUDR) नावाचा कायदा स्वीकारला आहे.ज्याचा उद्देश जंगलतोड कमी करा हा आहे.

           

जंगलतोडीस सर्वात मोठा हातभार कोणाचा  आहे?

           तुम्हाला हे ऐकून धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही की,जंगलतोडीस सर्वात मोठा हातभार हा शेतीचा आहे. 2001 ते 2015 दरम्यान, जागतिक वृक्ष तोडीमध्ये शेतीचा वाटा 39% होता. जंगलतोड करुन शेती केली जात आजे.युरोपियन युनियन फॉरेस्टेशन-फ्री प्रोडक्टस् रेग्युलेशन या कायद्याप्रमाणे डिसेंबर २०२० पासून  एखाद्या वस्तूचे उत्पादन हे जंगलतोड करुन,त्या जागेवर शेती करुन घेतलेले असेल.तर त्या उत्पादित वस्तुस युरोपियन युनियन मधील देशात प्रवेश मिळणार नाही.अशा आयात आणि निर्यात,दोन्ही प्रकारच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे.याची सुरुवात म्हणून पाम तेल, गोमांस, कोको, कॉफी, सोया आणि लाकूड यांच्या आयात आणि निर्यात, व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे.जर या वस्तूंचे उत्पादन जंगलतोड करुन त्या जागेवर शेती करुन घेतलेले असेल.     

       समजा तुमची जर्मनीला कोको निर्यात करणारी कंपनी आहे.तर तुमच्या मालाला जर्मनीच्या सीमेत प्रवेश करण्याआधी तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की, तुम्ही निर्यात करीत असलेल्या कोकोचे उत्पादन, नवीन जंगलतोड झालेल्या जमिनीवर लागवड करुन घेतलेले नाही.तुम्हाला त्यासाठी शेतजमिनीची भौगोलिक माहिती द्यावी लागेल.आवश्यकता पडल्यास,उपग्रहाची मदत घेऊन अधिकारी सत्य तपासून पाहू शकतील.याची योग्य ती पडताळणी झाली की,तुमच्या कोकोला जर्मनीच्या सीमेत प्रवेश मिळू शकेल.युरोपियन युनियन असे करुन दरवर्षी 72,000 हेक्टर जंगल जमीन वाचवू शकेल, असा अंदाज आहे.   

 

युरोपियन युनियनच्या या एका चांगल्या निर्णयास पाठिंबा आहे कां?   

 

नाही,इंडोनेशिया आणि मलेशिया हे पाम तेल निर्यातदार देश,आधीच तक्रार करण्यासाठी ब्रुसेल्सला पोहोचले आहेत.भारत दरवर्षी युरोपियन युनियनला कॉफी आणि लेदर हाइड ची $1.3 अब्ज एवढ्या किमतीच्या उत्पादनांची निर्यात करत असल्याने भारतालाही अस्वस्थ वाटत आहे.भारताने आधीच जागतिक व्यापार संघटनेकडे निषेध नोंदविला आहे.भारताने काही महिन्यांपूर्वी एक जोरदार शब्दांत पत्र पाठवले आहे आणि निदर्शनास आणून दिले की,काही देश स्थानिक व्यापार्‍यांचे संरक्षण करण्यासाठी,(जे कदाचित आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यांचे उल्लंघन आहे) विशिष्ट उत्पादनांची आयात मर्यादित करण्यासाठी पर्यावरणाचा आडोसा घेत  आहेत.हे एक प्रकारचे अप्रत्यक्ष शुल्क आहे.पडताळणी एजन्सी (युरोपमध्‍ये) फायद्यासाठी पैसे गोळा करीत आहे आणि निर्यातदार तोट्यात जात आहे.युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या फिनलंडच्याही भुवया उंचावल्या आहेत. इतर देशांच्या मनात आता हेच विचार येत आहेत की आजवर युरोपियन युनियनच्या देशांनी जंगलतोड केली आणि पैसा कमावला.आता आमची पाळी आहे आहे तर, तुम्ही निर्बंध लादता आहात. आम्हालाही पैसे कमवायचा अधिकार आहे. पण आता युरोपियन युनियन माघार घेईल असे वाटत नाही.


 

2005 पूर्वीची गोष्ट आहे.ब्राझीलमधे सोया लागवडीसाठी अमेझॉन रेन फॉरेस्ट,मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केले जात होते.तिथे जंगलतोड करुन 30% सोयाचे उत्पादन झाले.कोंबडीच्या खाद्यासाठी सोयाच्या पिकाची उपलब्धता,ही गोष्ट तेथे कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना हवीहवीशी वाटत होती.परंतु मोठ्या जनक्षोभानंतर,सर्वांनी स्वेच्छेने नवीन जंगलतोड झालेल्या ऍमेझोनियन जमिनीवर लागवड केलेल्या सोयाची खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर 2019 पर्यंत,एकूण सोया पिकापैकी फक्त 2% सोया पीक जंगलतोडीशी संबंधित होते. या गोष्टीमुळे Amazon चे जंगल वाचले.जर  स्वैच्छिक स्थगितीचा असा परिणाम होऊ शकतो, तर कल्पना करा की EU सारख्या मोठ्या प्रदेशात किती जंगल वाचू शकेल.त्यांच्या या प्रयत्नांमुळे आपण देखील जंगलतोड रोखण्यात यशस्वी होऊ शकतो,नाही का? आणि आपण सर्व उत्सर्जन कमी करण्याच्या आणि आपला ग्रह वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याने युरोपियन युनियनच्या या निर्णयाचे आपण स्वागत करू.

 

सारांश

शेवटी कुणाच्या कां प्रयत्नामुळे जंगले वाचलीत तर ती कुणाला नको आहे.जंगलं वाचलीत तर कार्बनचे उत्सर्जन शोसले जाईल आणि त्याचा हवामानावर निश्चित परिणाम होईल.शेवटी पृथ्वी वाचली तर आपण वाचणार.म्हणून आपण युरोपियन युनियनच्या या कायद्याचे स्वागत करू या.आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.         

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...