ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
Blog No. 2023/10 5 Date: 30th, April 2023. मित्रांनो, आपल्या देशात काही नवीन गोष्टी घडत आहेत.ह्याचे श्रेय निश्चितपणे केंद्र सरकारला आणि त्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.गोष्टी लहान लहान असतात पण हिंदीत म्हणतात ना “छोटी छोटी बाते भी माईने रखती है.” बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) ने माणा गावात एक साइनबोर्ड लावला आहे , जिथे लिहिले आहे "पहिले भारतीय गाव माणा." हेच माणा गाव पूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे. आजच्या ब्लॉग मध्ये सविस्तर जाणून घेऊया. प्रास्ताविक माणा हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले आहे आणि भारतातील अनेक सीमावर्ती गावांपैकी एक आहे.माणा हे गांव आकाराने जरी लहान असले , तरी लोकप्रियतेचा विचार करता ते खूप महत्वाचे आहे. माना गावाबद्दल येथे काही मनोरंजक तथ्ये आहेत.त्यातील एक म्हणजे , हे गाव पांडवांचे जन्मस्थान असल्य...