Skip to main content

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

कोची वॉटर मेट्रो सेवा

Blog No. 2023/103         

Date: 29th, April 2023. 


मित्रांनो,  

          भारतात एका बाजूला शहरात मेट्रोचे जाळे विणले जात असतांना,मध्यंतरी गंगेतून वाहतूक सुरू केली गेली.कोची हे केरळमधील एक वैशिष्ठपूर्ण शहर जे कोचीन म्हणून देखिल ओळखले जाते.कोची हे मलबार किनाऱ्यावरील एक महत्वाचे बंदर आहे.कोची किंवा कोचीनची लोकसंख्या ही 21 लाखाच्या जवळपास आहे.एर्नाकुलम हे जिल्ह्याचे ठिकाण असून कोची हा त्याचाच एक भाग आहे.कोची हे अनेक बेटांनी वेढलेले गांव आहे.इथे सामुद्रिक वाहतुकीला वाव आहे.इथे तशीही जलवाहतुक सुरू आहे,पण खासगी वाहतूकदार आहेट.पण 25 एप्रिल, 2023 ला एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली.त्या बद्दल आहे आजचा ब्लॉग.

कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन                   

कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 25 एप्रिल 2023 ला भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन झाले. मंगळवारी उद्घाटन झालेल्या या वॉटर मेट्रो सेवेचा   बुधवारी 6,559 प्रवाशांनी आस्वाद घेतला.या सेवेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, मेट्रो जलवाहतुकीत मोठी क्रांती आणेल आणि राज्याच्या पर्यटनालाही चालना देईल.केरळ सरकार आणि जर्मन फर्म KfW  यांचे  अर्थसहाय्य असलेल्या,या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केल्या आहेत.एकूण प्रकल्पात 38 टर्मिनल्ससह 78 इलेक्ट्रिक बोटींचा समावेश आहे.बुधवारी म्हणजे 26   एप्रिल,2023 ला,सकाळी 7 वाजता व्यावसायिक कामकाज सुरू झाले आणि रात्री 8 वाजता संपले.दर 15 मिनिटांनी 'वॉटर मेट्रो' हायकोर्ट ते वायपिन टर्मिनल्स दरम्यान धावेल.

वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभव घेण्यास गर्दी

पहिल्याच दिवशी, वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभवण्यासाठी टर्मिनल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि शेकडो लोक बोटींमध्ये बसण्यासाठी लांब रांगा लावून थांबलेले होते.वॉटर मेट्रो प्रकल्पाचे उद्दिष्ट कोची तलावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या शहरी घरांसाठी मुख्य भूभागावरील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि त्याच वेळी शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे हे आहे. प्रवासी वाढवण्यासाठी, कोची वॉटर मेट्रो प्रकल्प वारंवार नवीन, ऊर्जा-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित अशा बोटी लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

कोची मेट्रोबद्दल थोडेची माहिती  

कोची वॉटर मेट्रो प्रकल्पात 15 मार्गांचे बांधकाम समाविष्ट आहे,जे 78 किमी-लांब मार्गांच्या नेटवर्कसह 10 बेटांना जोडेल, 78 जलद, इलेक्ट्रिकली-प्रोपेल्ड हायब्रीड फेरीचा ताफा वापरून 38 जेटीवर थांबतील. वॉटर मेट्रोमुळे बेटावरील 100,000 पेक्षा जास्त लोकांना फायदा होईल असा अंदाज आहे.

ही एक खेळ बदलणारी (Game Changer) वाहतूक व्यवस्था आहे.कारण कोची अनेक बेटांनी वेढलेले आहे आणि त्यापैकी 10 बेटे अतिशय महत्त्वाची आणि दाट लोकवस्तीची आहेत, असे कोची मेट्रो रेल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले.

कोची वॉटर मेट्रोबद्दल सर्व काही

1.     कोची बंदर शहराच्या सभोवतालची एकूण 10 बेटे जोडली जातील आणि पहिल्या टप्प्यातील सेवा हायकोर्ट-वायपिन टर्मिनल ते व्हिटिला-कक्कनड टर्मिनलपर्यंत सुरू होईल.

2.    तिकीट ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात आणि ते कोची वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी ‘कोची 1’ कार्ड देखील वापरू शकतात.

3.    तिकिटाची किंमत: किमान .20 आणि कमाल .40. नियमित प्रवासी 180 ते ₹1,500 पर्यंतचे साप्ताहिक किंवा मासिक पास घेऊ शकतात.

4.   सीएम विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रोने प्रवासी हायकोर्ट टर्मिनलवरून वायपिन टर्मिनलला 20 मिनिटांत आणि कक्कनाडहून वायपिनला 25 मिनिटांत ट्रॅफिकमध्ये न अडकता पोहोचू शकतात.

5.    हा प्रकल्प ₹747 कोटी रुपयांचा आहे, ज्याने 78 किमी पसरलेल्या बेटांना जोडणारे 15 मार्ग निवडले आहेत.

समारोप

भारत बदलतोय. 75 वर्षानंतर कां होईना काही नवीन ऐकायला मिळते आहे. 75 वर्षात काहीच झाले नाही असे नाही म्हणणार,पण 11 पंचवार्षिक योजना आणि तीन वार्षिक योजना ह्यांचा एकंदर outlay बघता,भारत प्रगतिशील राष्ट्रांमधून प्रगत राष्ट्रात जाण्यास काही हरकत नव्हती.पण जाऊ द्या. “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी अथवा पुरुनी टाका. सडत न एक्या ठायी ठाका,सावध, ऐका पुढल्या हाका.” असे केशवसुत म्हणून गेलेत.तर आज इथेच थांबतो. पुनः भेटू या. शनिवारच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. 

 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

  1. Real game changer
    छोड़ो कल की बातें
    कल की बात पुरानी
    नए दौर में लिखेंगे
    मिलकर नई कहानी ..

    ये

    ये गाना

    उपरोक्त गीत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...