Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

कार्य-जीवन संतुलन Work Life Balance

 Blog No. 2023/78     

Date: 31st,March 2023

मित्रांनो,

            गेल्या दशकभरापासून माणसाच्या जीवनात विशेषतः नोकरी करणाऱ्यांच्या जीवनात,खूप बदल घडून आलेत.जीवघेणी स्पर्धा,बदललेली जीवन पद्धती,लहान लहान गावातून आणि शहरातून मोठ्या शहरांकडे झपाट्याने होणारे स्थलांतर,बदललेल्या कार्य पद्धती,कार्याच्या वेळा,वाढत्या गरजा,मोठ्या शहरांचे अचानक मेट्रोमधे झालेले रूपांतर,त्या शहरातील घरापासून कार्य स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा विलंब,या साऱ्याचा परिणाम ऑफिसमधील कार्य किंवा काम आणि वैयक्तिक जीवन यांचे संतुलन बिघडण्यात झाला आहे.आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकात,आपण आपले वैयक्तिक जीवन हरवून बसायला लागलो आहे.आपण आपल्या कार्यातील वचनबद्धतेला,आपल्या वैयक्तिक जीवनापेक्षा अधिक महत्व देऊ लागलो आहे.कार्य स्थानातील जास्त दबावामुळे जास्त ताण आणि ताणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या अनेक समस्या उदभवू शकतात, नव्हे उदभवत आहेत.पुरेशी विश्रांती किंवा झोप न मिळाल्याने कामाच्या उत्पादकतेवर आणि कार्यक्षमतेवरही विपरित परिणाम होतो.त्याचा देखिल मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतं आहे.चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कार्य जीवन संतुलन राखणे आवश्यक झाले आहे.

कार्य जीवन संतुलन राखण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे.

1.   आरोग्याला प्राधान्यक्रम द्यायला हवा. आपल्या जीवनात आपण चांगल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.वेळच्या वेळी जेवण,पौष्टिक अन्नसेवन,रोजचा थोडा तरी व्यायाम आणि थोडी तरी ध्यानधारणा,अगदी 15 मिनिटे कुठल्याही विचारांशिवाय डोळे मिटून स्वस्थ बसू शकलात,तरी बरेच काही साध्य करु शकाल.मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ हे सूत्रही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.म्हणून प्रथम आरोग्याची काळजी घ्या.

2.    पुरेशी झोप हवी:-तुमच्या संपूर्ण कामात सक्रिय राहण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे.आपण बर्‍याचदा इतक्या जबाबदाऱ्या घेतो की आपल्याला चांगली झोप घेण्यासाठी वेळ मिळत नाही.पुरेशी दर्जेदार झोप नियमितपणे न मिळाल्याने,अनेक आजार आणि विकारांचा धोका वाढतो.यामध्ये हृदयविकार आणि स्ट्रोकपासून ते लठ्ठपणा आणि स्मृतिभ्रंश याचा समावेश आहे.  

NIH मधील झोप तज्ञ डॉ. मारिष्का ब्राउन सांगतात की, “निरोगी झोपेमध्ये तीन प्रमुख गोष्टींचा समावेश होतो, “एक म्हणजे तुम्ही किती झोप घेता.दुसरे म्हणजे झोपेची गुणवत्ता- म्हणजे तुम्हाला डीप स्लिप किती मिळते आणि शेवटचे म्हणजे तुमचे झोपेचे सुसंगत वेळापत्रक आहे कां?.”जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये किंवा अनियमित वेळापत्रकात काम करतात,त्यांना दर्जेदार झोप घेणे अधिक गरजेचे आहे. मोठ्या तणावाचा काळ-आपल्या सामान्य झोपेच्या दिनचर्येत व्यत्यय आणू शकतो.

कोलोरॅडो विद्यापीठातील झोपेचे संशोधक डॉ. केनेथ राइट,ज्युनियर म्हणतात, झोपेचा उपयोग रक्तवाहिन्यांपासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत सर्व दुरुस्तीसाठी करतात.“शरीरात काही दुरुस्तीच्या प्रक्रिया असतात त्या बहुतेकदा सर्वात प्रभावीपणे झोपेच्या वेळी होतात."जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्या प्रक्रिया विस्कळीत होतात."राईट म्हणतात, “तुमची एका रात्रीची झोप खराब झाली असेल आणि तुम्ही डुलकी घेतली असेल किंवा पुढच्या रात्री जास्त वेळ झोपलात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो,” राईट म्हणतात. "परंतु जर तुमचा एक आठवडा खूप कमी झोपेचा गेला असेल,तर वीकेंडची जास्त झोप घेतलेली तुम्हाला पुरेशी होणार नाही. असे हे वर्तन आरोग्यदायक वर्तन नाही.”

3.   कार्यात/कामाच्या वेळेत थोडा ब्रेक घ्या. चांगल्या उत्पादकतेसाठी (productivity) आपल्या कार्यालयीन कामात लहान ब्रेक घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कधी कधी सतत कार्यावर लक्ष केंद्रित केल्याने,इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात.ज्या कार्याचे स्वरूप Monotonous असते. तिथे तर थोडासा ब्रेक घेणे आवश्यकच आहे.बँकेत असतांना मी बघितले कि काही स्टाफ सदस्य अर्ध्या तासाचा लंच पीरियड असतांना 10 मिनिटात जेवण आटोपून आपल्या काऊंटरवर बसत असतं.अर्धा तास लंच घेतल्यानंतर,पुनः सकाळ सारखे ताजेतवाने होऊन कार्य करावे हा प्रबंधकांचा उद्देश त्यात सफल होत नसे.

4.       वाचनाची सवय लावून घ्या:- साहित्य वाचले पाहिजे असे देखिल नाही.तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत असलेले सोडून काही वाचले तरी चालेल.तसेच व्हाटस अप,फेसबूक सोडून इतर काही वाचा.वाचनाने बुद्धीला चालना मिळते.विचार करण्याची शक्ति वाढते. नवनवीन गोष्टीची माहिती होते.तुमच्या आवडत्या विषयाचे वाचन करा.

5.     संगीत ऐकणे:- आजकाल बऱ्याच रोगांवर म्युझिक थेरपीचा उपचार केला जात आहे. म्हणून दिवसभरात वेळ काढून संगीत ऐकले पाहिजे. संगीत हे  ताण आणि तणावावर परिणामकारक आहे.संगीतात आपल्या समस्यांचा विसर पाडण्याचे सामर्थ्य आहे.तुम्हाला गाता येत असेल तर त्या सारखे सुख नाही.एखादे वाद्य शिकणे हा देखिल एक चांगला उपाय आहे.

6.    सामाजिक प्रतिबद्धता:- आपल्या मित्र आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढा. हे तुम्हाला आनंदाचे क्षण मिळवून देण्यात मदत करेल.हे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करते आणि तुमचे मानसिक आरोग्य स्थिर ठेवते.त्यामुळे तुमच्या चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा प्रेमळ कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे. हे कार्य-जीवन संतुलनात महत्वाची भूमिका बजावू शकते.

7.    नवीन छंद लावून घ्या किंवा आपला छंद जोपासा:- आपल्या छंदांना वेळ द्यायला विसरू नका. जर तुम्हाला छंद असेल तर त्याचा सराव करा आणि यामुळे तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवता येईल.जुने  छंद नसतील तर नवे जोपासा. हे तुम्हाला ऑफिसमधील सर्व तणाव विसरून जाण्यास मदत करतील. तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.

                              
             
            कार्य-जीवन संतुलन साधलेला              कार्य-जीवन संतुलन बिघडलेला 

सारांश:-

मी नोकरीत असतांना कार्य-जीवन संतुलन या सारखे काही नव्हते.पण गेल्या काही वर्षात माझी मुले काय किंवा माझ्या सोबत बँकेत काम करीत असलेली मुले काय आणि इतर स्टाफ काय किंवा मी माझ्या आजूबाजूला शेजारी राहणाऱ्या लोकांचा एकंदर विचार करतो. तेव्हा त्यांचे कार्य-जीवन संतुलन बिघडल्याचे जाणवते.गेल्या काही वर्षात personnel डिपार्टमेंट चे नांव बदलून हुमन रिसोर्सेस डेवलपमेंट HRD असे झाले आहे.पण नावाशिवाय काही बदलल्याचे  दिसत नाही.स्टाफला कार्य-जीवन संतुलन साधण्यास मदत करणे हे खरं तरं एचआर चे काम हे केव्हा कळेल माहित नाही.

प्रसाद नातु,पुणे              

Comments

  1. Very nice blog. Very important suggestions. Though it is very late for us but good for young generations. 👍

    ReplyDelete
  2. नवीन पिढीसाठी उद्बोधक.

    ReplyDelete
  3. नवीन पिढीसाठी उद्बोधक.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...