Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

वाहनांचे फॅन्सी नंबर

 Blog No. 2023/55    

Date:3rd, March 2023.


मित्रांनो,

कुणाला कुठल्याचे आकर्षण वाटेल सांगता येत नाही. वाहनांचे आकर्षण खूप लोकांना असते. ते फक्त एखादी नविन कार किंवा मोटरसायकल with new features येते आहे. ह्याची वाटच पहात असतात आणि अशी  कार किंवा मोटरसायकल लॉंच झाली की लगेच जुनी विकून टाकून नविन घ्यायला मोकळे होतात.काही दिवसांनी ही आवड व्यसनांत बदलून जाते.ते क्वचितच एखादी कार किंवा मोटरसायकल 5000 किमी चालवत असतील. नविन कार किंवा मोटरसायकल with new features असली तरी रस्ते तेच असतात, खड्डे तेच असतात आणि ट्राफिक देखिल तोच सिग्नल न पाळणारा, रॉन्ग साइड ने येणारा, समोर खूप जागा असतांना हळूहळू आपल्या स्पीडने जात लोकांना बोअर करणारा, आलिशान कारचा काच उघडून बाहेर पिचकारी मारणारा,नाही तिथे गाडी पार्क करणारा, रस्त्यात कार मोटरसायकल उभी करून मोबाईल वर बोलणारा,अजून असे किती तरी लिहिता येतील. तात्पर्य हेच की मग कार किंवा मोटरसायकल नविन घेऊन काय फायदा.ह्याचं उत्तर हे जे सर्व काही करतात ना तेच देऊ शकतात. 




वाहनांचे फॅन्सी नंबर

तर ठीक आहे, कार किंवा मोटरसायकल with new features घेतली आणि शहराच्या बाहेर कुठे आउटिंग गेलो तर एक वेगळीच मजा असते हे काय फायदा ह्याचे एक उत्तर मला सुचले. पण माझ्या कार किंवा मोटरसायकलचा रजिस्ट्रेशन नंबर 8645 असला काय किंवा 8888, 5555, 8, 5 77 असला काय,ह्याचा काय फायदा हो. ना कार किंवा मोटरसायकलची स्पीड वाढत ना ती अॅवरेज जास्त देत ना ती विदाउट ड्रायवर चालत काही नाही. तरी देखिल पण पुणेकर म्हणून रोज नवनवीन किस्से ऐकायला मिळतात. आता RTO कडून मिळालेल्या माहिती नुसार असे वाहनांचे फॅन्सी नंबर घेण्यासाठी जे अतिरिक्त शुल्क (FEE) भरावे लागते.तो जो महसूल RTO ने वसूल केला आहे, तो 2021 मध्ये रु.21.45 कोटी होता तो 2022 मध्ये वाढून रु.31.80 कोटी झाला आणि या वर्षी महसुलची रक्कम फक्त जानेवारी 2023 ची रु.4.80 कोटी झाला आहे. (कोटीच्या कोटी उड्डाणे असे मारुती रायाच्या बाबतीत म्हटले जायचे.) 

पुणेकरांना 1,7 किंवा 9 हा नंबर पसंत आहे असे देखिल RTO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एखाद्या विशेष नंबरसाठी जर खूप साऱ्या applications आल्या तर auction करून जो जास्त बोली लावेल त्याला तो नंबर देण्यात येतो. जे पुणेकर महागड्या कार विकत घेतात, ते 1,7,9,77,90,99,9999,990,770,7070,7707 तसेच 9090 आणि 9990 ह्या सारखे नंबर पसंत करतात.




तात्पर्य:-

कार किंवा मोटरसायकल ज्याची त्याची असल्याने तिला कुठला नंबर हवा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पसंत अपनी खयाल अपना अपना. पण सरकारच्या RTO विभागाची त्या निमित्ताने ही जी अतिरिक्त कमाई होते आहे आणि ती सरकारच्या खाती जमा होते आहे.जी स्वागतार्ह बाब आहे. 


                                                                                                                                            प्रसाद नातु,पुणे. 


Comments

  1. खरंय छान माहिती

    ReplyDelete
  2. Same with mobile number. But don't know how much revenue they are getting.
    We had had a clerk who used to inform about opening ac out with specific number in manual Banking system in Gadhinglaj

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...