Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

कोची वॉटर मेट्रो सेवा

Blog No. 2023/103         

Date: 29th, April 2023. 


मित्रांनो,  

          भारतात एका बाजूला शहरात मेट्रोचे जाळे विणले जात असतांना,मध्यंतरी गंगेतून वाहतूक सुरू केली गेली.कोची हे केरळमधील एक वैशिष्ठपूर्ण शहर जे कोचीन म्हणून देखिल ओळखले जाते.कोची हे मलबार किनाऱ्यावरील एक महत्वाचे बंदर आहे.कोची किंवा कोचीनची लोकसंख्या ही 21 लाखाच्या जवळपास आहे.एर्नाकुलम हे जिल्ह्याचे ठिकाण असून कोची हा त्याचाच एक भाग आहे.कोची हे अनेक बेटांनी वेढलेले गांव आहे.इथे सामुद्रिक वाहतुकीला वाव आहे.इथे तशीही जलवाहतुक सुरू आहे,पण खासगी वाहतूकदार आहेट.पण 25 एप्रिल, 2023 ला एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली.त्या बद्दल आहे आजचा ब्लॉग.

कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन                   

कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 25 एप्रिल 2023 ला भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन झाले. मंगळवारी उद्घाटन झालेल्या या वॉटर मेट्रो सेवेचा   बुधवारी 6,559 प्रवाशांनी आस्वाद घेतला.या सेवेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, मेट्रो जलवाहतुकीत मोठी क्रांती आणेल आणि राज्याच्या पर्यटनालाही चालना देईल.केरळ सरकार आणि जर्मन फर्म KfW  यांचे  अर्थसहाय्य असलेल्या,या बोटी कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केल्या आहेत.एकूण प्रकल्पात 38 टर्मिनल्ससह 78 इलेक्ट्रिक बोटींचा समावेश आहे.बुधवारी म्हणजे 26   एप्रिल,2023 ला,सकाळी 7 वाजता व्यावसायिक कामकाज सुरू झाले आणि रात्री 8 वाजता संपले.दर 15 मिनिटांनी 'वॉटर मेट्रो' हायकोर्ट ते वायपिन टर्मिनल्स दरम्यान धावेल.

वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभव घेण्यास गर्दी

पहिल्याच दिवशी, वॉटर मेट्रोचा प्रवास अनुभवण्यासाठी टर्मिनल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि शेकडो लोक बोटींमध्ये बसण्यासाठी लांब रांगा लावून थांबलेले होते.वॉटर मेट्रो प्रकल्पाचे उद्दिष्ट कोची तलावाच्या किनाऱ्यालगत असलेल्या शहरी घरांसाठी मुख्य भूभागावरील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेश सुलभ करणे आणि त्याच वेळी शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे हे आहे. प्रवासी वाढवण्यासाठी, कोची वॉटर मेट्रो प्रकल्प वारंवार नवीन, ऊर्जा-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित अशा बोटी लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

कोची मेट्रोबद्दल थोडेची माहिती  

कोची वॉटर मेट्रो प्रकल्पात 15 मार्गांचे बांधकाम समाविष्ट आहे,जे 78 किमी-लांब मार्गांच्या नेटवर्कसह 10 बेटांना जोडेल, 78 जलद, इलेक्ट्रिकली-प्रोपेल्ड हायब्रीड फेरीचा ताफा वापरून 38 जेटीवर थांबतील. वॉटर मेट्रोमुळे बेटावरील 100,000 पेक्षा जास्त लोकांना फायदा होईल असा अंदाज आहे.

ही एक खेळ बदलणारी (Game Changer) वाहतूक व्यवस्था आहे.कारण कोची अनेक बेटांनी वेढलेले आहे आणि त्यापैकी 10 बेटे अतिशय महत्त्वाची आणि दाट लोकवस्तीची आहेत, असे कोची मेट्रो रेल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले.

कोची वॉटर मेट्रोबद्दल सर्व काही

1.     कोची बंदर शहराच्या सभोवतालची एकूण 10 बेटे जोडली जातील आणि पहिल्या टप्प्यातील सेवा हायकोर्ट-वायपिन टर्मिनल ते व्हिटिला-कक्कनड टर्मिनलपर्यंत सुरू होईल.

2.    तिकीट ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात आणि ते कोची वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी ‘कोची 1’ कार्ड देखील वापरू शकतात.

3.    तिकिटाची किंमत: किमान .20 आणि कमाल .40. नियमित प्रवासी 180 ते ₹1,500 पर्यंतचे साप्ताहिक किंवा मासिक पास घेऊ शकतात.

4.   सीएम विजयन म्हणाले की, वॉटर मेट्रोने प्रवासी हायकोर्ट टर्मिनलवरून वायपिन टर्मिनलला 20 मिनिटांत आणि कक्कनाडहून वायपिनला 25 मिनिटांत ट्रॅफिकमध्ये न अडकता पोहोचू शकतात.

5.    हा प्रकल्प ₹747 कोटी रुपयांचा आहे, ज्याने 78 किमी पसरलेल्या बेटांना जोडणारे 15 मार्ग निवडले आहेत.

समारोप

भारत बदलतोय. 75 वर्षानंतर कां होईना काही नवीन ऐकायला मिळते आहे. 75 वर्षात काहीच झाले नाही असे नाही म्हणणार,पण 11 पंचवार्षिक योजना आणि तीन वार्षिक योजना ह्यांचा एकंदर outlay बघता,भारत प्रगतिशील राष्ट्रांमधून प्रगत राष्ट्रात जाण्यास काही हरकत नव्हती.पण जाऊ द्या. “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी अथवा पुरुनी टाका. सडत न एक्या ठायी ठाका,सावध, ऐका पुढल्या हाका.” असे केशवसुत म्हणून गेलेत.तर आज इथेच थांबतो. पुनः भेटू या. शनिवारच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार. 

 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

  1. Real game changer
    छोड़ो कल की बातें
    कल की बात पुरानी
    नए दौर में लिखेंगे
    मिलकर नई कहानी ..

    ये

    ये गाना

    उपरोक्त गीत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...